शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
2
मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा चटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा
3
Monsoon Update : उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार? मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली; वाचा हवामान खात्याचा नवा अंदाज
4
Preity Zinta: पंजाब किंग्जचा पराभवाचा चौकार, मालकीण प्रिती झिंटा भडकली, मध्यरात्री लिहिलेली पोस्ट चर्चेत!
5
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
6
अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट, ३० आमदार मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’सोबत; आज सरकार परीक्षेला सामोरे जाणार
7
आधी दिला इंधन बचतीचा संदेश; आता पीएम मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहने कमी केली
8
सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ; यातून सरकारला किती फायदा होणार? जाणून घ्या...
9
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
10
पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
11
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
12
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
13
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
14
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
15
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
16
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
17
नवे ‘डिजिटल वॉर’, मेसेजिंग अ‍ॅपचा होतोय वापर; 'लष्कर-ए-तैयबा'च्या दहशतवाद्याच्या चौकशीतून समोर आली धक्कादायक माहिती
18
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
19
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
20
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
Daily Top 2Weekly Top 5

उद्योग सुरळीत ठेवण्यासाठी आराखडा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:15 IST

अहमदनगर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत जिल्ह्यातील अर्थचक्र विस्कळीत होऊ नये यासाठी एक आराखडा तयार करण्यात येणार आहे. याबाबत ...

अहमदनगर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत जिल्ह्यातील अर्थचक्र विस्कळीत होऊ नये यासाठी एक आराखडा तयार करण्यात येणार आहे. याबाबत उद्योजकांनी मांडलेल्या सूचनांबाबत एक प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. दरम्यान, एमआयडीसीमध्ये शंभर बेडचे एक कोविड सेंटर सुरू करण्याची सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी उद्योजकांकडे केली.

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि तिसऱ्या लाटेची शक्यता या पार्श्वभूमीवर उद्योजकांमध्ये मोठी चिंता आहे. त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बुधवारी सायंकाळी जिल्हा नियोजन भवनात उद्योजकांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. यावेळी महसूल व आरोग्य यंत्रणेतील महत्त्वाचे अधिकारी, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे चेअरमन अरविंद पारगावकर व उद्योजक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी डॉ. भोसले यांनी उद्योजकांशी संवाद साधला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने उद्योग व्यवसाय सुरळीत सुरू राहतील यादृष्टीने पावले टाकली आहेत. त्यामुळे पुन्हा व्यवसाय सुरू होऊ शकले. दुकानांची वेळ वाढवून मिळावी, अशी अपेक्षा उद्योजकांनी बैठकीत व्यक्त केली. यासह उद्योजकांच्या मागण्या राज्य शासनापर्यंत पोहोचवू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी बैठकीत दिली. कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करून उद्योजक आणि व्यापारी असोसिएशन कशा प्रकारे उद्योग सुरू ठेवू शकतील, यासंदर्भात जिल्ह्याचा आराखडा तयार करणार असल्याचेही भोसले यांनी सांगितले.

उद्योजक, व्यापारी यांचे म्हणणे राज्य शासनाकडे पाठवू. मात्र, जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही, यादृष्टीने सर्व उद्योगांनी पूर्वकाळजी घेणे आवश्यक आहे. पहिल्या लाटेत लॉकडाऊनमुळे उद्योग व्यवसाय पूर्ण बंद राहिले. त्यामुळे अर्थचक्र पूर्णपणे थांबल्याचे चित्र होते. संभाव्य तिसऱ्या लाटेत अर्थचक्र सुरळीत सुरू राहावे, याबाबत आवश्यक उपाययोजना करण्यासाठी आता उद्योजकांनीच पुढाकार घेतला आहे.

--------

..यावर भर देणार

शंभर बेडचे कोविड सेंटर

प्रत्येक कामगाराची रोज तपासणी

कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन

इतर गावातून येणाऱ्या कामगारांचे आरोग्य कार्ड

--------

जिल्ह्यात तीन हजार उद्योग

जिल्ह्यात तीन हजार उद्योग असून, तेथे एक लाखाहून अधिक कामगार काम करीत आहेत. कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करीत कशाप्रकारे हे उद्योग सुरू ठेवता येतील, यासंदर्भात उद्योजक प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. बराचसा कामगारवर्ग हा बाहेररून ये-जा करणारा असतो. त्यामुळे तो प्रतिबंधित क्षेत्रातून येणारा नसावा. उद्योगातील एखाद्याला जरी कोरोनाची लागण झाली तरी संसर्गाची भीती इतरांना असते. त्याचा परिणाम उद्योगांवर होतो, ही बाबही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केली.

------------

फोटो- १५कलेक्टर

एमआयडीसी येथील उद्योजकांशी चर्चा करताना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले. समवेत अरविंद पारगावकर व उद्योजक.