शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अगस्ती बंद पाडायला निघालेय कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:14 IST

अकोले : अगस्ती साखर कारखाना पुन्हा बंद होऊ नये असे तालुक्यातील प्रत्येकाला वाटत आहे. कारखाना बंद झाला तर कामगार, ...

अकोले : अगस्ती साखर कारखाना पुन्हा बंद होऊ नये असे तालुक्यातील प्रत्येकाला वाटत आहे. कारखाना बंद झाला तर कामगार, ऊस उत्पादक व बाजारपेठ यावर परिणाम होईल. मात्र, अगस्ती बंद पाडायला नेमके कोण निघाले आहे, हे जनतेला कळणे गरजेचे आहे.

अगस्ती साखर कारखाना आर्थिक कडेलोटाच्या उंबरठ्यावर असल्याची बाब शेतकरी नेते दशरथ सावंत, बी. जे. देशमुख हे ऊस उत्पादक यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत. सुरुवातीला या मोहिमेत बरेच शेतकरी होते. त्यातील काही आता कमी झाले.

दुसरीकडे कारखान्यात आर्थिक गैरव्यवहार झाला असेल तर त्याची सहकार खात्याकडून चौकशी होऊन त्यात संचालक मंडळ दोषी आढळल्यास कारवाई होईलच, पण सध्या गळीत हंगाम पूर्वतयारीच्या काळात संस्थेची प्रतिमा मलिन झाल्यास वित्त संस्था कर्ज पुरवठा करण्यास कचरतील. संचालक आपल्या स्वमालमत्तेवर बोजा चढवून कारखान्यासाठी कर्ज घेऊन निधी उभा करतात, ही अगस्तीची परंपरा राज्याच्या सहकार पटलावर आहे. मात्र, डोईवर कर्ज घेऊन देखील संचालक मंडळाची बदनामी होत असेल तर एकत्रित राजीनामा देऊ, असा पवित्रा विद्यमान संचालकांनी घेतला आहे. कारखाना बंद पडू देण्याची त्यांची भूमिका असली तरी बदनामी नको ? असे संचालक बोलताना दिसतात.

तिसरीकडे कामगार संघटनेने सभा घेऊन वेळेप्रसंगी कामगार स्वतःच्या माथी कर्ज घेतील, पण कारखाना बंद पडू देणार नाही, असा नारा दिला. ऊस तोडणी कामगार यांचे करार, यंत्रसामग्रीची मलमपट्टी वेळेत झाली नाही तर गळीत हंगाम सुरू होणार नाही, अशी भीती व्यक्त करत तूर्त आरोप-प्रत्यारोप थांबवावे असे कामगारांना वाटते.

तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी वेट अँड वाॅचच्या भूमिकेत सध्या असले तरी वेळेत ऊस तोडला जावा म्हणून कारखाना बंद पडू नये ही अपेक्षा धरून आहे. कार्यक्षेत्रात जवळपास चार-साडेचार लाख मॅट्रिक टन ऊस गाळपासाठी उभा आहे. कारखान्याची आर्थिक बाजू चव्हाट्यावर आणल्यावर कोणाचे नुकसान होणार? हे प्रश्न असले तरी प्रत्येक सभासदाच्या मनात आर्थिक स्थिती जाणून घेण्याची उत्सुकता लपून राहिलेली नाही.

संचालक मंडळ म्हणते, आर्थिक ठपका आला तर स्व मालमत्ता विकून पैसे भरू. शेतकरी नेते म्हणतात, आम्ही फक्त आर्थिक स्थिती लोकांपुढे मांडतोय, तर कामगारांची गळीत हंगाम सुरू करण्याची धडपड रास्त आहे.

अनेक प्रश्न असून सत्तेच्या राजकीय सारीपटाभोवती हे चक्र अडकून पडले यात शंका नाही.

.................

अगस्तीत सत्ता बदल झाला तेव्हा एक वर्ष कारखाना सुरळीत चालला, दुसऱ्या वर्षी कामगारांनी अध्यक्ष-उपाध्यक्ष यांच्या घरावर मोर्चा काढण्याची भाषा केल्याने त्यांनी राजीनामे दिले. तेव्हा कारखाना बंद पाडल्याचे खापर सुकाणू समितीवर फोडू नये. आर्थिक उधळपट्टीमुळे भविष्यात कारखाना बंद पडू नये म्हणून जनजागृती सुरू आहे. ऊस उत्पादक सभासद झोपेच सोंग घेत असेल तर लढा करायचा कुणासाठी? आर्थिक उधळपट्टीने कारखाना बंद पडल्यास कामगार दोष कुणाला देतील.

- शेतकरी नेते दशरथ सावंत