शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
7
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
8
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
9
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
10
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
11
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
12
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
13
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
14
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
15
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
16
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
17
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
18
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
20
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

साखर आणखी भडकणार

By admin | Updated: September 14, 2016 23:23 IST

मिलिंदकुमार साळवे, अहमदनगर सरकारने विविध स्तरावर साखरेबाबत घातलेल्या मर्यादांमुळे साखर आणखीच महागणार आहे. कोणत्याही नियंत्रणामुळे बाजारपेठेतील वस्तू स्वस्त होत नाहीत.

मिलिंदकुमार साळवे, अहमदनगरसरकारने विविध स्तरावर साखरेबाबत घातलेल्या मर्यादांमुळे साखर आणखीच महागणार आहे. कोणत्याही नियंत्रणामुळे बाजारपेठेतील वस्तू स्वस्त होत नाहीत. उलट नियंत्रणामुळे महागाई वाढते. त्यामुळे राज्य व देशातील साखर कारखान्यांवर साखरेच्या साठ्यांबाबत घातलेल्या नियंत्रणामुळे साखर स्वस्त होणार नाही तर महागच होणार आहे. एकीकडे साखरेला जादा भाव मिळत असला तरी त्याचा फायदा शेतकऱ्याला मिळू दिला जात नाही, असे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना सांगितले.गोवंश हत्या बंदी व बिफ बंदी विरोधी आंदोलनाच्या नियोजनासाठी येथे आले असता ‘लोकमत’शी बातचीत करताना म्हणाले, ‘गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या उसाला साडेनऊ टक्केच एफ. आर. पी. (किफायतशीर आधारभूत किंमत)प्रमाणे पेमेंट दिले जात आहे. पण तीन वर्षांमध्ये महागाईसोबत सरकारी सेवक व आमदार, खासदारांच्या पगारांमध्ये घसघशीत वाढ झाली आहे. पण उसाच्या भावात दरवाढ झाली नाही. २०१४-१५ ते १६-१७ या तीनही हंगामात एफ.आर.पी.मध्ये वाढ झाली नाही. ही बाब शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे. याविषयी दोन्ही काँग्रेसवाले सरकारशी संगनमत करुन गप्प का आहेत? बाराशे रुपयांवरील साखरेचा भाव प्रति क्विंटल ३६०० रूपयांवर पोहोचला आहे. साखरेवरील मर्यादांमुळे भाववाढ आणखी होणार आहे. नियंत्रणामुळे स्वस्ताई होत न होता महागाई वाढते. उत्पादन वाढल्याशिवाय स्वस्ताई होत नाही. साखरेला सुरुवातीला ४५ रूपये प्रति पोते अनुदानाचा निर्णय झाला. नंतर तो रद्द केला. जागतिक भाववाढीने नंतर कर लावला. एकाच हंगामात तीन तीन निर्णय घेण्यात आले. नंतर त्यांचीही धरसोड झाली. घेतलेले निर्णय मागे घ्यावे लागले. साखरेला भाव मिळून व्यापाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत असला तरी शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे जादा मिळू शकले नाहीत. साखरेला भाव मिळाला तरी शेतकऱ्याच्या उसाला भाव मिळू दिला जात नाही. शेतीमालास भाव मिळून शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शेतीबाबत दीर्घ मुदतीचे धोरण आखण्याची गरज आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या आडतमुक्त व्हायलाच पाहिजेत. कृषी राज्यमंत्र्यांनी मुंबईच्या बाजारात बसून शेतकऱ्यांचा शेतमाल विकला. पण नंतर आडतमुक्तीचे काय झाले? हेच समजले नाही. आडत घेत नाही म्हणत काही समित्या अ‍ॅडव्हान्स घेत आहेत. शेतमाल आधारभूत किंमतीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. ’