शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

अंकुरलेल्या सोयाबीन पिकाला तुषार सिंचनाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:14 IST

खरीप हंगामात सुरुवातीला राहाता तालुक्यात सलग भागात पाऊस न पडता ठिकठिकाणच्या भागांत पेरणीयोग्य पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ...

खरीप हंगामात सुरुवातीला राहाता तालुक्यात सलग भागात पाऊस न पडता ठिकठिकाणच्या भागांत पेरणीयोग्य पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात खरीप पिकांची पेरणी केली आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जमिनीवर निघालेली ही पिके आता संकटात सापडली आहेत. अनेक भागांत तुषार सिंचनाचा आधार घेत पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचे दिसत आहे.

तालुक्यात यावर्षी साडेसोळा हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणीचे उद्दिष्ट आहे. खरीप पेरणीचा कालावधी जवळपास संपायला आला, तरी तालुक्यात अवघ्या साडेचार ते पाच हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झालेली आहे. पाऊस कमी प्रमाणात असलेल्या भागात तर अजूनही अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे, ते शेतकरी पावसाने दडी मारल्याने आता तुषार सिंचनाचा आधार घेत अंकुरलेले पीक वाचविण्यासाठी मोठी कसरत करत आहेत.

.................

एकीकडे मुसळधार पाऊस, दुसरीकडे विकतचे पाणी...

राहाता तालुक्यात सोमवारी (दि. ५) सायंकाळी आडगाव या गावच्या परिसरात अक्षरशः ढगफुटीसदृश पाऊस झाला. तर, या गावच्या लगतच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या खडकेवाके शिवारात सध्या विकत पाणी घेऊन शेतकरी पिके वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

....................

पावसाच्या आगमनाची डोळे लावून वाट पाहत आहोत. पण, पावसाचे दर्शन काही होईना. जर येत्या काही दिवसांत पाऊस पडला नाही, तर शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अवेळी आणि अपुऱ्या पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना नापिकीला सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी कमालीचा धास्तावला आहे. आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी तरी बऱ्यापैकी पाऊस होईल, या आशेने बी-बियाणे व खताची जुळवाजुळव केली आहे.

- रामप्रसाद मगर, शेतकरी, गोगलगाव

....................

दरवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस सुरुवातीलाच कमी झाला. त्यामुळे थोडीशी ओल आली. या ओलीचा आधार घेत महागडे बियाणे घेऊन पेरणी केली. मात्र, पाऊस नसल्याने पीक उगवेल की नाही, अशी शंका आहे. त्यामुळे आता तुषार सिंचनाचा आधार घेत अंकुरलेल्या पिकांना वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे. अगोदरच शेतकरी देशोधडीला लागले आहेत. पुन्हा खर्च करून हातात काहीच पडले नाही, तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

-राजू धनवटे, शेतकरी, वाकडी