शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

सहा हजार हेक्टरवर पेरणी

By admin | Updated: March 3, 2023 15:53 IST

अहमदनगर : खरीप हंगामासाठी ६ हजार १२५ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट आहे. या हंगामासाठी २ लाख ५५ हजार ४०० मेट्रीक टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली आहे.

अहमदनगर : खरीप हंगामासाठी ६ हजार १२५ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट आहे. या हंगामासाठी २ लाख ५५ हजार ४०० मेट्रीक टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली आहे. बाजरी, भात, मका, कडधान्य, तेलबिया, सोयाबीन, कापूस (पाकीट) आदींच्या बियाणांची मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. आगामी खरीप हंगामात शेतकर्‍यांना बी-बियाणे, खते आदी कृषी निविष्ठा वेळेवर उपलब्ध व्हाव्यात यासाठी कृषी विभागाने आवश्यक तो समन्वय राखावा, म्हणजे खरीप हंगाम यशस्वी होण्यास मदत होईल, अशी आशा जिल्हाधिकारी कवडे यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, कृषी उपसंचालक शिरीष जाधव, कृषी विकास अधिकारी विलास नलगे, आत्माचे प्रकल्प संचालक शिवाजी आमले आदींसह राजेश परजणे व इतर अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कवडे म्हणाले, गेल्या काही वर्षातील अनुभव लक्षात घेता, शेतकर्‍यांना बियाणे, खते वेळेवर उपलब्ध व्हावीत, छापील किमतीपेक्षा अधिक दराने विक्री होऊ नये. कृषी निविष्ठा उपलब्धतेबाबत शेतकर्‍यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ नये, खते कधी आणि केव्हा उपलब्ध होतील याची माहिती शेतकर्‍यांना द्यावी. वितरण करताना कोणती कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे, याची पूर्वकल्पना देण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील प्रत्येक महसूल मंडळात पर्जन्यमापक यंत्र बसवण्यात आले आहे. जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच ५९२ मि.मी. पाऊस झालेला असला तरी आगामी अंदाजानुसार सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचे संकेत आहेत. अशा परिस्थितीत कृषी विभाग, कृषी विद्यापीठाने पीक पद्धतीबाबत शेतकर्‍यांना योग्य ते मार्गदर्शन करावे, पिकांबाबात आकस्मिक योजना तयार हवी. पीक पद्धतीत बदलाबाबत जिल्हास्तरावर कार्यशाळा घेऊन जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कवडे यांनी दिले. कृषी निविष्ठा कृषी निविष्ठांच्या गुणनियंत्रणासाठी जिल्हा स्तरावर ६ गुणनियंत्रण निरीक्षक, उपविभागस्तरावर ८, तालुकास्तरावर २८ असे एकूण ४२ निरीक्षक आहेत. जिल्ह्यात परवानाधारक बियाणे वितरक १ हजार ८१६, खते वितरक १ हजार ८७७ तर किटकनाशके वितरक १ हजार ८८१ आहेत.