शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या लॉकडाऊनने कालवले वैवाहिक जीवनात विष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:25 IST

अहमदनगर : घाई-गडबडीत उरकलेले लग्न, त्यातच कोरोनामुळे निर्माण झालेली बेरोजगारी, आर्थिक अडचणीमुळे एकमेकांकडून होणारा अपेक्षाभंग आदी कारणांमुळे वाद विकोपाला ...

अहमदनगर : घाई-गडबडीत उरकलेले लग्न, त्यातच कोरोनामुळे निर्माण झालेली बेरोजगारी, आर्थिक अडचणीमुळे एकमेकांकडून होणारा अपेक्षाभंग आदी कारणांमुळे वाद विकोपाला जाऊन गेल्या पाच महिन्यांत येथील भरोसा सेलकडे तब्बल ८१७ विवाहितांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. यातील ९० टक्के तक्रारी या महिलांकडून आलेल्या आहेत.

कोरोनाची पहिली लाट ओसरत नाही तोच दुसरी लाट आली. लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले, नोकऱ्या गेल्या. कामधंदा नसल्याने २४ तास घरात बसण्याची वेळ आली. आर्थिक अडचणीतून वाढलेली चिडचिड, संकटकाळात एकमेकांना समजून न घेणे यामुळे अनेक कुटुंबात वाद उद‌्भवले. पतीकडून पत्नीला मारहाण, मानसिक छळ, पत्नीच्या वाढलेल्या अपेक्षा अशा एक ना अनेक कारणातून दुरावा निर्माण होऊन आता ‘एकत्र राहायचेच नाही’ या मानसिकतेतून लॉकडाऊन काळातही भरोसासेलकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत.

.......

१८६ जोडप्यांचा संसार सुरळीत

लॉकडाऊन काळात तक्रारी दाखल झाल्यानंतर भरोसा सेलच्या उपनिरीक्षक पल्लवी उंबरहंडे यांच्यासह सहाय्यक फौजदार राजेंद्र वाघ, हेडकॉन्स्टेबल उमेश इंगवले व इतर कर्मचाऱ्यांनी तक्रारदार महिलेसह तिच्या पतीचे व नातेवाइकांचे समुपदेशन करून त्यांच्यातील वाद मिटविले. अशा १८६ जोडप्यांचा संसार पुन्हा नव्याने फुलला आहे. तक्रारीची पडताळणी करून ११२ प्रकरणात गुन्हे दाखल करण्याची शिफारस करण्यात आली, तर २३ पीडित महिलांना संरक्षण अधिकाऱ्याची मदत देण्यात आली आहे.

.........

कोरोना से नही साथ रहेनेसे डर लगता है

कोरोनाची भीती वाटत नाही. कोरोना झाला तरी उपचार घेऊन बरे होता येते. मात्र एकत्र राहत असल्याने आमच्यात शुल्लक कारणातून वाद होत आहेत. असे तक्रारदार महिलांचे म्हणणे आहे. पती वेळ देत नाही, मोबाइलवर जास्त बोलतो. पती त्याच्या मैत्रिणींना फोन करतो, घरात पैसे नाहीत, संसार करायचा कसा, सासू-सासरे समजून घेत नाहीत. अशा स्वरूपांच्या तक्रारी आहेत.

........

काय सांगते आकडेवारी

जानेवारी ते मे (२०२१)

८१७ तक्रारी दाखल

४०९ तक्रारींची निर्गती

४०८ तक्रारी प्रलंबित

.......

जानेवारी ते मे (२०२०)

४५० तक्रार दाखल

सर्व तक्रारींची निर्गती

........

कुठल्याही संकटकाळात पती-पत्नीने एकमेकांना समजून घेतले तर वाद निर्माण होत नाहीत. संसार दोघांचाही आहे, असा विचार करून अडचणीतून मार्ग काढावा. मागील पाच महिन्यात दाखल झालेल्या तक्रारींवर काम करत जास्तीत जास्त वाद मिटविण्याचे प्रयत्न केले. काही महिलांना पुढील कायदेशीर मदत देण्यात आली. जिल्हा पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाकाळातील बंदोबस्त सांभाळून भरोसा सेलमधील सर्व कर्मचाऱ्यांनी नियमित कामही केले. एकही दिवस हे कार्यालय बंद नव्हते. त्यामुळे जास्तीत जास्त तक्रारी निकाली निघाल्या.

- पल्लवी उंबरहंडे, उपनिरीक्षक भरोसा सेल

.........

समुपदेशन प्रभावी मार्ग

बहुतांशी पती-पत्नीमध्ये अगदी शुल्लक कारणावरून वाद उद‌्भवतात. पुढे होणाऱ्या परिणामांची त्यांना जाणीव नसते. अशा परिस्थितीत दोघांचेही समुपदेशन केल्यानंतर त्यांचे मनपरिवर्तन होऊन ते पुन्हा एकत्र येतात. काही प्रकरणांमध्ये महिलांना पुढील कायदेशीर मदत दिली जाते. तसेच तक्रारदार महिलेवर अन्याय होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात येत असल्याचे भरोसा सेलमधील समुपदेशक तथा हेड कॉन्स्टेबल राजेंद्र वाघ व हेड कॉन्स्टेबल उमेश इंगवले यांनी सांगितले.