शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

अकरा वर्षांत जिल्हा परिषदेकडून ३०८ कोटींची घरपट्टी वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिल्हा परिषदेकडून दरवर्षी जिल्ह्यातून सरासरी ३० ते ३५ कोटी रुपये घरपट्टीपोटी वसूल केले जातात. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : जिल्हा परिषदेकडून दरवर्षी जिल्ह्यातून सरासरी ३० ते ३५ कोटी रुपये घरपट्टीपोटी वसूल केले जातात. गेल्या दहा वर्षांत जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील सुमारे साडेआठ लाख कुटुंबांकडून ३०८ कोटी रुपयांची घरपट्टी वसूल केली आहे. वसुलीचे हे प्रमाण साधारण ८५ टक्के आहे. प्रत्येक गावातून घरपट्टीपोटी ग्रामपंचायतमार्फत कर गोळा केला जातो. आर्थिक वर्षाच्या अखेर हा कर गोळा करून जिल्हा परिषदेकडे भरला जातो. ग्रामीण भागात लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतींमध्ये ५०० ते १५०० रुपयांपर्यंत घरपट्टी प्रति एक हजार चौरस फुटांपर्यंतच्या घरांना वसूल केली जाते. यात व्यापारी कारणास्तव दिलेल्या किंवा भाड्याने दिलेल्या घरांसाठी व्यावसायिक दराने घरपट्टीची वसुली करण्याची तरतूद आहे. या अकरा वर्षांपैकी सन २०१०-११ व २०१४-१५ या दोन वर्षांमध्ये घरपट्टीची वसुली विक्रमी ९० टक्क्यांपेक्षा जास्त झाली होती. तर २०१५-१६ व २०१७-१८मध्ये वसुलीचे प्रमाण कमी होऊन ते अनुक्रमे ७६ व ७८ टक्के झाले.

नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील (महापालिका, नगरपालिका वगळून) लोकसंख्या ४२ लाख असून कुटुंबांची संख्या ८ लाख ३८ हजार आहे. त्यांच्याकडून मागील २०२०-२१ या आर्थिक वर्षात ४७ कोटी रुपये घरपट्टीची रक्कम वसुलीस पात्र होती. त्यापैकी ३८ कोटी १२ लाख रुपयांची (८१ टक्के) वसुली झाली.

दरम्यान, २०१०-११ ते २०२०-२१ या अकरा वर्षांत वसुलीपात्र ३६१ कोटींपैकी ३०८ कोटींची वसुली झाली. वसुलीचे हे प्रमाण ८५.३४ टक्के आहे.

-----------

गेल्या अकरा वर्षांतील घरपट्टी वसुली

वर्ष वसुली टक्केवारी

२०१०-११ ९.८९ कोटी ९८.८८

२०११-१२ १२.३७ कोटी ८९.५१

२०१२-१३ २६.४१ कोटी ८५.७२

२०१३-१४ ३०.२९ कोटी ८९.५०

२०१४-१५ ३१.६५ कोटी ९२.४२

२०१५-१६ २६.५४ कोटी ७८.४५

२०१६-१७ ३५.८० कोटी ८९.३०

२०१७-१८ ३२.२० कोटी ७८.४५

२०१८-१९ ३२.७३ कोटी ८६.११

२०१९-२० ३२.७८ कोटी ८५.३४

२०२०-२१ ३८.१२ कोटी ८१.१०

-----------------------------------

एकूण ३०८.७३ कोटी ८५.३४

-----------------

तर जिल्हा परिषदेची उत्पन्नवाढ...

जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत जि.प. सदस्य राजेश परजणे यांनी जिल्हा परिषदेचे किती कर्मचारी मुख्यालयी म्हणजे ते ज्या ठिकाणी नियुक्त आहेत, त्या गावात राहतात, याची माहिती प्रशासनाला विचारली होती. त्यावर जवळपास ९९ टक्के म्हणजे १५ हजार कर्मचारी (यात ११ हजार शिक्षक आहेेत) मुख्यालयी राहतात, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. जर हे कर्मचारी मुख्यालयी भाडेतत्वावर राहतात, तर त्यांच्याकडून व्यावसायिक पद्धतीने भाडेवसुली करणे गरजेचे आहे. त्यातून जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढेल, असा मुद्दा परजणे यांनी उपस्थित केला होता. त्यावर ग्रामपंचायत विभागानेही अशी वसुली व्यावसायिक दरानेच होते, अशी माहिती सभागृहाला दिली. खरंच ही वसुली होत असेल तर त्यातून जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात वाढ होईल.