शहरं
Join us  
Trending Stories
1
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
2
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
3
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
4
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
5
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
6
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
7
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
8
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
9
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
10
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
11
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
12
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
13
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
14
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
15
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
16
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
17
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
18
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
19
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
20
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेचे अध्यक्षपद कॉंग्रेसकडेच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:16 IST

अहमदनगर : विधिमंडळाच्या सोमवारी पार पडलेल्या अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणून शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी चांगले काम केले आहे. ...

अहमदनगर : विधिमंडळाच्या सोमवारी पार पडलेल्या अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणून शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी चांगले काम केले आहे. याचा अर्थ विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला किंवा भास्कर जाधव यांना देण्याचा कोणताही विचार नाही. काँग्रेसमध्येही अनेक भास्कर जाधव आहेत, असे सांगत विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

महसूलमंत्री थोरात यांनी शनिवारी अहमदनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. विधानसभेत तालिका अध्यक्ष म्हणून जाधव यांच्या कामाचे सध्या कौतुक होत आहे. त्यानंतर त्यांना अध्यक्षपद देण्याची चर्चा सुरू आहे. तसेच वनमंत्री संजय राठोड यांच्या रिक्त जागेवर काँग्रेसला मंत्रीपद व शिवसेनेला अध्यक्षपद देण्याबाबत चर्चा सुरू आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, जाधव यांनी अधिवेशनात चांगलेच काम केले. म्हणून त्यांनाच हे पद द्यावे, असे काही नाही. काँग्रेसमध्येही सक्षमपणे काम करू शकणारे नेते आहेत. शिवाय जागा वाटपात हे पद काँग्रेसकडे आहे. त्यामध्ये बदल करण्यासंबंधी कोणतीही चर्चा झालेली नाही. तसा कोणताही विचार नाही. अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशात होऊ शकली नाही. त्यासाठी बरीच मोठी प्रक्रिया आहे. त्यात कोरोनामुळे अधिवेशन दोनच दिवसांचे होते. दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. शुक्रवारी मी आणि मंत्री नितीन राऊत आपापल्या कामासाठी दिल्लीत होतो. अध्यक्षपद निवड किंवा अदलाबदलीच्या विषयांचा या दौऱ्याशी कोणताही संबंध नव्हता. पूर्वी माझ्या एकट्यावरच कामाचा ताण जास्त होता. पक्षातील आणि सरकारमधीलही महत्त्वाची पदे आणि जबाबदाऱ्या माझ्याकडेच होत्या. त्यामुळे पक्षाने तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले यांना त्या पदाचा राजीनामा देऊन प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. यामुळे या पदावरील पक्षाचा दावा गेलेला नाही. अध्यक्षपद काँग्रेसकडेच असून जेव्हा निवडणूक होईल, त्यावेळी त्या पदावर सक्षम नेता दिला जाईल. तसे उमेदवार आमच्या पक्षात आहेत, असे थोरात यांनी स्पष्ट केले.

----------

इंधन दरवाढीने अटलबिहारींचा आत्मा दुखावला असेल

देशात काँग्रेसची सत्ता असताना पेट्रोलचे दर सात पैशांनी वाढले होते. त्यावेळी स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी लोकसभेवर बैलगाडीचा मोर्चा काढला होता. तोच व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. आज शंभर रुपयांच्या पुढे पेट्रोल गेल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांचा आत्मा दुखावला असेल, असे सांगत थोरात यांनी केंद्र सरकारवर टीका केली. महागाईमुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. भाजपची सत्ता असलेल्या राज्यात कोरोनाची स्थिती भयावह होती. नाशिकचा अपघात वगळता राज्यात कोरोना नियंत्रणात सरकारला मोठे यश आल्याचे ते म्हणाले.

------------

सहकार मंत्रालयाचा हेतू समजला नाही

केंद्र सरकारमध्ये सहकार मंत्रालय निर्माण करण्यात आले आहे. या खात्याचा हेतू मात्र कळाला नाही. रिझर्व्ह बँकेचे सर्वच बँकांवर यापुढील काळात नियंत्रण राहणार आहेत. चेअरमन, संचालक यांचे अधिकार कमी करून टाकले आहेत. हे मात्र सहकाराच्या तत्त्वाला धरून नाही. त्यांचे काही चुकले असेल तर शिक्षा झाली पाहिजे. मात्र, सहकार टिकला पाहिजे. नव्या मंत्रालयामुळे सहकार अधिक टिकला तर चांगलेच आहे, असे थोरात म्हणाले.