शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंत्राटी कामगार करणार निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:21 IST

अहमदनगर : महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तिन्ही वीज कंपन्यांमधील कामगार आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. मात्र, त्यांचा ...

अहमदनगर : महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तिन्ही वीज कंपन्यांमधील कामगार आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. मात्र, त्यांचा अद्याप पगार झाला नसल्याने सर्व कंत्राटी कामगार मंगळवारी निषेध करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे जिल्हाध्यत्र ए. एम. लांडगे यांनी पत्रकात दिली आहे.

याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही वीज कंपनीत सुमारे ३२ हजार वीज कंत्राटी कामगार नियमित रिक्त पदांच्या जागेवर मागील १५ ते २० वर्षे कार्यरत आहेत. मागील वर्षभर कोरोनाकाळात या कामगारांनी वीजनिर्मिती, वीजवहन, वीज वितरण करत आपला जीव धोक्यात घालून विक्रमी महसूल गोळा करून दिला आहे. राज्याला अखंडित व सुरळीत वीजपुरवठा सेवा देताना ४० कंत्राटी कामगारांचा अपघातात मृत्यू झाला. मात्र, त्यांच्याकडे शासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. औरंगाबाद रेल्वे अपघातात परप्रांतीयांना ५ लाख, मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसाला १० लाख तर भंडारा, विरार, नाशिकसारख्या दुर्घटनेतील मृत रुग्णांच्या नातेवाईकांना ५ ते १० लाख रुपये शासनाने दिले. ऊर्जा खात्यातील कंत्राटी कामगारांनी या राज्याला महसूल मिळवून दिला, अखंडित व सुरळीत वीज सेवा दिली हा त्यांचा गुन्हा आहे का ? काम करून पगारासाठी कामगारांना दोन-तीन महिने ताटकळत बसावे लागत आहे. याला जबाबदार कोण ? असा सवाल पत्रकात करण्यात आला आहे.