शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
3
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
4
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
5
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
6
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
7
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
8
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
9
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
10
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
11
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
12
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
13
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
14
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
15
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
16
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
17
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
18
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
19
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
20
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
Daily Top 2Weekly Top 5

अकोले तालुक्यातून डाळिंब होतेय हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:14 IST

अकोले : तालुक्यातील वीरगाव, हिवरगाव, डोंगरगाव, गणोरे, पिंपळगाव निपाणी यासह परिसरातील गावचा शिवार डाळिंबाचे आगार म्हणून ओळखला जायचा. मात्र ...

अकोले : तालुक्यातील वीरगाव, हिवरगाव, डोंगरगाव, गणोरे, पिंपळगाव निपाणी यासह परिसरातील गावचा शिवार डाळिंबाचे आगार म्हणून ओळखला जायचा. मात्र गेल्या काही वर्षांत तेल्या रोग आणि चुकीच्या मार्गदर्शनामुळे जवळपास ८२ टक्के डाळिंबाचे क्षेत्र घटले आहे. आता डाळिबांची जागा जागा द्राक्ष, ऊस, कांदा व भाजीपाल्याने घेतली आहे. त्यामुळे तालुक्यातून डाळिंब हद्दपार होऊ लागले आहे.

देश-विदेशातील बाजारपेठेत गुणवत्तेत सरस ठरलेली, निर्यातक्षम तालुक्याची डाळिंब शेती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तेल्या, मर रोग आणि शेतातील बोगस कृषी डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे डाळिंब क्षेत्र कमालीचे घटले आहे. दहा वर्षांपूर्वी तालुक्यात अडीच हजार हेक्टरवर डाळिंब शेती उभी होती. सध्या जेमतेम साडे चारशे हेक्टरवर डाळिंब तग धरून आहे.

राज्यात रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड सुरू होण्यापूर्वी १९८९-९०मध्ये नगण्य प्रमाणावर डाळिंब शेती होती. त्यानंतर फळबाग शेतीबाबत शेतकऱ्यांची वाढलेली सकारात्मकता आणि जागतिकीकरणाच्या धोरणात जगाची बाजारपेठ खुली झाल्याने शाश्वत आणि अधिक उत्पन्नाची हमी डाळिंब पिकामुळे मिळाली. २०१०पर्यंत डाळिंब क्षेत्रात मोठी वाढ झाली.

त्यानंतर हळूहळू तेल्या, मररोग, बुरशीजन्य आजाराने डाळिंब शेतीला झपाटल्याने फळबागा मरणासन्न अवस्थेला गेल्या. रोगांचे अतिक्रमण आणि बागांमध्ये घुसलेले बोगस मार्गदर्शक ही दोन्ही संकटे डाळिंबाच्या मुळावर आली आहेत. सल्ल्यामुळे एकरी उत्पादन खर्च तर वाढतोच, शिवाय पीक संकटात ढकलले जाते.

डाळिंब उत्पादकांना चुकीचे सल्ले मिळत असल्याने तसेच बदललेला निसर्ग, वाढते जागतिक तापमान, रोगांचे आक्रमण यामुळे डाळिंबाचे क्षेत्रफळ घटत चालले आहे.

.......................

गावपारावरील शेतीविषयक सल्लागार चुकीचा सल्ला देतात. त्यामुळे डाळिंब शेतीचे नुकसान झाले आहे. सजग होऊन पिकांवर वेळोवेळी येणारे रोग निवारणासाठी शिकलेल्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. शेतीविषयक कोणतेही संकट आल्यास शेतकऱ्यांनी कृषी खात्याशी संपर्क साधावा. कृषी सहायकांचे मार्गदर्शन घ्यावे.

- प्रवीण गोसावी, तालुका कृषी अधिकारी

...................

वीरगाव, पिंपळगाव, वडगाव या डाळिंबाच्या आगारात केवळ १८ टक्के डाळिंब पीक तग धरून आहे. भाजीपाला वाढला. आता शेतकऱ्यांनी योग्य मार्गदर्शन न घेतल्यास शेतीचे मोठे नुकसान होऊ शकते.

- ज्ञानेश्वर खुळे, शेतकरी, वीरगाव