शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांच्या गावांतील मतदान फुटले!

By admin | Updated: March 20, 2024 11:47 IST

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांनी आघाडीच्या मनसुब्यांना धक्का तर दिलाच; पण त्यांच्या बाजूने उभे राहिलेल्या शिलेदारांची ठाणेही काबीज केली.

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांनी आघाडीच्या मनसुब्यांना धक्का तर दिलाच; पण त्यांच्या बाजूने उभे राहिलेल्या शिलेदारांची ठाणेही काबीज केली. मात्तबरांच्या मुलखातही महायुतीच्या विजयाचा वारू चांगलाच उधळला. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आमदार बबनराव पाचपुते, शिवाजीराव नागवडे, प्रताप ढाकणे यांच्या गावात चक्क गांधींना मताधिक्क्य मिळाले! तर कॉँग्रेसचे मंत्री थोरात, विखे तसेच राष्टÑवादीचे नेते मधुकर पिचड, शंकरराव कोल्हे, भानुदास मुरकुटे व यशवंतराव गडाख, जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांना त्यांच्या गावातील मतदारांनीही शिर्डी मतदारसंघात सेनेचे सदाशिव लोखंडे यांना भरभरुन मतदान केले. शिर्डी मतदारसंघात कॉँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे, आमदार भाऊसाहेब कांबळे, राष्टÑवादीचे आमदार शंकरराव गडाख व मंत्री मधुकर पिचड या दिग्गज नेत्यांचे विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील कांबळे वगळता उर्वरित सगळेच सहकार सम्राट. या माध्यमातून त्यांची ग्रामीण भागावर चांगली पकड. पण ती ही मोदी लाटेत सैल झाल्याचे निकालातून समोर आले. राजळेंच्या गावात गांधींना मते नगर मतदारसंघात आघाडीच्या नेत्यांनी राजीव राजळे यांना लीड तर दिला नाहीच, पण गांधींना आपापल्या गावांतून आघाडी दिली. पाचपुते यांच्या काष्टीतून गांधींना ३७१, नागवडेंच्या वांगदरीत ५२४ मतांचे मताधिक्क्य मिळाले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपातून राष्ट्रवादीत आलेल्या ढाकणेंच्या अकोल्यातही राजळेंपेक्षा गांधींना ५ मते जास्तीची आहेत. घुलेंच्या दहिगाव ने मध्येही तसेच जि.प. सदस्य सुजित झावरेंच्या वासुंदे येथेही गांधींनी जवळपास निम्मी मते घेतली.एकीकडे ही स्थिती असली तरी भाजपाच्या आ. राम शिंदे यांच्या चौंडीत राजळेंनाही मताधिक्क्य मिळाले नसले तरी त्यांनी निम्मी मते घेतली. आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या बुºहाणनगर केंद्रावरही राजळेंना २५ टक्के मते मिळाली. राजळेंच्या स्वत:च्या गावात गांधींना १० टक्के मते मिळाली आहेत. साखरसम्राट घरातच निष्प्रभ शिर्डी मतदार संघात राष्टÑवादी, कॉँग्रेसचे दिग्गज नेते आहेत. सहकारसम्राट असलेल्या या नेत्यांच्या हाती ग्रामीण भागाच्या विकासाच्या नाड्या एकवटल्या. ग्रामीण भागातील जनता आपल्यापुढे जात नाही. शिर्डी मतदारसंघात कृषीमंत्री राधाकृष्ण विखे व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे गाव येते. विखे व थोरात यांच्या गावातूनच आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे हे पिछाडीवर पडले. थोरात यांच्या जोर्वे गावातील तीन मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानापैकी वाकचौरे यांना ५१५ तर महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना १ हजार ३१३ मतदान पडले. विखे यांच्या लोणी बु.मध्ये वाकचौरे यांना १ हजार १७० तर लोखंडे यांना २ हजार ५५० इतके मतदान झाले. कॉँग्रेसचे मंत्री असलेल्या विखे,थोरात यांच्या गावातूनच आघाडीचे उमेदवार वाकचौरे यांच्यापेक्षा लोखंडे यांनी दुपटीने लीड घेतले. राजूरमध्ये लोखंडे दुप्पट राष्टÑवादीचे मंत्री मधुकर पिचड यांच्या राजूर गावातही महायुतीचे लोखंडे हे वाकचौरे यांच्यापेक्षा दुपटीने लीडवर आहेत. लोखंडे यांना २ हजार ३९८ तर वाकचौरे यांना १ हजार २४४ मते मिळाली. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सोनई गावातही लोखंडे यांना दोन हजार मतांचे लीड आहे. आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे यांना ३ हजार ३५ तर महायुतीचे लोखंडे यांना ५ हजार ७०३ मते मिळाली. याच मतदारसंघातील जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या शिरसगाव गावातही लोखंडे यांना लीड मिळाले. वाकचौरे यांना ४४४ तर लोखंडे यांना ६२४ मते मिळाली. श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर या भानुदास मुरकुटे यांच्या गावातही लोखंडे यांनाच लीड आहे. वाकचौरे यांना ४१० तर लोखंडे यांना ५९३ मते मिळाली आहे. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या येसगावात तर महायुतीचे लोखंडे यांनी तिपटीने मते घेत बाजी मारली. वाकचौरे यांना ३७२ मते मिळाली तर लोखंडे यांना १ हजार ७७ मते मिळाली आहेत. अपेक्षांवर पाणी राहुरी, श्रीगोंदा आणि पाथर्डी-शेवगाव या तालुक्यांतून मताधिक्क्य मिळेल, अशी राजळे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना अपेक्षा होती. मात्र, तेथे झाले उलटेच. राष्ट्रवादीसोबतच काँग्रेसच्या शिवाजीराव नागवडे यांच्याकडून त्यांना मोठी रसद मिळण्याची आशा होती. परंतु ती ही फोल ठरली.