शहरं
Join us  
Trending Stories
1
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
2
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
3
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
4
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
5
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
6
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
7
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
8
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
9
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
10
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
11
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
12
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
13
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
14
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
15
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
16
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
17
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
18
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
19
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
20
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
Daily Top 2Weekly Top 5

फळबागांच्या विमा परताव्याचे ट्रिगर बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:16 IST

या पीक विमा योजनेमध्ये चालू वर्षापासून मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले. विशेषतः फळबागांच्या पीक विमा योजनेतून कमी पावसाचे ट्रिगर ...

या पीक विमा योजनेमध्ये चालू वर्षापासून मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले. विशेषतः फळबागांच्या पीक विमा योजनेतून कमी पावसाचे ट्रिगर हटविण्यात आले आहे. जास्त पावसाबरोबर आर्द्रतेचा ही समावेश यामध्ये करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सगळ्याच तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. कारण जिल्ह्यातील बहुतांशी तालुके पर्जन्यछायेखालील अवर्षणग्रस्त व कमी पावसाचे आहे. डाळिंब फळबागांच्या नवीन पीक विमा प्रस्तावात १५ जुलै ते १५ डिसेंबर दरम्यान जास्त पाऊस व आर्द्रतेचा तीन ट्रिगर करण्यात आल्या आहेत. यामध्ये किमान परतावा मिळण्यासाठी सलग पाच दिवस प्रतिदिन २५ मिमी. पाऊस पडणे आवश्यक आहे. दैनंदिन आर्द्रता ही ८५ टक्क्यांच्या पुढे नोंदली जाणे आवश्यक आहे. म्हणजेच या पाच दिवसात सव्वाशे मिमी. पाऊस होणे आवश्यक आहे. तसेच या पावसाचा दैनिक कालावधी वाढत गेल्यास नुकसान भरपाई सुद्धा वाढणार आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांत तरी कोणत्याही तालुक्यात सलग पाच दिवस २५ मिमी. पेक्षा जास्त पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे विम्याच्या परताव्याचे भवितव्य जवळपास संपुष्टात आले आहे. फळबाग पीक विमा योजनेचे परतावे अन्यायकारक पावसाच्या भागातील शेतकऱ्यांसाठी मिळतील याचीही शक्यताही आता धूसर आहे. केवळ कंपनीच्या एकतर्फी हिताची पर्जन्यछायेखालील अवर्षणग्रस्त कमी योजना असल्याची या निमित्ताने समोर आहे.

जुन्या फळबाग विमा योजनेत १५ जुलै ते १५ ऑगस्ट फळधारणा काळ तसेच १६ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर फळवाढीचा काळ या कालावधीत पावसाचा खंड व कमी पाऊस या ट्रिगरचा समावेश होता. त्यामुळे या दुष्काळी व कमी पावसाच्या भागातील फळबागा या अडीच महिन्यात कमी पावसाच्या ट्रिगरमध्ये पात्र होत होत्या. मात्र सुधारित फळबाग योजनेत कमी पावसाचा ट्रिगर काढल्याने शेतकऱ्यांना फळबागांच्या पीक विम्याचे परतावे मिळणे आता अशक्य आहे. फळबाग पीक विमा योजना अन्यायकारक पावसाच्या भागातील शेतकऱ्यांना मिळतील याची शक्यता नाही, केवळ कंपनीच्या एकतर्फी हिताची पर्जन्यछायेखालील अवर्षणग्रस्त कमी योजना असल्याचे यातून स्पष्ट आहे.

...............

जुनी पीक विमा योजना...

टप्पा १- कमी पाऊस. फळधारणा कालावधी १५ जुलै ते १५ ऑगस्ट.

टप्पा २ कमी पाऊस फळवाढ कालावधी १७ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर.

टप्पा ३- जास्त पाऊस फळ पक्व ते फळ काढणी १६ ऑक्टोबर ते ३० डिसेंबर. वरील योजनेत कमी पावसाच्या भागातील शेतकऱ्यांना टप्पा एक दोनमध्ये परतावे मिळत होते.

............

यावर्षी परत येणार जुनी पीक विमा योजना...

२०२०-२०२१ मध्ये शासनाने फळबागांच्या विमा परताव्याचे ट्रिगर बदलविले होते,हे ट्रिगर क्लिष्ट असल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होऊनही विमा परतावे मिळाले नाही. मात्र चालू वर्षापासून शासनाने २०१९-२०२० पूर्वीचेच ट्रिगर लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्य सरकारच्या कृषी विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.त्यामुळे पुढील वर्षापासून पीक विमा मिळण्याच्या शक्यता तयार झाली आहे.