शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

कंपन्यांकडून सोयाबीनच्या बियाणाची परस्पर विक्री?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:20 IST

टाकळीभान : सोयाबीनला मिळालेल्या उच्चांकी दरामुळे शेतकऱ्यांचा सोयाबीन पेरणीकडे कल वाढला. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन भिजल्याने दर्जेदार बियाण्याचा ...

टाकळीभान : सोयाबीनला मिळालेल्या उच्चांकी दरामुळे शेतकऱ्यांचा सोयाबीन पेरणीकडे कल वाढला. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन भिजल्याने दर्जेदार बियाण्याचा तुटवडा होता. बियाणांची उगवण क्षमतेची अडचण लक्षात घेत बियाणे तयार करणाऱ्या नामवंत कंपन्यांनी सोयाबीनचे बियाणे व्यापाऱ्यांना, ऑईल मिल मालकांना परस्पर विकून टाकले. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त भावाने बियाणे विकत घ्यावे लागले.

श्रीरामपूर तालुक्यात बियाणे खरेदी करताना आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला. चढ्या भावाने बियाणे विकत घ्यावे लागले. अनुदानावर मिळणारे बियाणेही मोजक्याच शेतकऱ्यांना मिळाले. त्यासाठीच्या ऑनलाइन नोंदणीतही मोठा गोंधळ उडाला. अनेक शेतकऱ्यांना ऑनलाइन प्रक्रियाच माहीत नाही. उपलब्ध बियाणेच शेतकऱ्यांनी पेरले. जून महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला. त्याचाही विपरित परिणाम पेरणी झालेल्या सोयाबीनच्या उगवण क्षमतेवर झाला. अनेक भागात उशिरा झालेल्या पावसामुळे सोयाबीनच्या पेरण्या लांबल्या. अनेक शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले. त्यासाठी बियाणे पाहताना पुन्हा शेतकऱ्यांना मोठी ससेहोलपट करावी लागली. दुबार पेरणीसाठी श्रीरामपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी बियाण्यासाठी नाशिक, धुळे, जळगाव, मालेगाव परिसरात धाव घेतली. तिकडेही शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक झाली. नफेखोर व्यापारी आणि अनेक कृषी व्यावसायिकांनी शेतकऱ्यांची बियाणांसाठी पद्धतशीर कोंडी केली.

मागील वर्षीच्या अनुभवामुळे नामवंत कंपन्यांनी सीड प्लॉटचे बियाणे स्थानिक व्यापाऱ्यांना तसेच ऑइल मिल मालकांना परस्पर विकून टाकले. या खेरीज अनेक मोठ्या कृषी विक्रेत्यांना आपल्याकडील बियाणांचा साठा तसाच ठेवण्याच्या सूचनाही करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. बियाण्यात होणाऱ्या फसवेगिरी विरोधातील शेतकऱ्यांमधील जागरूकता आणि शेतकरी संघटनांचा वाढता दबावमुळे संबंधित बियाणे कंपन्यांना असे पाऊल उचलावे लागल्याची चर्चा आहे.

............

महाबीज दरवर्षी राज्यात ६ ते ६.५ लाख क्विंटल बियाणे उत्पादन करते. यावर्षी केवळ २ ते २.५ लाख क्विंटल बियाणांचे उत्पादन शक्य झाले. अतिवृष्टीमुळे बियाणांच्या गुणवत्तेत २० टक्के घट आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात दरवर्षी २८ ते ३० हजार क्विंटल बियाणांची मागणी नोंदवली जाते. मागील वर्षी १०२ कंपन्यांच्या बियाणांबाबत तक्रारी झाल्या होत्या. या वर्षी अजून तक्रारी आलेल्या नाहीत.

- रवींद्र जोशी, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज

...................

अनुदानावर उपलब्ध होणारे बियाणे यंदा श्रीरामपूर तालुक्यातील ५२ शेतकऱ्यांना ऑनलाइन सोडत पद्धतीने देण्यात आले आहे.

-अशोक साळी, तालुका कृषी अधिकारी, श्रीरामपूर