शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मोदी बडबोले पंतप्रधान

By admin | Updated: October 10, 2014 00:23 IST

श्रीरामपूर : नरेंद्र मोदी बडबोले पंतप्रधान आहेत, अशी टीका माजी केंद्रीयमंत्री गुलामनबी आझाद यांनी येथे केली.

श्रीरामपूर : गेल्या १० वर्षांमध्ये देशात जेवढे काम झाले तेवढे कधी झाले नाही. महाराष्ट्रात आज जो काही विकास दिसतो, तो काँग्रेसच्याच नेतृत्वाखाली झाला. सर्व विकासाचे श्रेय काँग्रेसलाच आहे. काँग्रेसने काय केले? असे विचारणारांना दिवसभर हेलिकॉप्टरमधून फिरणाऱ्या पंतप्रधानांचे हेलिकॉप्टर, रस्ते, काश्मीर ते कन्याकुमारी रेल्वे, कारखाने हे काँग्रेसच्याच काळात झाल्याचे दिसत नाही का? असा सवाल करीत पूर्वीचे काँग्रेस पंतप्रधान कमी बोलायचे व जास्त काम करायचे. तर आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नुसतेच बोलत आहेत, काम काहीच करीत नाहीत, ते बडबोले पंतप्रधान आहेत, अशी टीका माजी केंद्रीयमंत्री गुलामनबी आझाद यांनी येथे केली.गुरूवारी दुपारी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे अध्यक्षस्थानी होते. आझाद म्हणाले, आमचे पंतप्रधान काम करीत होते. बोलत नव्हते. आजचे पंतप्रधान फक्त बोलतात. काम मात्र काहीच करीत नाहीत. ते सभांमध्येच बोलतात. सभा नसतील तेव्हाही रेडिओ, टी.व्ही.वरून बोलतच असतात. बोलणे बंद केले नाही तर ते काम करणार कधी? आम्ही २०/२० तास प्रचंड काम केले. काम करण्यात काँग्रेस हिरो तर मार्केटिंगमध्ये झिरो ठरली. भाजपाने काम न करता मार्केटिंग केले. मार्केटिंगमध्ये आम्ही कमी पडलो. तर ते भारी भरले. संपूर्ण देशाला आज काँग्रेसची गरज आहे. आजसारखी देशाला काँग्रेसची कधी आवश्यकता भासली नाही. काँग्रेस हा देशाचा इतिहास आहे. तो नष्ट करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे. जगात काँग्रेस सोडून एकही पक्ष नाही, ज्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज त्याच पक्षाविरूद्ध काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिला जातो, हे दुर्दैव आहे. सर्वधर्मीयांचा भारत हा एक स्वर्ग आहे. पण जातीयवादी पक्ष या स्वर्गाला नरक बनवायला निघाले आहेत. ६५ वर्षात देशात काही झाले नाही असे भाजपावाले म्हणतात तर हेलिकॉप्टर, रस्ते, कारखाने, रेल्वे हा सारा विकास भाजपावाल्यांनी ६ महिन्यात केला का? असा सणसणीत टोलाही आझाद यांनी हाणला.माजी उपनगराध्यक्ष अंजूम शेख, उमेदवार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्षा राजश्री ससाणे, सचिन गुजर, मुरली राऊत, अरूण नाईक आदींची भाषणे झाली. नगरसेवक मुजफ्फर शेख यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)राष्ट्रवादी सोबत नसल्याची खंतसर्व विकासाचे श्रेय काँग्रेसलाच आहे. शिवसेना,भाजपा, मनसेचा विकासाशी काही संबंध नाही. आज या जातीयवादी पक्षांविरूद्ध लढण्यासाठी समविचारी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेससोबत राहणे आवश्यक होते. पण त्यांनीही त्यांचे दुकान थाटले, अशी खंतही आझाद यांनी यावेळी व्यक्त केली.