शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
2
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
3
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
4
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
5
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
6
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
7
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
8
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
9
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
10
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
11
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
12
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
13
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
14
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
15
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
16
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
17
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
18
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
19
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
20
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
Daily Top 2Weekly Top 5

गैरसमजुतीमुळे माणसे हसत नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:15 IST

अहमदनगर : निकोप हसल्याने मन व शरीर ताजेतवाने राहते. पण गंभीर असणे हे प्रतिष्ठेचे, विद्ववत्तेचे, साधुत्वाचे लक्षण समजले जाते, ...

अहमदनगर : निकोप हसल्याने मन व शरीर ताजेतवाने राहते. पण गंभीर असणे हे प्रतिष्ठेचे, विद्ववत्तेचे, साधुत्वाचे लक्षण समजले जाते, अशा गैरसमजुतीमुळे आपली माणसे हसत आनंदाने जगत नाहीत, असे प्रसिद्ध साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांनी सांगितले.

मराठा सेवा संघ व मराठा पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ऑनलाइन व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना ‘जगताना विनोदाचे महत्त्व‘ या विषयावर ते बोलत होते. कळमकर म्हणाले, विनोद सत्याचा मित्र असतो. तो हसता हसवता असत्याचे बुरखे फाडतो. सर्व समाज सुखी व आनंदी रहावा, असे ज्याला वाटते. तोच विनोदनिर्मिती करून सर्वांना हसवू शकतो. लबाड व स्वार्थी माणसे दुसऱ्याचे वाटोळे झाले तरच हसतात. इतरांच्या बाबतीत चांगली गोष्ट घडली तर आनंदाने हसणारा मनुष्य खरा मानवतावादी असतो. वागण्यातील कोतेपणा, मुलांची अवास्तव काळजी, संपत्ती कमावण्याचा सोस, राजकीय स्पर्धा, आर्थिक, सामाजिक, जागतिक चिंता उराशी कवटाळून बसल्याने आपली माणसं कायम अस्वस्थ असतात. त्यामुळे भारतीय माणसांची हृदये, मेंदू त्याच्या शारीरिक वयापेक्षा पंधरा-वीस वर्षांनी जास्त म्हातारी असतात. यावर खळखळून हसवणारा विनोद हे एकमेव औषध आहे. हसण्याला प्रतिष्ठा नसल्याने माणसे नेहमी ताणतणावात राहतात. दु:खाकडे गांभीर्याने पाहिली की ती वाढतात आणि खेळकरपणे पाहिले की कमी होतात. म्हणून माणसांनी जगण्याकडे सकारात्मक दृष्टीने पहायला शिकले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास मराठा पतसंस्थेचे संस्थापक इंजिनिअर विजयकुमार ठुबे, संचालक सुरेश इथापे, संपूर्ण सावंत, राजेश्री शितोळे, शोभाताई जाधव, उदयन घुले, काशीनाथ डोंगरे, पोपट काळे, विश्वास करंजकर, अशोक मुठे, नाना मरकड, अशोक वारकड, राजेंद्र ढोणे, पुष्पाताई मरकड, जेष्ठ पत्रकार संजय वाघमारे, राजेंद्र ठणगे आदी उपस्थित होते. स्वागत ज्ञानदेव पांडुळे यांनी केले. सूत्रसंचालन किशोर मरकड यांनी केले. आभार राजेंद्र इंगळे यांनी मानले.

.............

‘वन्स मोअर’चा किस्सा

पूर्वीच्या काळी रंगमंचावर नाटक सुरू असताना राजकन्या व इतर दरबारी पुढे बसले होते. विंगेतून एका सुंदर मोराने रंगमंचावर उडी मारली. राजकन्येचे त्याकडे लक्ष नव्हते. तिच्या वहिनीने लक्ष वेधण्यासाठी राजकन्येला सांगितले, ‘वन्सं.. मोर.! तोपर्यंत मोर निघून गेला होता. राजकन्येच्या हट्टापाई मोर पुन्हा रंगमंचावर आणावा लागला. तेव्हापासून एखादी चांगली गोष्ट पुन्हा सादर करण्यासाठी ‘वन्स मोअर’ हा शब्द वापरला जाऊ लागला, असे किस्सा सांगत वन्स मोअर या शब्दनिर्मितीचा मजेशीर किस्सा कळमकर यांनी उलगडला.