शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
4
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
5
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
6
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
7
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
8
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
9
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
10
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
11
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
12
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
13
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
14
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
15
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
16
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
17
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
18
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
19
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
20
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

अमरधामच्या धुराचे लोट शहरभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:21 IST

अहमदनगर : जिल्हाभरातील कोरोनाच्या रुग्णांवर नगर येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. दिवस-रात्र अंत्यविधी सुरू असल्याने लाकडाचा धूर, ...

अहमदनगर : जिल्हाभरातील कोरोनाच्या रुग्णांवर नगर येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. दिवस-रात्र अंत्यविधी सुरू असल्याने लाकडाचा धूर, तसेच हवेतून त्याचा वास शहरभर पसरतो आहे. यामुळे नगरमधील नागरिकांच्या जिवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे अमरधामधील अंत्यविधी ग्रामीण भागात करण्यात यावेत, अशी मागणी आ. संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात आ. जगताप यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची रोज संख्या वाढत आहे. त्यात मृत्यूचे आकडेही मोठ्या प्रमाणावर आहेत. नगर शहरातील आणि ग्रामीण भागातील कोरोनाबाधित असलेल्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर नगरच्या अमरधाममध्येच अंत्यसंस्कार केले जात आहेत. विद्युत दाहिनीला मर्यादा असल्याने बहुतांशी अंत्यविधी अमरधाममधील मोकळ्या जागेत लाकडावर केले जात आहेत. त्यामुळे नगरमध्ये दिवस-रात्र धूर पसरतो. तसेच दहनामधून जो विशिष्ट प्रकारचा वासही शहरात दूरपर्यंत व अमरधामच्या चोहोबाजूंनी पसरतो. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव हवेतूनही होत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी देखील अमरधाममध्ये होणारे अंत्यविधी हे स्थानिक स्तरावरच व्हावेत. ज्या तालुक्यातील मयत व्यक्ती आहेत, त्याच तालुक्यात त्यांचा अंत्यविधी व्हावा. ज्यामुळे अमरधाममध्ये होणारी वर्दळ कमी होईल. तसेच नगर शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचेही अंत्यविधी लवकर करता येतील. याबाबत यंत्रणेला आदेश द्यावेत, असे पत्रात म्हटले आहे.

--------------

रात्री जाणवतो जास्त धूर

बहुतांश मयतांवर रात्री दहानंतर अमरधामध्ये अंत्यविधी केले जातात. एकाच वेळी ३० ते ४० चिता पेटविल्या जातात. त्यामुळे एकाच वेळी धूर येतो. तो धूर अमरधामच्या ठिकाणापासून पाच ते दहा कि.मी. अंतरापर्यंत पोहोचतो. सारसनगर, बालिकाश्रम रोड, मध्य शहर, कल्याण रोड आदी रहिवासी असलेल्या भागात हा धूर पसरल्याने नागरिकही चिंतेत आहेत. चिता पेटल्यानंतर तसेच विझल्यानंतही विशिष्ट असा वास येतो. तो वासही दूरपर्यंत शहरात परसलेला असतो. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.