शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
4
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
5
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
6
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
7
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
8
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
9
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
10
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
11
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
12
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
13
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
14
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
15
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
16
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
17
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
18
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
19
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
20
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कायद्यांवरील समितीचा अहवाल दडपून ठेवणे अयोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:27 IST

अहमदनगर : दिल्लीच्या सीमेवर शेतकरी बांधव ठाण मांडून असताना अभ्यास समितीचा अहवाल एवढ्या दिवस दडपून ठेवणे योग्य होणार नाही. ...

अहमदनगर : दिल्लीच्या सीमेवर शेतकरी बांधव ठाण मांडून असताना अभ्यास समितीचा अहवाल एवढ्या दिवस दडपून ठेवणे योग्य होणार नाही. हा अहवाल तातडीने सार्वजनिक करून त्यावर चर्चा करावी. चर्चेतून जो निष्कर्ष निघेल त्याची अंमलबजवणी करावी, अशा आशयाचे पत्र समितीचे सदस्य अनिल घनवट यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना पाठविले आहे.

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मंजूर झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने ते तीन कायद्यांना स्थगिती देऊन त्यावर अभ्यास करण्यासाठी समिती नियुक्त केली होती. या समितीने त्यांचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर केला आहे. मात्र त्यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यावर बोलताना शेतकरी नेते तथा समितीचे सदस्य घनवट म्हणाले, दिल्लीच्या सीमेवर गेल्या नऊ महिन्यांपासून शेतकरी बांधव आंदोलन करत आहेत. त्यावर तोडगा निघावा, यासाठी सर्वेाच्च न्यायालयाने स्वत:हून चार सदस्यांची अभ्यास समिती नियुक्त केली. या समितीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दोन महिने अभ्यास केला. गेल्या १९ मार्च २०२१ रोजी अहवाल समितीने सर्वोच्च न्यायालयाला सादर केला. अहवाल सादर करून पाच महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला. शेतकऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरूच आहे. असे असले तरी सर्वोच्च न्यायालयाकडून कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. समितीचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला गेला नाही. त्यामुळे त्यावर कोणत्याही प्रकारची चर्चा होऊ शकली नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न जैसे थे आहेत. शेतकरी घरदार सोडून रस्त्यावर उतरलेले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाची निकड लक्षात घेऊन न्यायालयाने अहवाल केंद्र सरकारला सादर करावा. तसेच अहवाल चर्चेसाठी सार्वजनिक करावा. देशात अनेक तज्ज्ञ आहेत. ते या अहवालावर चर्चा करतील. चर्चेतून जो निष्कर्ष निघेल, त्यानुसार कायदे तयार करून ते पारित करावेत. जेणेकरून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील.

.....

शेतीबाबत योग्य धोरण ठरवावे

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर देशातील विविध संघटना, तज्ज्ञांची मते समितीने जाणून घेतले. तसेच शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन अहवाल तयार केला असून, त्यावर खुली चर्चा व्हावी. समितीच्या अहवालाचा अभ्यास करून शेतीबाबत योग्य धोरण ठरावे, अशीही मागणी घनवट यांच्याकडून करण्यात आली आहे.