शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
3
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
4
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
5
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
12
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
13
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
14
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
15
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
16
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
17
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
18
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
19
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
20
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

नागवडे कारखान्याची निवडणूक बिनविरोध करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:21 IST

श्रीगोंदा : जिल्ह्यातील बहुतांश सहकारी कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध करण्याचा निर्णय सभासदांनी घेतला आहे. त्याप्रमाणे नागवडे सहकारी कारखान्याची ...

श्रीगोंदा : जिल्ह्यातील बहुतांश सहकारी कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध करण्याचा निर्णय सभासदांनी घेतला आहे. त्याप्रमाणे नागवडे सहकारी कारखान्याची निवडणूक ही बिनविरोध करण्याचा विचार व्हावा, अशी अपेक्षा कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी व्यक्त केली.

नागवडे कारखान्याची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी दुपारी ऑनलाईन पार पडली. यावेळी ते बोलत होते.

नागवडे म्हणाले, गेल्या तीन-चार वर्षांमध्ये सतत ऊस पुरवठा करणाऱ्या बिगर सभासद शेतकऱ्यांना सभासद करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याच्या उपपदार्थ विक्री करताना बाजारभाव स्थिर नसतात. याचा परिणाम उसाच्या भावावर होत आहे. मात्र कमी कालावधीत जास्तीत जास्त उसाचे गाळप करण्यासाठी कारखान्याचा विस्तार करण्याचा विचार आहे.

आमदार बबनराव पाचपुते म्हणाले, सभेत बोलण्याचा विचार नव्हता. परंतु, संचालक मंडळातील नाराजी बघून हवालदिल झालो आहे. कारखान्याचा विस्तार करण्यास आमची हरकत नाही. परंतु, उसाची उपलब्धता, पाण्याचे नियोजन या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच विस्तार करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा. नाही तर हा निर्णय कारखाना सभासदांच्या दृष्टीने घातक ठरू शकतो.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार, अण्णासाहेब शेलार, प्रा. तुकाराम दरेकर, ॲड. विठ्ठलराव काकडे, श्रीपाद खिस्ती, बाळासाहेब काकडे, लक्ष्मण नलगे, हरिश्चंद्र धांडे, रमेश गायकवाड, हनुमंत झिटे, कुंडलिक भोसले, निळकंठ जंगले आदी सहभागी झाले होते. प्रास्ताविक सुभाष शिंदे यांनी केले. प्रा. सुनील माने यांनी आभार मानले.

---

१२ कोटींचा खर्च १५ कोटींवर कसा गेला..

कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर म्हणाले, स्व. बापूंच्या काळात सर्व संचालक मंडळाला विश्वासात घेऊन कारभार होत असे. परंतु, आता कोणतेही निर्णय घेताना आम्हाला विश्वासात घेतले जात नाही, यावर खंत व्यक्त केली. इथेनॉल प्रकल्पाची ३ कोटी खर्चाची अंदाजित रक्कम तब्बल १२ कोटींनी वाढून १५ कोटींवर कशी झाली? असा प्रश्न उपस्थित केला.