शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
2
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
3
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
4
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
5
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
6
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
7
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
8
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
9
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
10
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
11
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
12
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
13
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
14
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
15
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
16
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
17
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
18
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
19
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
20
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
Daily Top 2Weekly Top 5

दारू पिऊन वाहनचालक तर्राट; कोरोनामुळे कारवाई थंडावली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:14 IST

अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर राज्यभरात पोलिसांना ब्रेथ ॲनालायझर यंत्राचा वापर करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ...

अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर राज्यभरात पोलिसांना ब्रेथ ॲनालायझर यंत्राचा वापर करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे जिल्ह्यात मद्यपी वाहनचालकांवरील कारवाई थंडावली आहे. यावर वैद्यकीय तपासणीचा मार्ग असला तरी तुलनेत कारवाईचे प्रमाण घटल्याने अनेक जण तर्राट होऊन वाहने चालविताना दिसतात.

दारू पिऊन वाहन चालविल्याने बहुतांश वेळा अपघात घडतात. अशा मद्यपी चालकांना शोधण्यासाठी ब्रेथ ॲनालायझर या यंत्राचा चांगला उपयोग होतो. या यंत्राच्या माध्यमातून एकाचवेळी अनेक मद्यपींवर कारवाई करणे सोयीचे होते. मात्र हे यंत्र तोंडात घालून तपासणी केली जाते. यातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने या यंत्राचा मागील दीड वर्षांपासून वाहतूक शाखेकडून वापर बंद करण्यात आला आहे. रस्त्यावर पोलिसांनी एखादा मद्यपी वाहन चालक पकडला तर त्याची शासकीय रुग्णालयात नेऊन तपासणी करावी लागते. ही वेळखाऊ प्रक्रिया असते. या अडचणीमुळे कोरोना काळात मद्यपी वाहन चालकांवर कारवाईचे प्रमाण घटल्याचे दिसत आहे. २०२० या वर्षात जिल्ह्यात १ हजार ३५८ मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र यातील सत्तर टक्के कारवाई या पहिल्या तीन महिन्यात झालेल्या आहेत. कोराेनामुळे ब्रेथ ॲनालायझरचा वापर बंद असल्याने पोलिसांचीही अडचण झाली आहे.

--------------------------

मास्कमुळे मद्यपी लक्षात येत नाहीत

कोरोना प्रादुर्भावामुळे सध्या सर्वांना मास्क वापरणे बंधनकारक आहे. ब्रेथ ॲनालायझरचा वापरही बंद आहे. त्यामुळे मद्य प्राशन केलेला वाहनचालक सहजासहजी निदर्शनास येत नाही. त्यामुळे कारवाईचे प्रमाण घडले आहे. एखाद्या मद्यपी चालकाला पकडल्यानंतर त्याला शासकीय रुग्णालयात नेऊन तपासणी केली जाते. त्यानंतर त्याच्या विरोधात कारवाई करून न्यायालयात पाठविले जाते. न्यायालयातून त्याच्यावर दंडात्मक कारवाई होते.

------------------------

कोरोनामुळे ब्रेथ ॲनालायझर वापरास बंदी असल्याने मागील तुलनेत कारवाईचे प्रमाण घटले आहे. नाकाबंदी दरम्यान मद्यपी वाहन चालकांची रुग्णालयात तपासणी करून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. त्यामुळे वाहन चालकांनी दारू पिऊन वाहन चालवू नये, अन्यथा कडक कारवाई केली जाईल.

- विकास देवरे, नगर शहर वाहतूक निरीक्षक

--------------

कोरोनाकाळातही अपघात वाढले

मागील दीड वर्षांत जिल्ह्यात विविध ठिकाणी १ हजार ८१९ अपघात झाले. यात ९१४ जणांचा मृत्यू झाला आहे तर ८३८ जण जखमी झाले आहेत. यातील बहुतांशी अपघात हे मद्यपी वाहनचालकांच्या चुकीमुळे झाले आहेत.