शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
3
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
4
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
5
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
6
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
7
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
8
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
9
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
10
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
11
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
12
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
13
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
14
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
15
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
16
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
17
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
18
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
19
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
20
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
Daily Top 2Weekly Top 5

साई संस्थानवर विकासाचा दृष्टीकोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क श्रीरामपूर : शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळावर नियुक्ती करताना रतन टाटा, नीता अंबानी किंवा आनंद महिंद्रा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

श्रीरामपूर : शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळावर नियुक्ती करताना रतन टाटा, नीता अंबानी किंवा आनंद महिंद्रा यांच्यासारखी विकासाची मोठी दृष्टी असलेले लोक नियुक्त करावेत, अशी सूचना भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी केली आहे.

श्रीरामपूर येथे मुळा प्रवरा सहकारी वीज संस्थेच्या मुख्य कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत रविवारी खासदार डॉ. विखे बोलत होते. संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या निवडीचा वाद उच्च न्यायालयात पोहोचला आहे. राज्य सरकारने या निवडीपूर्वी संस्थानच्या कायद्यात काही दुरूस्त्या केल्या आहेत. नवीन मंडळाची नियुक्तीसाठी सरकारने न्यायालयाकडून ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळविली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे या निवडीकडे लक्ष लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ. विखे यांनी ही भूमिका मांडली आहे.

साई संस्थानच्या विश्वस्त मंडळावर राजकीय व्यक्तींना स्थान द्यायला हवे का, असा प्रश्न विखे यांना विचारला असता, ते म्हणाले, कोणत्याही राजकीय पक्षांशी संबंधित असाे किंवा नसो, मात्र मोठा दृष्टीकोन असलेले लोक संस्थानवर घेतले पाहिजे. उद्योजक नीता अंबानी, रतन टाटा, आनंद महिंद्रांसारखे लोक संस्थानला अधिक बळकट करू शकतील. दर्शन रांगेतील पास किंवा इतर कोणत्याही कामकाजांमध्ये ही मंडळी हस्तक्षेप करणार नाहीत. त्यामुळे संस्थानच्या कार्यपद्धतीत मोठा बदल घडून येऊ शकेल. केवळ उद्योगपतीच नाही तर कायद्यातील काही तज्ज्ञ लोकांचीही संस्थानवर निवड केली तर ती स्वागतार्ह ठरेल.

..........

नव्या सहकार खात्याकडे इडीसारखे का पाहता

केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात नव्याने तयार करण्यात आलेल्या सहकार खात्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. केंद्राने कोणताही नवीन धोरणात्मक निर्णय घेतला की विरोध, आरोप करत सुटतात. सहकार क्षेत्रातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी हे खाते तयार करण्यात आले आहे. मात्र, काही मंडळींना ते दुसरे अंमलबजावणी संचालनालय (ईडी) असल्याचा भास होतो आहे, असे डॉ. विखे म्हणाले.

------

आम्ही सहकार जगविला

राज्यात सहकारी साखर कारखानदारीची आता खासगीकरणाकडे वाटचाल सुरू झाली आहे. ती आता थांबणार नाही. राज्यातील सरकारमधील काही नेत्यांचे खासगी साखर कारखाने आहेत. त्यांचा सहकाराशी संबंध नाही. आम्ही मात्र राहुरी व गणेश चालवायला घेऊन सहकार जगविण्याची भूमिका जपली, असे खासदार डॉ. विखे यांनी स्पष्ट केले.