शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या सततच्या झटक्यांमुळे पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:21 IST

राजापूर परिसरात शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा केला जातो. पण त्यातला एक तास तर वीज रोजचीच गायब असते. जेव्हा वीज ...

राजापूर परिसरात शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा केला जातो. पण त्यातला एक तास तर वीज रोजचीच गायब असते. जेव्हा वीज असते तेव्हा सारखी ये-जा सुरू असते. त्यामुळे सातत्याने सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने पाणी असूनही पिकांना पुरेसे पाणी देता येत नाही. सद्य:स्थितीत कांदा पिकासाठी एक किंवा दोनच पाण्याची गरज आहे, परंतु हातातोंडाशी आलेला घास विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांपासून दुरावला जाण्याची भीती आहे. रात्री-अपरात्री शेतकरी शेतावर जातात. त्या वेळीही विजेच्या बाबतीत अशीच स्थिती निर्माण होते. यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.

..........

वीजपुरवठा सुरळीत करावा

वीजपुरवठा सुरळीत व पूर्ण दाबाने करावा, अशी मागणी सरपंच प्रतीषा धनंजय मेंगवडे, सदस्य नीलम घावटे, माजी उपसरपंच सचिन चौधरी, अरुण शेळके, संजय शेळके, मच्छिंद्र गुंजाळ या शेतकऱ्यांनी केली आहे.

................

शेतातील कांदा पीक काढणी एक-दोन पाण्यावर आली आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना विजेच्या लपंडावामुळे पाणी असूनही पिकांना पाणी देता येईना. योग्य दाबाने सुरळीत वीजपुरवठा करावा अन्यथा आक्रमक पवित्रा घेतला जाईल.

- मच्छिंद्र गुंजाळ, संजय शेळके,

शेतकरी

..........

पिंप्री कोलंदर फिडरवर ओव्हरलोड होत असल्याने संपूर्ण भागात एक तास वीज बंद असून वरूनच ट्रिपिंग होत असल्याने वीज झटके मारते. बेलवंडी येथे पॉवर ट्रान्सफार्मरचे काम सुरू आहे. लवकरच वीज सुरळीत होईल. कृषी योजनेतून राजापूरसाठी नवीन सबस्टेशनचा प्रस्ताव पाठवला आहे.

- पी.ए. बारहाते, उपअभियंता,

पिंप्री कोलंदर सबस्टेशन