पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी पीक स्पर्धा योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:15 IST2021-06-10T04:15:40+5:302021-06-10T04:15:40+5:30
लोणी : पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी राज्यात कृषी विभागातर्फे पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम स्पर्धेसाठी मूग व ...

पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी पीक स्पर्धा योजना
लोणी : पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी राज्यात कृषी विभागातर्फे पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम स्पर्धेसाठी मूग व उडीद पिकांसाठी ३१ जुलैपूर्वी तर इतर खरीप पिकांसाठी ३१ ऑगस्टपूर्वी अर्ज सादर करून संगमनेर उपविभागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.
राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होईल व ते अधिक उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. हा उद्देश ठेवून या स्पर्धा योजनेचे आयोजन केले जाते. खरीप हंगामापासून पूर्वीच्या स्पर्धेच्या निकषांमध्ये शिथिलता आणि सुयोग्य बदल करून नव्याने स्पर्धा राबविण्यात येत आहे. मूग व उडीद पीक स्पर्धेसाठी ३१ जुलै २०२१, तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी(रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सुर्यफूल या स्पर्धेसाठी ३१ ऑगस्ट २०२१ पूर्वी अर्ज करायचे आहेत.