शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

रसवंतीगृह चालकांवर कोरोनामुळे उपासमारीची वेळ : दीड वर्षापासून रोजगार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 16:45 IST

राहुरी ते शनिशिंगणापूर व नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर शेकडो रसवंतीगृह गेल्या दीड वर्षापासून बंद पडल्यामुळे शेकडो कुटुंबांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या व्यावसायिकांचे नुकसान होत आहे.

राहुरी : राहुरी ते शनिशिंगणापूर व नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर शेकडो रसवंतीगृह गेल्या दीड वर्षापासून बंद पडल्यामुळे शेकडो कुटुंबांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या व्यावसायिकांचे नुकसान होत आहे.

राहुरी ते शनिशिंगणापूर या मार्गावर मोठ्या प्रमाणावर रसवंतीगृह आहे. मात्र, कोरोनामुळे रसवंतीगृह बंद करावे लागले आहे. त्यामुळे शेतकरी व युवक यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. या रसवंतीगृहाचे वैशिष्ट्य म्हणजे बैल आणि बैलांच्या चरख्याच्या साह्याने उसाचा रस काढला जातो. पुणे, मुंबई तसेच देशाबाहेरील पर्यटकांना उसाचा रस खूप भावतो. यंत्रापेक्षा लाकडी चरख्याच्या साहाय्याने काढलेला ऊसरस आरोग्यदायी आहे, असे मानले जाते. त्यामुळे लाकडी रसवंतीवर काढलेल्या उसाच्या रसाला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. कोरोनामुळे वाहतूक बंद आहे. त्यामुळे रसवंतीगृह बंद पडल्यामुळे अनेक शेतकरी व युवक यांचा व्यवसाय रसवंतीगृहांवर अवलंबून होता. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

नगर-मनमाड रोडवरही ठिकठिकाणी रसवंतीगृह सुरू झाले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रसवंतीगृहांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला होता. मात्र, शनिशिंगणापूर व शिर्डी या ठिकाणी भाविक येण्याचे प्रमाण घटल्याने त्याशिवाय लॉकडाऊन असल्याने बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. रोजगाराची साधनेही बुडाली आहे.

लॉकडाऊन नको रे बाबा अशी म्हणण्याची वेळ शेतकरी व व्यापारीवर्गावर आली आहे. पंधरा वर्षांपासून मी रसवंतीचा व्यवसाय करत आहे. कोरोनाचे सावट आल्याने पंधरा वर्षांत पहिल्यांदाच रसवंतीगृह बंद आहे. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. काम करण्याची इच्छा असूनदेखील कोरोनासारख्या महामारीमुळे दुसरीकडे कोठेही रोजगार उपलब्ध होत नाही.

- सचिन निक्रड, रसवंतीचालक, राहुरी खुर्द

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी