शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

रसवंतीगृह चालकांवर कोरोनामुळे उपासमारीची वेळ : दीड वर्षापासून रोजगार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 16:45 IST

राहुरी ते शनिशिंगणापूर व नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर शेकडो रसवंतीगृह गेल्या दीड वर्षापासून बंद पडल्यामुळे शेकडो कुटुंबांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या व्यावसायिकांचे नुकसान होत आहे.

राहुरी : राहुरी ते शनिशिंगणापूर व नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर शेकडो रसवंतीगृह गेल्या दीड वर्षापासून बंद पडल्यामुळे शेकडो कुटुंबांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या व्यावसायिकांचे नुकसान होत आहे.

राहुरी ते शनिशिंगणापूर या मार्गावर मोठ्या प्रमाणावर रसवंतीगृह आहे. मात्र, कोरोनामुळे रसवंतीगृह बंद करावे लागले आहे. त्यामुळे शेतकरी व युवक यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. या रसवंतीगृहाचे वैशिष्ट्य म्हणजे बैल आणि बैलांच्या चरख्याच्या साह्याने उसाचा रस काढला जातो. पुणे, मुंबई तसेच देशाबाहेरील पर्यटकांना उसाचा रस खूप भावतो. यंत्रापेक्षा लाकडी चरख्याच्या साहाय्याने काढलेला ऊसरस आरोग्यदायी आहे, असे मानले जाते. त्यामुळे लाकडी रसवंतीवर काढलेल्या उसाच्या रसाला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. कोरोनामुळे वाहतूक बंद आहे. त्यामुळे रसवंतीगृह बंद पडल्यामुळे अनेक शेतकरी व युवक यांचा व्यवसाय रसवंतीगृहांवर अवलंबून होता. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

नगर-मनमाड रोडवरही ठिकठिकाणी रसवंतीगृह सुरू झाले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रसवंतीगृहांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला होता. मात्र, शनिशिंगणापूर व शिर्डी या ठिकाणी भाविक येण्याचे प्रमाण घटल्याने त्याशिवाय लॉकडाऊन असल्याने बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. रोजगाराची साधनेही बुडाली आहे.

लॉकडाऊन नको रे बाबा अशी म्हणण्याची वेळ शेतकरी व व्यापारीवर्गावर आली आहे. पंधरा वर्षांपासून मी रसवंतीचा व्यवसाय करत आहे. कोरोनाचे सावट आल्याने पंधरा वर्षांत पहिल्यांदाच रसवंतीगृह बंद आहे. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. काम करण्याची इच्छा असूनदेखील कोरोनासारख्या महामारीमुळे दुसरीकडे कोठेही रोजगार उपलब्ध होत नाही.

- सचिन निक्रड, रसवंतीचालक, राहुरी खुर्द

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी