शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचार उघड होईल म्हणून अधिवेशन गुंडाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:20 IST

अहमदनगर : राज्य सरकारच्या सर्वच खात्यांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. पंधरा दिवसांचे अधिवेशन घेतले, तर हा सर्व भ्रष्टाचार ...

अहमदनगर : राज्य सरकारच्या सर्वच खात्यांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. पंधरा दिवसांचे अधिवेशन घेतले, तर हा सर्व भ्रष्टाचार उघड होईल, या भीतीनेच राज्य सरकारने दोन दिवसांत पावसाळी अधिवेशन गुंडाळले. हे भ्रष्टाचारी सरकारची तीन चाकी ऑटोरिक्षा २०२४ च्या निवडणुकीत जनताच पंक्चर करेल, असे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

भाजपच्या युवा वॉरिअर्स योजनेच्या प्रचार कार्यक्रमासाठी बावनकुळे रविवारी अहमदनगरमध्ये होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, केवळ एका जलसंधारण खात्यात नव्हे, तर सर्वच खात्यांत भ्रष्टाचार आहे. कोरोनाचे कारण सांगत अधिवेशन गुंडाळण्यात आले. राज्यात अनेक प्रश्न भेडसावत असताना ते अधिवेशनात मांडू द्यायचे नाहीत, असेच आघाडी सरकारने ठरवले होते. भाजपच्या काळात झालेल्या योजनांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरडाओरडा करीत जुनी कामे थांबवायची आणि त्या योजनेतील निधी इतरत्र वळवायचा, अशा पद्धतीने सरकारचा कारभार सुरू आहे. जलयुक्तच्या कामात भ्रष्टाचार असेल, तर त्यांनी त्यांचे अधिकार वापरून कारवाई करावी. कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला. नोकऱ्या नाहीत. उद्योगधंदे बंद पडले आहेत. त्यामुळे राज्यातील युवक नाराज आहे. सरकारच्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थी नाराज आहेत. ऑनलाइन शाळा असूनही शंभर टक्के फी घेतली जात आहे. ९० टक्के शैक्षणिक संस्था काँग्रेस-राष्ट्रवादीतच्या नेत्यांच्या आहेत, हेही लक्षात घेणे गरजेचे आहे. वीज बिलाच्या वसुलीमुळे शेतकरी नाराज आहेत. शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या कापण्याचा या सरकारला अधिकार नाही. पीककर्ज योजना बंद पडली आहे. कोकणात सुलतानी आपत्तीच जास्त आहे. योग्य नियोजन नसल्यानेच तिथे महापूर आला. खावटी योजना बंद आहे, संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे राज्य सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली. मराठा आणि ओबीसी आरक्षण सरकारला टिकवता आले नाही. ओबीसींचा इम्पिकरल डाटा सरकारने तीन महिन्यांत दिला नाही, तर एकाही मंत्र्यांच्या गाड्या त्यांच्या घरी जाऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. सरकारमधील मंत्री पोपटासारखे बोलत असून, ते अपयशाचे खापर केंद्र सरकारवर फोडून मोकळे होत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यातरी त्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही.

--

आम्हाला सरकार पाडायचे नाही

अनैसर्गिक पद्धतीने सरकार स्थापन झालेले आहे, ते सरकार आम्ही पाडण्याची आवश्यकता नाही. ते नैसर्गिक नियमाने आपोआप जाईल. २०२४ च्या निवडणुकीत सरकारची तीनचाकी रिक्षा आपोआप पंक्चर होईल. हे काम आता जनताच करणार आहे. दोन वर्षांत एकही चांगले काम या सरकारने केले नसल्याने या तीनचाकी रिक्षाचे स्क्रॅप विकण्यासाठीही शिल्लक राहणार नाही, असा घणाघात बावकुळे यांनी केला.