शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

प्रचाराच्या धुराळ््यात हरवली सीटी बस

By admin | Updated: October 3, 2014 23:54 IST

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धुराळ््यात शहर बस सेवा हरवली आहे.

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धुराळ््यात शहर बस सेवा हरवली आहे. शहर बस सुरू करण्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये चांगलीच जुंपली होती. आता दोन्हीही पक्षांना शहर बसचा विसर पडला असल्याने नागरिकांचे सध्या हाल सुरू असून पॅगो रिक्षाचालकांच्या आडदांडपणाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेची शहर बस सेवा बंद पडली होती. मनसेच्या ताब्यातील स्थायी समितीने शहर बस सेवेच्या ठेकेदाराचा प्रस्ताव फेटाळल्याने बस बंद झाली. त्यामुळे शिवसेनेला आयतेच कोलीत मिळाले. सत्ताधाऱ्यांच्या बेजबाबदार धोरणामुळे शहर बस सेवा बंद झाल्याचे आरोप-प्रत्यारोप झाले. शेवटी महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी कशीबशी जुन्याच ठेकेदाराच्या बस घेऊन नव्या ठेकेदाराच्या नावे बस सुरू केल्या. शहरासाठी किमान ३० बस हव्या असताना चार-पाच बसेसवरच ही सेवा सुरू झाली. ही सेवाही आता बंद पडली आहे. शहर बसवरून दोन्ही पक्षांमध्ये महिनाभरापूर्वी आरोप-प्रत्यारोप सुरू होते. आता मात्र प्रचारामध्ये दोन्ही पक्षांना शहर बस सेवेचा विसर पडलेला दिसतो आहे.शहर बस बंद असल्याने पॅगो रिक्षाचालकांनी धुमाकूळ घातला आहे. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई सुरू केली की पुन्हा राजकीय नेते कारवाईमध्ये अडथळे उभे करीत आहेत. प्रवाशांची आर्थिक लूट करणे, अव्वाच्या सव्वा भाडे लावणे, एकाच रिक्षामध्ये अनेक प्रवासी भरणे यामुळे शहरातील प्रवास धोकेदायक बनला आहे. दिल्लीगेट, जुने बसस्थानक, पुणे बसस्थानक येथे पॅगो रस्त्यावरच आडव्या लावल्या जात आहेत. त्यामुळे वाहतुकीचाही बोजवारा उडाला आहे.विनापरवाना रिक्षाचालकांवर वाहतूक शाखेकडून कारवाई केली जात आहे. कोणीही हस्तक्षेप केला तरी कारवाई थांबविली जाणार नाही, असे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे शहर बससेवेचा उपप्रादेशिक परिवहन विभागाचा परवाना नसल्याने नव्या ठेकेदाराला बस चालविणे अशक्य झाले आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा सुरू असल्याने राजकीय नेत्यांना बस सेवेचा विसर पडला आहे. तिसरीकडे विनापरवाना रिक्षांवर पोलिसांकडूनही सबुरीने कारवाई सुरू आहे. त्यामध्ये सध्या कोणताही आक्रमकपणा नाही. निवडणुकीच्या काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनीही आक्रमक कारवाई टाळल्याचे दिसते आहे. काहीही झाले तरी शहरातील प्रवाशांचे हाल मात्र सुरूच आहेत. (प्रतिनिधी)