शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
2
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
3
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेल भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
4
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
5
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
6
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
7
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
8
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
9
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
10
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
11
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
12
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
13
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
14
'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
15
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
16
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
17
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
18
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
19
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
20
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रक्रिया सुरू झाल्याने रक्ताचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:15 IST

अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने खासगी व शासकीय रुग्णालयांत वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया होत आहेत. त्यामुळे रक्ताची ...

अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने खासगी व शासकीय रुग्णालयांत वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया होत आहेत. त्यामुळे रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झाली आहे. उपलब्ध रक्तापेक्षा मागणी वाढल्याने रक्तपेढ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने २ जुलैपासून जिल्ह्यात रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. नागरिकांनी या शिबिरात रक्तदान करून रुग्णांचा जीव वाचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोना कमी झाल्यानंतर राज्यातही असाच रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. हे लक्षात घेऊन ‘लोकमत’चे संस्थापक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा ऊर्फ बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलैपासून अहमदनगर जिल्ह्यात ‘रक्ताचं नातं’ हा उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत जिल्हाभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी संस्था, संघटना आणि नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २ जुलै रोजी आनंदऋषिजी महाराज हॉस्पिटलच्या रक्तपेढीत या शिबिराचा प्रारंभ होणार आहे. तसेच याचदिवशी प्रहार संघटनेनेही रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

‘लोकमत’ व राज्य रक्त संक्रमण परिषदेतर्फे राज्यभर रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. रक्तदान शिबिरांच्या आयोजनासाठी येथील ‘लोकमत’ कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

----------

का झाली रक्ताची टंचाई ?

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालये रिकामी झाली आहेत. गेल्या दोन-चार महिन्यांपासून कोरोनामुळे थांबलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया आता सुरू झाल्या आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासते आहे. याशिवाय शस्त्रक्रियेद्वारे होणाऱ्या प्रसूतीमुळेही रक्ताची मागणी वाढली आहे. कडक निर्बंध हटविण्यात आल्याने रस्त्यावर मोठी वर्दळ वाढली असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. तसेच कोरोनामुळे दोन-तीन महिने रक्तदान ठप्प होते. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे, असे नगर शहरातील रक्तपेढीच्या संचालकांनी सांगितले.

------------

कोरोना होऊन गेल्यानंतर...

कोरोना झालेल्यांनाही ४५ दिवसांनंतर रक्तदान करता येते. तसेच लसीकरण झाल्यानंतर १५ दिवसांनंतर रक्तदान करता येते, अशी माहिती रक्तपेढीच्या संचालकांनी दिली आहे.

कोणाला करता येईल रक्तदान...

रक्तदात्याचे वय १८ ते ६५ वर्षे असावे

वजन ४५ किलोपेक्षा जास्त असावे

हिमोग्लोबिनचे प्रमाण १२.५ टक्केपेक्षा जास्त असावे

रक्तदानापूर्वी आहार घेतलेला असावा

रात्री जागरण झालेले नसावे

रक्तदानापूर्वी वेदनाशामक औषधे घेतलेली नसावीत

पूर्वी केलेल्या रक्तदानास तीन महिने झालेले असावेत

---------