शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
2
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
3
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
4
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
5
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
6
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
7
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
8
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
9
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
10
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
11
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
12
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
13
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
14
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
15
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
16
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
17
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
18
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
19
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
20
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण बरे होऊन परतल्यानंतर आगरकर मळा कन्टेन्मेन्ट झोन, नागरिकांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 11:48 IST

अहमदनगर: येथील आगरकर मळा परिसरात 10 ते 15 रुग्ण कोरोनाबाधित आढळूून आले होते. ते रुग्ण सात दिवसांनी बरे होऊन परतले आहेत. त्यानंंतर रविवारी रात्री आगरकर मळा परिसर प्रतिबंधात्मक क्षत्र जाहिर केले आहे. यामुळे नागरिक संतापले आहेत. 

अहमदनगर: येथील आगरकर मळा परिसरात 10 ते 15 रुग्ण कोरोनाबाधित आढळूून आले होते. ते रुग्ण सात दिवसांनी बरे होऊन परतले आहेत. त्यानंंतर रविवारी रात्री आगरकर मळा परिसर प्रतिबंधात्मक क्षत्र जाहिर केले आहे. यामुळे नागरिक संतापले आहेत. 

दोन हजार लोकवस्ती असलेल्या सागर कॉम्प्लेक्स, अर्बन बँक कॉलनी, झेडपी काॅलनी, आगरकर मळा परिसरातील हा भाग कंटेनमेंट मधे घेऊन  सील केला. दरम्यान हा प्रकार म्हणजे  बैल गेला आणि झोपा केला, असा प्रकार 

असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. हा भाग सील करताना कुठलाही भौगोलिक रस्त्याच्या रचनेचा काय अडचणी येऊ शकतात याचा अभ्यास न करता केला गेला. विशेष म्हणजे कंटेनमेंट झोनचा जीआर पाहिला असता त्यामधला परिसर आणि प्रत्यक्ष केलेला परिसर याच्यामध्ये बरीच मोठी तफावत दिसून आल्यामुळे नागरिक संतप्त झाले. राजकारणी लोकांना मुद्दाम वगळलंमे असा नागरिकांचा आरोप आहे. या कंटेनमेंट झोनमध्ये बंदिस्त असलेल्या नागरिकांना  60 रुपये लिटर दूध आणि महागडा  भाजीपाला पत्र्यामधे झुंबड करून घ्यावा लागतो. याच झोनमध्ये जे इमर्जन्सी आरोग्य सेवक राहतात त्यांना स्वतः बाहेर कुठे राहण्याची व्यवस्था करायला सांगितले जाते, हे चुकीचे आहे. हे आरोग्य सेवक आपल्या सर्वांच्या सेवेसाठी बाहेर पडत आहेत, अशा वेळेस त्यांनी परत घरी जायचं नाही आणि स्वतः बाहेर राहण्याची व्यवस्था करायची म्हणजे नेमके काय करायचे? तसेच ३-४ कुटुंबांकडे गाई-म्हशी जनावरे आहेत त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे,
निव्वळ फोन करून त्यांचा नेहमीचा चाऱ्याला तिथे चारा आणून द्यायला तयार नाही, आणि कर्मचाऱ्यांची कमतरता सांगून एवढ्या मोठ्या परिसरामध्ये एकच आउटलेट ठेवलेला आहे. जिथे मनपाचे कर्मचारी उभे राहून सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत, ती अतिशय तोकडी पडत आहे.
वास्तविक याचा पुन्हा सर्वे करून खरंच दोन हजार लोकांना बंदिस्त करणे आत्ता आवश्यक आहे का ?हे पाहणे गरजेचे आहे. कारण या परिसरात सापडलेले दहा पंधरा जण केव्हाच बरे होऊन घरी आलेले आहेत.
आणि सागर कॉम्प्लेक्स निश्चितच गजबजलेला परिसर आहे. परंतु झेडपी कॉलनी आणि अर्बन बँक कॉलनी येथे तर स्वतंत्र लांब लांब बंगले आहेत. जीआर प्रमाणे खरा कंटेनमेंट घेऊन विरंगुळा मैदानापासून असूनही
त्यांना याच्यामध्ये का भरडले गेले ते समजत नाही.
या सर्व प्रश्नांवर माननीय जिल्हाधिकारी आणि आयुक्त साहेब यांनी लक्ष घालून तातडीने मार्ग काढावा, अशी मागणी  जागृक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या