शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

दोन कृषी सेवा केंद्रांवर कारवाई

By admin | Updated: February 16, 2023 11:44 IST

श्रीरामपूर : माळवाडगाव (ता. श्रीरामपूर) येथील दोन कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून कारवाई केली.

श्रीरामपूर : माळवाडगाव (ता. श्रीरामपूर) येथील दोन कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून कारवाई केली. खत विक्रीबाबत गंभीर स्वरूपाचे दोष आढळून आल्याने तेथील दोन्ही दुकानांमधील खताच्या ६१ गोण्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली.तालुका कृषी अधिकारी विष्णू साळवे व पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी गणेश अनारसे यांनी माळवाडगाव येथील दौलत रामकृष्ण दांगट यांच्या मालकीच्या अभिषेक कृषी सेवा केंद्र व सुमन पांडुरंग शिंदे यांच्या मालकीच्या जगदंबा कृषी सेवा केंद्रास भेट देऊन तपासणी केली. तेव्हा रासायनिक खत विक्रीबाबत गंभीर स्वरूपाच्या उणिवा आढळल्या. त्यामुळे दोन्ही दुकानांतील उपलब्ध रासायनिक खतांची विक्री बंद करण्याचा आदेश जागेवर देण्यात आला.जगदंबा कृषी सेवा केंद्रात खत परवान्याचे नूतनीकरण करवून न घेता खत विक्री करण्यात येत होती. तसेच खरेदी करण्यात आलेल्या खताची बिले नसणे, शेतकऱ्यास खरेदीची बिले न देणे, साठा नोंदवही न ठेवणे यासारख्या गंभीर त्रुटी आढळल्या. त्यामुळे या दुकानातील डी.ए.पी. २०:२०:०, १८:१८:१० या स्वरूपाच्या खताच्या ३७ गोण्यांची विक्री करण्यास मनाई करण्यात आली. या गोण्यांची किंमत ४८ हजार ५२५ रूपये आहे. अभिषेक कृषी सेवा केंद्रातही खताची खरेदी बिले न ठेवणे, साठा नोंदवहीत नोंद न ठेवणे, अहवाल सादर न करणे, गोदामातील साठा विक्री साठा यांचा ताळमेळ नसणे यासारख्या गंभीर त्रुटी आढळल्या. या दुकानातील १८ हजार ३५७ रूपये किंमतीच्या डी.ए. पी., युरिया, १०:२६:२६ या खताच्या २४ गोणांन्या विक्री बंद आदेश बजावण्यात आला.या दोन्ही दुकानांचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती विष्णू साळवे यांनी दिली.