शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेर तालुक्यातील १२ गावे समृद्ध गाव स्पर्धेसाठी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क संगमनेर : ग्रामीण पर्यावरण व्यवस्थेचा आणि अर्थशास्त्राचा कायापालट करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्यावतीने राज्यात ‘सत्यमेव जयते समृद्ध गाव’ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

संगमनेर : ग्रामीण पर्यावरण व्यवस्थेचा आणि अर्थशास्त्राचा कायापालट करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्यावतीने राज्यात ‘सत्यमेव जयते समृद्ध गाव’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात संगमनेर तालुक्यातील १२ गावे पात्र ठरली आहेत. जलसंधारणातून गावात जलसमृद्धी आणण्यासाठी येथील ग्रामस्थ मेहनत घेत आहेत.

राज्यातील ४० तालुक्यांमधील एक हजाराहून अधिक गावांची समृद्ध गाव स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. कोरोनाच्या परिस्थितीत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण घेत संगमनेर तालुक्यातील मांची, सावरगाव तळ, पेमगिरी, भोजदरी, कुंभारवाडी, खंदरमाळवाडी, पिंपळगाव माथा, पिंपळगाव देपा, मोधळवाडी, खरशिंदे, कणसेवाडी, म्हसवंडी या १२ गावांनी पहिल्या टप्प्यातील काम यशस्वीरित्या पूर्ण केल्याने ही गावे स्पर्धेसाठी पात्र ठरली आहेत. समृद्ध गाव स्पर्धेत प्रामुख्याने जल व्यवस्थापन आणि पर्यावरणाचे आरोग्य सुधारणे या गोष्टींवर भर देण्यात येत आहे. काही गावांमध्ये पाण्याचा भरमसाठ उपसा होऊ लागला. पाण्याचा अनियंत्रित वापर होऊ लागल्याने उन्हाळा सुरू होताच दुष्काळाचे संकट समोर उभे राहते. जलसंधारण करून दुष्काळाचे संकट दूर होणार नाही. याशिवाय हवामान बदलाच्या संकटामुळे शेतीतील अनिश्चितता आणि दुष्काळ या समस्यांनी अधिक उग्र रूप धारण केले आहे. याच समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आणि दुष्काळाच्या समस्येचा समूळ नाश करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कमी पाण्यात अधिक उत्पन्न घेऊन शेतकऱ्यांना समृद्ध करण्यावर भर देण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यात १२० गुणांसाठी काम होणे अपेक्षित होते. संगमनेर तालुक्यातील १२ गावांपैकी ७ गावांनी १२०पैकी १२० गुण मिळवले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अमीर खान, किरण राव यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने आयोजित कार्यक्रमात संगमनेर तालुक्यातील गावांचा सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते या गावांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

------------

पाणी फाऊंडेशनच्यावतीने २०१९मधील ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत संगमनेर तालुक्यातील १०० गावांनी सहभाग घेतला होता. या गावांमध्ये जलसंधारणाची कामे झाली. पाणी फाऊंडेशनच्या सर्व स्पर्धांना ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

- राजेंद्र जाधव, संगमनेर तालुका समन्वयक, पाणी फाऊंडेशन

-------------

पाणी फाऊंडेशनच्यावतीने खंदरमाळवाडीत भरीव काम झाले आहे, होत आहे. यासाठी ग्रामस्थांचा मोठा सहभाग मिळतो आहे. समृद्ध गाव स्पर्धेत आमच्या गावाने सहभाग घेतला असून, शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ मिळणार आहे.

- किशोर डोके, सामाजिक कार्यकर्ते, खंदरमाळवाडी