शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मानवी मनानं भगवंतनामाचे स्मरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 05:11 IST

- वामन देशपांडे मानवी मन खूप अस्थिर आहे, चंचल आहे. त्या मनाला स्थिर करण्यासाठी, चंचल मनोवृत्तीला पूर्णपणे शांत करण्यासाठी ...

- वामन देशपांडेमानवी मन खूप अस्थिर आहे, चंचल आहे. त्या मनाला स्थिर करण्यासाठी, चंचल मनोवृत्तीला पूर्णपणे शांत करण्यासाठी भगवंतनामाचे अखंड स्मरण करण्याची बुद्धी प्राप्त होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी परमेश्वराची कृपा भक्तावर व्हावी लागते. अंत:करणात राग, द्वेष, स्वार्थ, अहंकार सदैव जागृतावस्थेत वावरत असतात, तोपर्यंत मनातले द्वंद्व थांबतच नाही. त्यासाठी रागद्वेषादी समाप्त होणे अत्यंत आवश्यक आहे. हे विश्व केवळ परमेश्वरी अस्तित्वानेच भारलेले आहे. ही दृढता जेव्हा मनात पूर्णांशाने स्थिर होते, तेव्हाच चित्तात स्थिरता, समता, एकाग्रता यांचे प्राबल्य दाटून येते आणि तीच खरी साधनेची सुरुवात असते. तो शुभयोग परमेश्वरी कृपेनेच प्राप्त होतो. त्यासंदर्भात भगवंत म्हणतात,योगस्थ: कुरू कर्मणि सग्डत्यक्त्वा धनश्चय।सिद्धयासिद्धयो : समो भूत्वा समत्वं योग उच्यते ।।गीता : २:४८।।पार्था, आपण जे कर्म करतो, त्या कोणत्याही कर्मात आणि कर्मफलात आसक्तीभाव चुकूनही उमलून येता कामा नये. निर्लेप मनाने कर्म केले तर कर्तृत्वभाव आपोआप गळून पडतो. त्याचा दृश्य परिणाम म्हणजे कर्मफलात मन अडकतच नाही. त्याचा अप्रतिम परिणाम म्हणजे सिद्धी आणि असिद्धीत समतोल भाव निर्माण होईल. निष्काम कर्मयोग हीच मनाची स्थिरता. आपण करीत असलेल्या साधनेने भगवंत प्रसन्न होणे, आपण त्याचे लाडके भक्त होणे, ही खरेतर करीत असलेल्या आपल्या साधनेची फलश्रुती आहे. याचे भान साधकाला येणे अत्यंत आवश्यक आहे.