शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

कोळसा आणि हिरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 2:33 AM

जितके जास्त निंदक ज्याच्या नशिबी आलेत समजावे तितकी जास्त प्रगती त्याच्याकडून नियतीला हवी आहे.

- विजयराज बोधनकर

आपली निंदा करणारा किंवा आपल्याला छळणारा जीव आपल्या आयुष्यात येतो हे आपलं सद्भाग्य म्हणावं. तो आपल्या झोपल्या बुद्धीला जागं करतो, जोश निर्माण करतो, मनात खळबळ निर्माण करून देतो. आपली उगाच खालची जागा दाखवून देतो. मग छळवणूक सहन करणारा त्याला दाखवून देतो की, बघ मी कसा आयुष्यात पुढे जाऊ शकतो. आपली कुणी चेष्टा करतो तेव्हा आपल्या सन्मानाला ठेच पोहोचते आणि आपली संपूर्ण ऊर्जा पणाला लावून त्याच्या चेष्टेला उत्तरं देताना आपली कार्यक्षमता वाढवून घेत राहतो.

फक्त आपण सकारात्मक वृत्तीने ही बाब स्वत:च्या नजरेत आणून द्यायला हवी. निंदा करणारा, अपमान करणारा आपल्या कुंडलीतील शनी जरी वाटत असला तरी आपल्याला खडबडून जागं करणारी ती एक छुपी प्रेरणाच असते. उगाच का तुकाराम महाराजांनी म्हटलं की, निंदकाचे घर असावे शेजारी. पांडवांच्या कुंडलीत शंभर निंदक होते म्हणून त्यांचा भव्य विजय झाला. त्यांनी युद्ध करायला भाग पाडलं. ज्यांनी ज्यांनी युद्ध स्वीकारलं तेच अजरामर झालेत. निंदा करणारा कधीच प्रगती करू शकत नसला तरी तो इतरांच्या प्रगतीला प्रेरक ठरत जातो.

जितके जास्त निंदक ज्याच्या नशिबी आलेत समजावे तितकी जास्त प्रगती त्याच्याकडून नियतीला हवी आहे. तुमचा मत्सर करणारे तुमच्या प्रगतीवर अस्वस्थ होत असतात. म्हणजे तुम्ही प्रगतिपथावर आहात असं समजावं. फक्त आपण कुणाची निंदा करू नये. कारण आपल्याला प्रगती करण्यासाठी नियतीने आपल्याला जन्माला घातलंय आणि त्या प्रगतीला पोषक बनविण्यासाठी निंदकही नियतीने आपल्याला पदरी पाठविले. निंदकाला कधीही कमी लेखू नये. याचं कारण असं आहे की नियतीने तुम्हावर केलेली ती कृपादृष्टी असते. जो छळला जातो तोच उत्तम मार्गाकडे वळतो. कोळशातच शेवटी हिरे सापडतात. कोळसा आणि निंदा करणारा समान भूमिकेत असतो.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक