चिंताजनक..! भीमा खोऱ्यातील पाच धरणांत शून्य टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 07:00 AM2019-05-12T07:00:00+5:302019-05-12T07:00:07+5:30

परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने राज्यातील अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Worried ..! Zero percent water stock in five dams in Bhima Valley | चिंताजनक..! भीमा खोऱ्यातील पाच धरणांत शून्य टक्के पाणीसाठा

चिंताजनक..! भीमा खोऱ्यातील पाच धरणांत शून्य टक्के पाणीसाठा

Next
ठळक मुद्दे सात धरणांत दहा टक्यांपेक्षा कमी पाणीपश्चिम महाराष्ट्रातील धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने घट

पुणे : भीमा खोरे प्रकल्पातील पाच धरणांत शून्य टक्के तर सात धरणात दहा टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा उरला आहे. मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्यास या भागातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला समोरे जावे लागण्याची शक्यता आहे. 
पश्चिम महाराष्ट्रातील धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने घट झाली आहे. राज्यातील सर्वाधिक क्षमता असणारे उजनी धरण यंदा शंभर टक्के भरले होते. मात्र, उजणीची पाणी पातळी शून्य टक्क्यापेक्षा खाली गेली असून सध्या धरणात उणे १९.७२ टीएमसी पाणी आहे. पश्चिम महाराष्ट्राला भीमा खोऱ्यातील धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. सध्या भीमा खोऱ्यातील २५ धरणांपैकी पाच धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे. त्यात पिंपळगाव जोगे, डिंभे, घोड, टेमघर, नाझरे या धरणांचा समावेश आहे.तसेच माणिक डोह, येडगाव, वडज,विसापूर, चासकमान, निरा देवधर व भाटघर धरणात १० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा उपलब्ध असून या इतर ९ धरणांमध्ये केवळ २० ते ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
    गेल्या सहा महिन्यापूर्वी बहुतांश सर्व धरणात ७० ते ८० टक्के पाणीसाठा होता.तर काही भागात परतीचा पाऊसच न झाल्याने सात ते आठ धरणांमध्ये ३० ते ५० टक्क्यांपर्यंत पाणी उपलब्ध होतो.परंतु,गेल्या सहा महिन्यात पाणी पातळीमध्ये चांगलीच घट झाल्याचे दिसून येत आहे. सर्वसाधारणपणे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर महाष्ट्रात मान्सूनचे आगमन होते. परंतु, गेल्या काही वर्षांचा आधार घेतला तर मान्सूनने महाराष्ट्रात दाखल होण्यास जुलै महिन्यापर्यंतचा कालावधी घेतल्याचे दिसून येते. मान्सून लांबल्यास १० ते ३० टक्क्यांपर्यंत धरणसाठा उपलब्ध असलेल्या नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे धरणातील उपलब्ध पाणी काटकसरीने वापरणे गरजेचे आहे,असे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
---
भीमा खो-यातील धरणांची पाणीसाठ्याची टक्केवारी 
धरण             टक्केवारी
पिंपळगाव जोगे   ०.००
 माणिकडोह         २.८६
 येडगाव              ९.८५
 वडज                १.१५
 डिंभे                  ०.००
  घोड                ०.००
  विसापूर             ७.४२
कळमोडी              १८.१४
 चासकमान           ४.२४
 भामा आसखेड     १४.४३
 वडीवळे              ४१.६३
 आंद्रा                  ४९.४६
 पवना                  २६.२५
 कासारसाई           २५.४०
मुळशी                १६.२८
टेमघर                 ०.००
 वरसगाव            ११.१०
पानशेत               २६.६६
 खडकवासला     २७.१९
 गुंजवणी             २२.०७
 निरा देवधर         ३.२८
 भाटघर             ७.२८
वीर                   २३.४०
नाझरे                ०.००
उजनी             (उणे) -३६.८१

Web Title: Worried ..! Zero percent water stock in five dams in Bhima Valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.