फळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिता का? होऊ शकतात 'या' समस्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 03:10 PM2024-03-15T15:10:35+5:302024-03-15T15:27:34+5:30

जेवण केल्यावर लगेच पाणी प्यायचं नसतं तसंच काही फळं खाल्ल्यानंतरही पाणी प्यायचं नसतं.

Drink Water After Eating Fruits: फळं खाणं आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर असतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण अनेकांना फळं खाण्याची पद्धत माहीत नसल्याने फळांमधील पोषक तत्व शरीराला मिळत नाही. जसे की, जेवण केल्यावर लगेच पाणी प्यायचं नसतं तसंच काही फळं खाल्ल्यानंतरही पाणी प्यायचं नसतं. याने पोटासंबंधी काही समस्या होऊ शकतात. चला जाणून घेऊ कोणती फळं खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये.

काय होतात समस्या? - फळांमध्ये भरपूर व्हिटॅमिन्स आणि आयर्न असतं. जर हे योग्य पद्धतीने खाल्ले गेले तर शरीराला फायदा मिळतो. पण यावर लगेच पाणी प्यायले तर पोटाची पीएच लेव्हल बिघडू शकते. सोबतच पोटात अॅसिड, अपचन, पोटदुखी, उलटी अशा समस्या होऊ शकतात.

फळांमध्ये फ्रुक्टोज आणि नॅचरल शुगर असते. जी शरीरासाठी फार फायदेशीर असते. पण हे फ्रुक्टोजने भरपूर फळं खाल्ल्यानंतर पाणी प्याल तर पोटासंबंधी समस्या वाढू शकतात.

कधी प्यावं पाणी? - फळं खाल्ल्याच्या एक तास आधी किंवा एक तासानंतर पाणी प्यावे. ज्याप्रमाणे जेवण केल्यावर लगेच पाणी प्यायल्याने पचन तंत्र बिघडतं. तसंच फळं खाल्ल्यानंतर पोटासंबंधी समस्या होऊ शकतात. सोबतच अॅसिड बर्न, अॅसिड रिफ्लक्ससारख्या समस्या होऊ शकतात.

पेरू - बरेच लोक पेरू खाल्ल्यानंतर पाणी पितात. पण पेरू खाल्ल्यावर लगेच पाणी प्यायलात तर असं केल्याने तुमची पचन बिघडू शकतं. त्यामुळे पेरू खाल्ल्यावर अजिबात पाणी पिऊ नका

केळी - केळी खाल्ल्यावर सुद्धा पाणी प्याल तर हे नुकसानकारक ठरतं. याने पचनसंबंधी समस्या तर होतेच, सोबतच याने सर्दी-खोकला होण्याचीही शक्यता जास्त असते.

पेर - पेर खाल्ल्यावर लगेच पाणी पिणं टाळलं पाहिजे. याचं कारण याने तुम्हाला सर्दी-खोकला होऊ शकतो. त्यामुळे पेर खाल्ल्यावर लगेच पाणी न पिता थोड्या वेळाने प्यावं.

सफरचंद - इतर फळांसारखंच सफरचंद खाल्ल्यावरही पाणी पिणं टाळलं पाहिजे. सफरचंदाने आरोग्याला अनेक फायदे होतात. पण हे खाल्ल्यावर लगेच पाणी प्याल तर त्यातील आवश्यक तत्व शरीराला योग्यपणे मिळू शकत नाहीत.

डाळिंब - डाळिंबामध्येही अनेक पोषक तत्व असतात. यात आयरन इतरही अनेक महत्वाचं तत्व असतात ज्याने शरीराला खूप फायदे मिळतात. पण डाळिंब खाल्ल्यावर लगेच पाणी प्याल तर हे नुकसानकारक ठरू शकतं. याने शरीराला पोषक तत्व मिळत नाहीत.