शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळातील पहिली रॅली

By admin | Updated: October 11, 2016 02:54 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी नागपुरात बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. अन् लाखो बांधवांना

धम्मचक्र प्रवर्तन दिनाची आठवण करून देणारी रूपेश उत्तरवार ल्ल यवतमाळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी नागपुरात बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. अन् लाखो बांधवांना दीक्षा देऊन सन्मानाचे नवजीवन प्रदान केले. या ऐतिहासिक क्षणाची आठवण करून देणारा दिवस म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन. हा दिवस नागपुरात दरवर्षी साजरा होते. यासोबतच प्रत्येक गाव, वस्ती आणि शहरामध्ये या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतात. यवतमाळातही या दिवसाच्या अनुषंगाने १९७९ मध्ये विशाल रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीचे नेतृत्व जपानचे भंते तथा दीक्षाभूमीचे अध्यक्ष आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी केले होते. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असलेले अनेक बांधव त्या आठवणीला आजही उजाळा देतात. धम्मचक्र प्रवर्तन दिनी दीक्षा घेण्यासाठी गेलेल्या काही बांधवांना हा क्षण आजही स्मरणात आहे. यवतमाळच्या पाटीपुऱ्यातील कमलाबाई गायकवाड त्याच्या प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. त्यावेळी त्या १२ वर्षांच्या होत्या. आज त्या ७२ वर्षांच्या आहेत. त्यावेळी त्यांच्यासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाकवी पदवी दिलेले राजानंद गडपायले, हिरामण सोनडवले, श्रीराम गायकवाड, वसंत चंदनखेडे, रामा गेडाम, रामचंद्र महाजन, बालाराम टेंभुर्णे, जनपथकर गुरूजी, राजाराम रामटेके, दौलतकर गडपायले, जाईबाई रामटेके, दौलत पाटील यांच्यासह अनेक जण जथ्थ्याने यवतमाळातून धम्मदीक्षासाठी नागपुरात गेल्याचे त्या सांगतात. सोनं लुटून आले, मी आणि धनी माझं, आनंद मनी माझ्या मावेना आज या गीताने त्यावेळी धूम केली होती. आजही हे गीत तितक्याच गोडीने ऐकले जाते. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांना ऐकण्यासोबतच दीक्षा घेण्यासाठी उसळलेली गर्दी यापूर्वी त्यांनी कधीही पाहिली नव्हती, असे त्या सांगतात. यानंतरच्या काळात दसऱ्याला धम्मचक्र प्रवर्तनदिनाचा कार्यक्रम स्मरण म्हणून सुरू झाला. १९७८-१९७९ ला समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी मोठे आयोजन करण्याचे ठरविले. या दिवशी सर्वात मोठी रॅली काढण्यात आली. विशेष म्हणजे, या रॅलेचे नेतृत्व जपानचे भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी केले होते. त्यावेळी वाहनावर मोठा रथ तयार करण्यात आला होता. त्यावर भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा होती. भंतेजी आसनस्थ होते. या रॅलीचे नंतर सभेत रूपांतर झाले. या सभेसाठी पंजाबमधील भीमपत्रिकेचे संपादक एल. आर. बाली यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलविण्यात आले होते. यानंतर समता सैनिक दलाच्या नेतृत्वात विविध कार्यक्रम पार पडले. यासाठी मा. म. देशमुख, नलिनी सोमकुवर, श्रीरंग वारे, तु. ग. पाटील यासारखे वक्ते येऊन गेले, अशी माहिती नाग संघटनेचे प्रमुख आनंद गायकवाड यांनी दिली. धम्मदीक्षा घेणारा प्रत्येक जण वर्षावासाचा उपवास करतो. त्याकरिता तीन महिने पवित्र मानले जातात. आषाढ पौर्णिमेपासून ते आश्विन पौर्णिमेपर्यंत ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन करण्यात येते. विशेष म्हणजे, याची समाप्ती धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या लगतच असते. यामुळे धम्मदीक्षेत वर्षावासाला अधिक महत्त्व आहे.