शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळला केंद्रात प्रथमच लाल दिवा

By admin | Updated: November 8, 2014 22:43 IST

चंद्रपूर - वणी - आर्णी लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार हंसराज गंगाराम अहीर यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेश निश्चित झाला आहे. त्यांच्या रूपाने स्वातंत्र्यानंतर यवतमाळ जिल्ह्याला

हंसराज अहीर : गुरूवारीच झाले मंत्रिपद निश्चित, भाजपाचे आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते दिल्लीकडे रवानारवींद्र चांदेकर - वणीचंद्रपूर - वणी - आर्णी लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार हंसराज गंगाराम अहीर यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेश निश्चित झाला आहे. त्यांच्या रूपाने स्वातंत्र्यानंतर यवतमाळ जिल्ह्याला प्रथम तर चंद्रपूर जिल्ह्याला दुसऱ्यांदा केंद्राचा लाल दिवा मिळणार आहे. मंगळवार ११ नोव्हेंबरला आपला ६0 वा वाढदिवस साजरा कणाऱ्या अहीर यांना केंद्रीय मंत्रिपदाची ही आगळीवेगळी भेट मिळणार आहे.खासदार अहीर यांचे वडील गंगाराम अहीर मलेरिया डॉक्टर होते. शासकीय सेवेत नियुक्ती झाल्याने ते चंद्रपूरलाच स्थायिक झाले. हंसराज अहीर तेथेच लहानाचे मोठे झाले. एल.टी.वाय.हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. विद्यार्थी दशेपासूनच ते तत्कालीन जनसंघ आणि नंतर भाजपाशी जुळून होते. लोकांच्या समस्यांसाठी झटणारे नेतृत्व म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. कामगारांचे नेते म्हणून त्यांनी मान्यता मिळविली. याच लढाऊ बाण्याने भाजपातील धुरंधरांचे त्यांच्याकडे लक्ष गेले अन् १९९४ मध्ये ते सर्वप्रथम महाराष्ट्राच्या विधान परिषदेत निवडून गेले. तेव्हापासून त्यांनी कधीच मागे वळून बघितले नाही. लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेपूर्वी त्यांनी दोनदा चंद्रपूरचे खासदार म्हणून लोकसभेत आपला ठसा उमटविला. २00९ मध्ये लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर भाजपाने त्यांनाच नवीन चंद्रपूर-वणी-आर्णी मतदार संघातून उमेदवारी बहाल केली. या नवीन मतदार संघातूनही त्यांनी २00९ मध्ये काँग्रेसचे दिग्गज नरेंद्र पुगलिया यांना पराभूत करून विजयाची हॅट्ट्रिक साधली.नवीन मतदार संघामुळे गेल्या पाच वर्षांत वणी, पांढरकवडा, मारेगाव, झरीजामणी, घाटंजी, आर्णी आदी तालुक्यांसह यवतमाळ जिल्ह्यात त्यांनी संपर्क वाढविला. याच संपर्काच्या भरवशावर ते नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्क्याने विजयी झाले. त्यांच्या विजयात वणी आणि आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघाचा मोलाचा वाटा आहे. गेल्या निवडणुकीत अहीर यांना पाच लाख आठ हजार ४९ एवढी मते मिळाली. प्रतिस्पर्धी काँग्रेसचे संजय देवतळे यांनी दोन लाख ७१ हजार ७८० मतांवर समाधान मानावे लागले होते. अहीर यांनी तब्बल दोन लाख ३६ हजार २६९ मतांनी विजय प्राप्त केला होता. यात वणी आणि आर्णी विधानसभा मतदार संघाने त्यांना अनुक्रमे ९२ हजार १०८ व एक लाख १० हजार ७४५ मते बहाल केली होती. वणी मतदार संघाने त्यांना काँग्रेस उमेदवारापेक्षा तब्बल ५३ हजार ८४८ तर आर्णी मतदारसंघानेही ५९ हजार ८१४ मतांची आघाडी दिली होती. अहीर दोन लाखांच्या फरकाने जिंकले होते. त्यात वणी आणि आर्णीचा तब्बल एक लाख १३ हजार ६६२ मतांचा वाटा होता. दोन लाख ३६ हजार २६९ मतांच्या फरकात चंद्रपूर जिल्ह्यापेक्षाही अहीर यांना यवतमाळ जिल्ह्यातील दोन मतदार संघानी मोलाची मदत केली होती. देशात २६ मे रोजी भाजपप्रणीत सरकार आले. अहीर यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार अशी चर्चा त्यावेळी जोरात होती. भाजप नेते नितीन गडकरी यांनी त्यांना तसा निरोपही दिला होता. मात्र ऐनवेळी त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. तत्पूर्वी गडकरी यांनी अहीर यांना तसा निरोप देऊन पुढील विस्तारात नक्की सामावून घेतले जाईल, अशी ग्वाहीही दिली होती. आता रविवारी १० नोव्हेंबरला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. गुरुवारी ६ नोव्हेंबरला अहीर यांना पंतप्रधान कार्यालयातून दूरध्वनी आला होता. मंत्रिमंडळ विस्तारात समावेश होत असल्याने आपण १0 नोव्हेंबरला उपस्थित राहावे, असे त्यांना सांगण्यात आले होते. संदेश मिळताच शुक्रवार ७ नोव्हेंबरला हंसराज अहीर चंद्रपूर येथून दिल्लीकडे रवाना झाले.