शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरवाढोणाच्या धनगरी तलावाचे काम थांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 05:00 IST

सोनखास उपवनक्षेत्रात उत्तरवाढोणा शिवारात गेली ५० वर्षांआधी सिंचन विभागाच्यावतीने धनगरी तलावाची निर्मिती करण्यात आली. या तलावाचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी होतो. अनेक वर्षांपासून तलावाची भिंत जागोजागी लिकेज आहे. पावसाळा संपताच संपूर्ण तलाव रिकामा होवून जातो. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाकडे या तलावाच्या दुरुस्तीसाठी वारंवार निवेदन दिले.

ठळक मुद्देवनविभागाची आडकाठी : अपूर्ण कामामुळे अनर्थ होण्याची नागरिकांना भीती

पांडुरंग भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कसोनखास : उत्तरवाढोणा शिवारातील धनगरी तलावाच्या डागडुजीकरिता दारव्हा सिंचन विभागाने सुरू केलेले काम वनविभागाने थांबविले. पावसाळ्यापूर्वी सदर काम पूर्ण न झाल्यास पावसाळ्यात मोठा अनर्थ होण्याची भीती आहे. पाण्याच्या साठ्याने तलाव फुटून आजूबाजूचे शेत आणि उत्तरवाढोणा गावाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिंचन विभाग व वनविभागामध्ये या कामाविषयी समन्वय नाही. सध्यातरी कुठल्याही उपाययोजना होताना दिसत नाही.सोनखास उपवनक्षेत्रात उत्तरवाढोणा शिवारात गेली ५० वर्षांआधी सिंचन विभागाच्यावतीने धनगरी तलावाची निर्मिती करण्यात आली. या तलावाचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी होतो. अनेक वर्षांपासून तलावाची भिंत जागोजागी लिकेज आहे. पावसाळा संपताच संपूर्ण तलाव रिकामा होवून जातो. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाकडे या तलावाच्या दुरुस्तीसाठी वारंवार निवेदन दिले. त्याला यावर्षी दारव्हा सिंचन विभागाने प्रतिसाद देत तलावाच्या दुरुस्तीकरिता २२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला.दीर्घ प्रतीक्षेनंतर काम सुरू झाले. भिंतीची भगदाडं बुजविणे सुरू असतानाच सोनखास उपवनक्षेत्राने सदर काम थांबविले. तलाव वनविभागाच्या हद्दीत येतो, कुठलाही पत्रव्यवहार सिंचन विभागाने केला नाही, असे कारण देत वनविभागाने काम थांबविले.वनविभागाने काम थांबविल्यामुळे धरणाची कोरण्यात आलेली भिंत जेसीबीने थातुरमातूर बुजविण्यात आली. आता गेली अनेक दिवसांपासून हे काम बंद आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. पावसाच्या पाण्याने तलाव भरून फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तलावाचे पाणी उत्तरवाढोणा गावात शिरून मोठा धोका होण्याची भीती आहे. सदर काम तत्काळ हाती घेण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.सिंचन व वनविभागात समन्वयाचा अभावतलावाच्या दुरुस्तीकरिता सिंचन व वनविभागात समन्वयाचा अभाव आहे. पावसाळ्यापूर्वी काम न झाल्यास होणाºया नुकसानीला सदर दोनही विभाग जबाबदार राहणार आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी या गंभीर विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.कामाच्या ठिकाणापर्यंत बांधकाम साहित्य नेण्याची रहदारी पास सिंचन विभागाने काढली नाही. याची पूर्तता केल्यानंतर काम सुरू करण्यास हरकत नाही.- नितीन बिजवार,वनरक्षक, सोनखास

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प