शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

उत्तरवाढोणाच्या धनगरी तलावाचे काम थांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 05:00 IST

सोनखास उपवनक्षेत्रात उत्तरवाढोणा शिवारात गेली ५० वर्षांआधी सिंचन विभागाच्यावतीने धनगरी तलावाची निर्मिती करण्यात आली. या तलावाचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी होतो. अनेक वर्षांपासून तलावाची भिंत जागोजागी लिकेज आहे. पावसाळा संपताच संपूर्ण तलाव रिकामा होवून जातो. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाकडे या तलावाच्या दुरुस्तीसाठी वारंवार निवेदन दिले.

ठळक मुद्देवनविभागाची आडकाठी : अपूर्ण कामामुळे अनर्थ होण्याची नागरिकांना भीती

पांडुरंग भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कसोनखास : उत्तरवाढोणा शिवारातील धनगरी तलावाच्या डागडुजीकरिता दारव्हा सिंचन विभागाने सुरू केलेले काम वनविभागाने थांबविले. पावसाळ्यापूर्वी सदर काम पूर्ण न झाल्यास पावसाळ्यात मोठा अनर्थ होण्याची भीती आहे. पाण्याच्या साठ्याने तलाव फुटून आजूबाजूचे शेत आणि उत्तरवाढोणा गावाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिंचन विभाग व वनविभागामध्ये या कामाविषयी समन्वय नाही. सध्यातरी कुठल्याही उपाययोजना होताना दिसत नाही.सोनखास उपवनक्षेत्रात उत्तरवाढोणा शिवारात गेली ५० वर्षांआधी सिंचन विभागाच्यावतीने धनगरी तलावाची निर्मिती करण्यात आली. या तलावाचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी होतो. अनेक वर्षांपासून तलावाची भिंत जागोजागी लिकेज आहे. पावसाळा संपताच संपूर्ण तलाव रिकामा होवून जातो. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाकडे या तलावाच्या दुरुस्तीसाठी वारंवार निवेदन दिले. त्याला यावर्षी दारव्हा सिंचन विभागाने प्रतिसाद देत तलावाच्या दुरुस्तीकरिता २२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला.दीर्घ प्रतीक्षेनंतर काम सुरू झाले. भिंतीची भगदाडं बुजविणे सुरू असतानाच सोनखास उपवनक्षेत्राने सदर काम थांबविले. तलाव वनविभागाच्या हद्दीत येतो, कुठलाही पत्रव्यवहार सिंचन विभागाने केला नाही, असे कारण देत वनविभागाने काम थांबविले.वनविभागाने काम थांबविल्यामुळे धरणाची कोरण्यात आलेली भिंत जेसीबीने थातुरमातूर बुजविण्यात आली. आता गेली अनेक दिवसांपासून हे काम बंद आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. पावसाच्या पाण्याने तलाव भरून फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तलावाचे पाणी उत्तरवाढोणा गावात शिरून मोठा धोका होण्याची भीती आहे. सदर काम तत्काळ हाती घेण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.सिंचन व वनविभागात समन्वयाचा अभावतलावाच्या दुरुस्तीकरिता सिंचन व वनविभागात समन्वयाचा अभाव आहे. पावसाळ्यापूर्वी काम न झाल्यास होणाºया नुकसानीला सदर दोनही विभाग जबाबदार राहणार आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी या गंभीर विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.कामाच्या ठिकाणापर्यंत बांधकाम साहित्य नेण्याची रहदारी पास सिंचन विभागाने काढली नाही. याची पूर्तता केल्यानंतर काम सुरू करण्यास हरकत नाही.- नितीन बिजवार,वनरक्षक, सोनखास

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प