शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

उत्तरवाढोणाच्या धनगरी तलावाचे काम थांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 05:00 IST

सोनखास उपवनक्षेत्रात उत्तरवाढोणा शिवारात गेली ५० वर्षांआधी सिंचन विभागाच्यावतीने धनगरी तलावाची निर्मिती करण्यात आली. या तलावाचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी होतो. अनेक वर्षांपासून तलावाची भिंत जागोजागी लिकेज आहे. पावसाळा संपताच संपूर्ण तलाव रिकामा होवून जातो. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाकडे या तलावाच्या दुरुस्तीसाठी वारंवार निवेदन दिले.

ठळक मुद्देवनविभागाची आडकाठी : अपूर्ण कामामुळे अनर्थ होण्याची नागरिकांना भीती

पांडुरंग भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कसोनखास : उत्तरवाढोणा शिवारातील धनगरी तलावाच्या डागडुजीकरिता दारव्हा सिंचन विभागाने सुरू केलेले काम वनविभागाने थांबविले. पावसाळ्यापूर्वी सदर काम पूर्ण न झाल्यास पावसाळ्यात मोठा अनर्थ होण्याची भीती आहे. पाण्याच्या साठ्याने तलाव फुटून आजूबाजूचे शेत आणि उत्तरवाढोणा गावाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिंचन विभाग व वनविभागामध्ये या कामाविषयी समन्वय नाही. सध्यातरी कुठल्याही उपाययोजना होताना दिसत नाही.सोनखास उपवनक्षेत्रात उत्तरवाढोणा शिवारात गेली ५० वर्षांआधी सिंचन विभागाच्यावतीने धनगरी तलावाची निर्मिती करण्यात आली. या तलावाचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी होतो. अनेक वर्षांपासून तलावाची भिंत जागोजागी लिकेज आहे. पावसाळा संपताच संपूर्ण तलाव रिकामा होवून जातो. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाकडे या तलावाच्या दुरुस्तीसाठी वारंवार निवेदन दिले. त्याला यावर्षी दारव्हा सिंचन विभागाने प्रतिसाद देत तलावाच्या दुरुस्तीकरिता २२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला.दीर्घ प्रतीक्षेनंतर काम सुरू झाले. भिंतीची भगदाडं बुजविणे सुरू असतानाच सोनखास उपवनक्षेत्राने सदर काम थांबविले. तलाव वनविभागाच्या हद्दीत येतो, कुठलाही पत्रव्यवहार सिंचन विभागाने केला नाही, असे कारण देत वनविभागाने काम थांबविले.वनविभागाने काम थांबविल्यामुळे धरणाची कोरण्यात आलेली भिंत जेसीबीने थातुरमातूर बुजविण्यात आली. आता गेली अनेक दिवसांपासून हे काम बंद आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. पावसाच्या पाण्याने तलाव भरून फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तलावाचे पाणी उत्तरवाढोणा गावात शिरून मोठा धोका होण्याची भीती आहे. सदर काम तत्काळ हाती घेण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.सिंचन व वनविभागात समन्वयाचा अभावतलावाच्या दुरुस्तीकरिता सिंचन व वनविभागात समन्वयाचा अभाव आहे. पावसाळ्यापूर्वी काम न झाल्यास होणाºया नुकसानीला सदर दोनही विभाग जबाबदार राहणार आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी या गंभीर विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.कामाच्या ठिकाणापर्यंत बांधकाम साहित्य नेण्याची रहदारी पास सिंचन विभागाने काढली नाही. याची पूर्तता केल्यानंतर काम सुरू करण्यास हरकत नाही.- नितीन बिजवार,वनरक्षक, सोनखास

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प