शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

उत्तरवाढोणाच्या धनगरी तलावाचे काम थांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 05:00 IST

सोनखास उपवनक्षेत्रात उत्तरवाढोणा शिवारात गेली ५० वर्षांआधी सिंचन विभागाच्यावतीने धनगरी तलावाची निर्मिती करण्यात आली. या तलावाचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी होतो. अनेक वर्षांपासून तलावाची भिंत जागोजागी लिकेज आहे. पावसाळा संपताच संपूर्ण तलाव रिकामा होवून जातो. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाकडे या तलावाच्या दुरुस्तीसाठी वारंवार निवेदन दिले.

ठळक मुद्देवनविभागाची आडकाठी : अपूर्ण कामामुळे अनर्थ होण्याची नागरिकांना भीती

पांडुरंग भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कसोनखास : उत्तरवाढोणा शिवारातील धनगरी तलावाच्या डागडुजीकरिता दारव्हा सिंचन विभागाने सुरू केलेले काम वनविभागाने थांबविले. पावसाळ्यापूर्वी सदर काम पूर्ण न झाल्यास पावसाळ्यात मोठा अनर्थ होण्याची भीती आहे. पाण्याच्या साठ्याने तलाव फुटून आजूबाजूचे शेत आणि उत्तरवाढोणा गावाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिंचन विभाग व वनविभागामध्ये या कामाविषयी समन्वय नाही. सध्यातरी कुठल्याही उपाययोजना होताना दिसत नाही.सोनखास उपवनक्षेत्रात उत्तरवाढोणा शिवारात गेली ५० वर्षांआधी सिंचन विभागाच्यावतीने धनगरी तलावाची निर्मिती करण्यात आली. या तलावाचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी होतो. अनेक वर्षांपासून तलावाची भिंत जागोजागी लिकेज आहे. पावसाळा संपताच संपूर्ण तलाव रिकामा होवून जातो. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाकडे या तलावाच्या दुरुस्तीसाठी वारंवार निवेदन दिले. त्याला यावर्षी दारव्हा सिंचन विभागाने प्रतिसाद देत तलावाच्या दुरुस्तीकरिता २२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला.दीर्घ प्रतीक्षेनंतर काम सुरू झाले. भिंतीची भगदाडं बुजविणे सुरू असतानाच सोनखास उपवनक्षेत्राने सदर काम थांबविले. तलाव वनविभागाच्या हद्दीत येतो, कुठलाही पत्रव्यवहार सिंचन विभागाने केला नाही, असे कारण देत वनविभागाने काम थांबविले.वनविभागाने काम थांबविल्यामुळे धरणाची कोरण्यात आलेली भिंत जेसीबीने थातुरमातूर बुजविण्यात आली. आता गेली अनेक दिवसांपासून हे काम बंद आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. पावसाच्या पाण्याने तलाव भरून फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तलावाचे पाणी उत्तरवाढोणा गावात शिरून मोठा धोका होण्याची भीती आहे. सदर काम तत्काळ हाती घेण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.सिंचन व वनविभागात समन्वयाचा अभावतलावाच्या दुरुस्तीकरिता सिंचन व वनविभागात समन्वयाचा अभाव आहे. पावसाळ्यापूर्वी काम न झाल्यास होणाºया नुकसानीला सदर दोनही विभाग जबाबदार राहणार आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी या गंभीर विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.कामाच्या ठिकाणापर्यंत बांधकाम साहित्य नेण्याची रहदारी पास सिंचन विभागाने काढली नाही. याची पूर्तता केल्यानंतर काम सुरू करण्यास हरकत नाही.- नितीन बिजवार,वनरक्षक, सोनखास

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प