शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पाणवठे आटल्याने वन्यजीव रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:09 AM

यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जानेवारी महिन्यातच जंगलातील पाणवठे आटले असून त्यामुळे वन्यजीव पाण्याच्या शोधात भटकत रस्त्यावर येत आहेत. यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून या वन्यजीवांच्या शिकारीही केल्या जात आहे.

ठळक मुद्देशिकारी वाढल्या : वनविभागाचे दुर्लक्ष, पाणवठ्यांचे व्यवस्थापन नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जानेवारी महिन्यातच जंगलातील पाणवठे आटले असून त्यामुळे वन्यजीव पाण्याच्या शोधात भटकत रस्त्यावर येत आहेत. यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून या वन्यजीवांच्या शिकारीही केल्या जात आहे. असे असले तरी वनविभाग मात्र याविषयात अद्यापही गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.वन्यजीव जंगलाबाहेर पडू नये, यासाठी वनविभागाच्यावतीने वणी, झरी व मारेगाव तालुक्यातील जंगलामध्ये कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले. मात्र देखभाल व दुरूस्तीअभावी या पाणवठ्यांची अतिशय दुरावस्था झाली आहे. या पाणवठ्यांमध्ये नियमीत पाण्याची व्यवस्था केली जाते की नाही, हादेखिल संशोधनाचा विषय ठरला आहे. वणी, झरी व मारेगाव या तीन तालुक्यांमध्ये वन्यजीवांची संख्या मोठी आहे. त्यात वाघ, हरिण, मोर, ससे, रोही, रानडुकरे, निलगाय, यांची संख्या मोठी आहे. दिवसेंदिवस ही संख्या झपाट्याने वाढत असल्याने या वन्यजीवांच्या सुरक्षेबाबतची चिंता वाढली आहे.पाण्याच्या शोधात वन्यजीव अनेकदा लोकवस्त्यांकडे धाव घेतात. त्यातून मानव-वन्यजीव संघर्षाची ठिणगी पडते. हा संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाकडून कोणत्याही उपायययोजना गांभीर्याने केल्या जात नसल्याचे दरवर्षीच दिसून येते. परिणामी गेल्या काही वर्षात झरी व वणी तालुक्यात व्याघ्र हल्ल्यामध्ये अनेकांचे निष्कारण बळी गेले आहेत. पांढरकवडा वनपरीक्षेत्रात जवळपास २६ वाघ आहेत. त्यातील अनेक वाघ झरी परिसरातील जंगलांमध्ये भटकत असतात.शिकार व पाण्याच्या शोधात अनेकदा हे वाघ लोकवस्त्यांपर्यंत पोहोचतात. त्यातून व्याघ्र हल्ले झाल्याचा इतिहास आहे. जंगलात असलेल्या पाणवठ्यांची व्यवस्थित देखभाल झाल्यास मानव-वन्यजीव संघर्षाला पूर्णविराम मिळू शकतो. परंतु पाणवठ्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. घोन्सा ते झरी मार्गावर अनेकदा वन्यजीवांचे दर्शन होते. या भागात मोरांची संख्या मोठी आहे. एकावेळी ४०-४० मोरांचा थव्वा वर्दळीच्या रस्त्यावर पाण्याच्या शोधात भटकताना अनेकदा नजरेस पडला आहे.मोर व सशांवर शिकाऱ्यांचा डोळाझरी तालुक्यातील जंगलांमध्ये मोर व सशांची संख्या मोठी आहे. या दोन प्राण्यांवर शिकाºयांचा कायम डोळा असतो. या प्राण्यांच्या मांसाला बाजारात चांगली किंमत मिळत असल्याने त्यांची शिकार करून त्याचे मांस विकण्याचा गोरखधंदाच या भागात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. हा भाग दुर्गम असल्याने या प्रकाराकडे वनविभागाचे कायम दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या शिकारीमुळे प्राण्यांची संख्या कमी होण्याची भीती वन्यजीव प्रेमींमधून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागwater shortageपाणीटंचाई