शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये पाणीबाणी; शेतकरी आत्महत्यांचा आलेख वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 15:07 IST

निसर्गाच्या लहरीपणाने राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये पाणीबाणी निर्माण झाली आहे. या जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत तब्बल ५४ टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपावसात ५४ टक्के तूट पिकांची स्थिती दयनीय

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणाने राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये पाणीबाणी निर्माण झाली आहे. या जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत तब्बल ५४ टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे. परिणामी पिकांची स्थिती बिकट झाली असून डोळ्यादेखत पीक करपत असल्याने शेतकरी आत्महत्येचा आलेख वाढत आहे.पावसाअभावी या जिल्ह्यांमधील सर्व प्रकल्पांनी तळ गाठण्यास सुरूवात केली. यातून पाणी प्रश्न गंभीर होत आहे. मानवाच्या पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याची स्थिती चिंताजनक झाली आहे. यामुळे २४ जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहे. दुसरीकडे अशा अडचणीच्या काळात राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज पुनर्गठनास नकार देण्यास सुरूवात केली. एकीकडे पीक संकटात आणि दुसरीकडे बँंका कर्ज देत नाही. या चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यादेख पीक करपत आहे. अशा व्दिधा स्थितीत अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यास सुरूवात केली आहे. यातून चालू खरीप हंगामात शेतकरी आत्महत्येचा आलेख वाढत आहे.भारतीय पर्जन्यमान विभागाने एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यात राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये पाण्याच्या बाबतीत ‘रेड अलर्ट’ जाहीर करण्यात आला. यात सर्वात कमी पावसाची नोंद यवतमाळ जिल्ह्यात करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यात एकूण पर्जन्यमानाच्या तुलनेत ५४ टक्के कमी पाऊस झाला. अशीच स्थिती इतरही जिल्ह्यांची आहे. परिणामी जुलै अखेरपर्यंत ७६ टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या. २४ टक्के क्षेत्रात अद्याप पेरणी झाली नाही. ही बाब कृषी विभागानेच कबूल केली आहे.यावर्षी आजपर्यंत राज्यातील ३६ लाख हेक्टरवर पेरणी झाली नाही. आता उशिरा पाऊस बरसला तरी कपाशी, सोयाबीन या मुख्य पिकांऐवजी शेतकऱ्यांना मका, तूर अशा दुय्यम पिकांची पेरणी करावी लागणार आहे. यामुळे संपूर्ण कुटुंब शेतीवरच अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. यामुळे शेतकरी चिंताक्रांत आहे. सर्वाधिक पाऊस बरसणारा महिना म्हणून जुलै आणि आॅगस्टकडे पाहिले जाते. मात्र यावर्षी २४ जिल्ह्याकडे जुलैमध्येही पावसाने पाठ फिरविली. परिणामी राज्यातील प्रकल्पांमध्ये केवळ ३५० टीएमसी पाणी शिल्लक आहे. हा साठा एकूण क्षमतेच्या केवळ २५ टक्के आहे. पुणे आणि मुंबईमधील काही धरणे वगळता इतरत्र पाण्याचा पत्ता नाही.सहा महिन्यात १३०० शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळलेसततची नापिकी व दुष्काळी स्थितीमुळे गेल्या सहा महिन्यात राज्यातील १३०० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. अमरावती विभागात सर्वाधिक ४६३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. औरंगाबाद विभागात ४३४ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली. अमरावती विभागात सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांची नोंद बुलडाणा जिल्ह्यात झाली आहे. या जिल्ह्यात १३४, अमरावती १२२, तर यवतमाळ जिल्ह्यात ११३ शेतकऱ्यांनी आतमहत्या केली. बीड ९६, अहमदनगर ७१, उस्मानाबाद ६६, तर औरंगाबाद जिल्ह्यात ६३ शेतकरी आत्महत्यांची नोंद आहे.आठ दिवसानंतर खरीप कर्ज वितरण थांबणारदुष्काळी स्थितीने कर्जाची परतफेड करू न शकलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचा अध्यादेश शासनाने काढला. तो राज्यस्तरीय बँकर्स कमिटीला पाठविला. मात्र राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा कर्ज पुनर्गठनास तयार नाही. तशा तक्रारी शेतकऱ्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या. आता खरीप कर्ज वितरणासाठी ३१ जुलैची अंतिम मुदत आहे. त्यानंतर कर्ज वितरण थांबणार आहे. तथापि राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्ज वितरण अद्यापही ३० टक्केपेक्षा पुढे सरकले नाही. यामुळे पुढील आठ दिवसात उर्वरित कर्ज वितरण होईल काय, असा प्रश्न आहे.

टॅग्स :agricultureशेतीwater shortageपाणीकपात