शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

नेरमधील वादळग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 21:24 IST

तब्बल पाच दिवस तालुक्यात वादळाने थैमान घातले. या प्रकारात घरे, फळबागा, कुक्कुटपालन शेड आदी नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना शासनाकडून भरपाईची प्रतीक्षा आहे. दरम्यान काही भागात महसूल विभागाकडून पाहणी केली जात आहे.

ठळक मुद्देपाच दिवस थैमान : महसूल विभागाकडून पाहणी, ३० गावांना बसला तडाखा

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तब्बल पाच दिवस तालुक्यात वादळाने थैमान घातले. या प्रकारात घरे, फळबागा, कुक्कुटपालन शेड आदी नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना शासनाकडून भरपाईची प्रतीक्षा आहे. दरम्यान काही भागात महसूल विभागाकडून पाहणी केली जात आहे.तालुक्यातील जवळपास ३० गावांना वादळाचा तडाखा बसला. अनेक लोकांच्या घरावरील टीनपत्रे उडाल्याने त्यांना आभाळाच्या छताखाली राहावे लागत आहे. टीनपत्रे खराब झाल्याने नवीन घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. याशिवाय इतर वस्तूंची नासधूस झाली.स्वयंरोजगार म्हणून सुरू केलेल्या कुक्कुटपालनाच्या व्यवसायालाही फटका बसला. तालुक्यात दोन जणांचे कुक्कुटपालन शेड उडून गेले. यात शेकडो कोंबड्या मृत झाल्या. फळबागांना मोठी हानी पोहोचली. फळे गळून पडली, तर काही ठिकाणी झाडे जमिनदोस्त झाली. रस्त्यावरील झाडे कोसळल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला.मागील पाच दिवसात तालुक्यातील घारेफळ, बाणगाव, चिचगाव, शेंद्री, सातेफळ, सारंगपूर, मोझर, उदापूर, मांगलादेवी, माणिकवाडा, कापसी, सातेफळ, उमरठा, खरडगाव, सावरगाव, ब्राह्मणवाडा (पूर्व), ब्राह्मणवाडा (पश्चिम) आदी गावांना वादळाचा तडाखा बसला. काही भागात पाऊस झाला. महसूल विभागाने झालेल्या नुकसानीची पाहणी सुरू केली. नायब तहसीलदार राजेंद्र चिंतकुटलवार व संजय भोयर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य भरत मसराम यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट दिली. अहवाल सादर झाल्यानंतर नुकसानीसंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.विद्युत कंपनीचा गलथान कारभारउन्हाळ्यात करावयाची कामे विद्युत कंपनीने सुरू केली नाही. शिवाय तालुक्यात विविध कामांसाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचेही पितळ उघडे पडले. निकृष्ट वीज खांब जमिनदोस्त झाले. या सर्व प्रकारात ग्रामीण भागात सर्वत्र अंधार आहे. शिवाय शहरालाही ही समस्या भेडसावत आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे.

टॅग्स :Rainपाऊसweatherहवामान