शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नेरमधील वादळग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 21:24 IST

तब्बल पाच दिवस तालुक्यात वादळाने थैमान घातले. या प्रकारात घरे, फळबागा, कुक्कुटपालन शेड आदी नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना शासनाकडून भरपाईची प्रतीक्षा आहे. दरम्यान काही भागात महसूल विभागाकडून पाहणी केली जात आहे.

ठळक मुद्देपाच दिवस थैमान : महसूल विभागाकडून पाहणी, ३० गावांना बसला तडाखा

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तब्बल पाच दिवस तालुक्यात वादळाने थैमान घातले. या प्रकारात घरे, फळबागा, कुक्कुटपालन शेड आदी नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना शासनाकडून भरपाईची प्रतीक्षा आहे. दरम्यान काही भागात महसूल विभागाकडून पाहणी केली जात आहे.तालुक्यातील जवळपास ३० गावांना वादळाचा तडाखा बसला. अनेक लोकांच्या घरावरील टीनपत्रे उडाल्याने त्यांना आभाळाच्या छताखाली राहावे लागत आहे. टीनपत्रे खराब झाल्याने नवीन घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. याशिवाय इतर वस्तूंची नासधूस झाली.स्वयंरोजगार म्हणून सुरू केलेल्या कुक्कुटपालनाच्या व्यवसायालाही फटका बसला. तालुक्यात दोन जणांचे कुक्कुटपालन शेड उडून गेले. यात शेकडो कोंबड्या मृत झाल्या. फळबागांना मोठी हानी पोहोचली. फळे गळून पडली, तर काही ठिकाणी झाडे जमिनदोस्त झाली. रस्त्यावरील झाडे कोसळल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला.मागील पाच दिवसात तालुक्यातील घारेफळ, बाणगाव, चिचगाव, शेंद्री, सातेफळ, सारंगपूर, मोझर, उदापूर, मांगलादेवी, माणिकवाडा, कापसी, सातेफळ, उमरठा, खरडगाव, सावरगाव, ब्राह्मणवाडा (पूर्व), ब्राह्मणवाडा (पश्चिम) आदी गावांना वादळाचा तडाखा बसला. काही भागात पाऊस झाला. महसूल विभागाने झालेल्या नुकसानीची पाहणी सुरू केली. नायब तहसीलदार राजेंद्र चिंतकुटलवार व संजय भोयर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य भरत मसराम यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट दिली. अहवाल सादर झाल्यानंतर नुकसानीसंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.विद्युत कंपनीचा गलथान कारभारउन्हाळ्यात करावयाची कामे विद्युत कंपनीने सुरू केली नाही. शिवाय तालुक्यात विविध कामांसाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचेही पितळ उघडे पडले. निकृष्ट वीज खांब जमिनदोस्त झाले. या सर्व प्रकारात ग्रामीण भागात सर्वत्र अंधार आहे. शिवाय शहरालाही ही समस्या भेडसावत आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे.

टॅग्स :Rainपाऊसweatherहवामान