शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

दुसरा दिवसही अवकाळीचाच, शेतकऱ्यांत धडकी कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 14:52 IST

पाच लाख हेक्टरवरील कापसाची केली पावसाने माती

यवतमाळ : जिल्ह्यातील शेतीवर अवकाळी पावसाचे संकट ओढवले आहे. सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा कहर सुरूच होता. जिल्हाभरात मंगळवारी १६ मिमी. पावसाची नोंद झाली. त्यातही उमरखेड व पुसद उपविभागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. जवळपास ५ लाख हेक्टरवरील कापसाचे पीक जमीनदोस्त झाले आहे. कापूस पावसात भिजल्याने त्याची प्रतवारी खराब झाली आहे. हवामान खात्याने आणखीन पुढील काही दिवस पावसाचा जोर सांगितल्याने शेतकऱ्यांमध्ये धडकी भरली आहे.

सरकारी शिरस्त्याप्रमाणे मंत्रालय स्तरावरून कृषी विभागाला नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या गारठवून टाकणारी थंडी व वादळी वारा असल्याने कृषी विभागाची यंत्रणा शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचलेली नाही. यापूर्वी नैसर्गिक संकटात झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले. त्या मोबदल्यात मात्र शेतकऱ्यांना एक छदामही मिळालेला नाही. हक्काचा पीक विमासुद्धा देण्यात आला नाही. आता रब्बी हंगामात या अवकाळी पावसाचे नवे संकट उभे ठाकले आहे. अशा स्थितीत सरकारी यंत्रणा व राज्य शासन शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी पुढे येताना दिसत नाही. कापूस, तूर, कांदा, संत्रा या सर्वच प्रमुख पिकांचा हंगाम हातचा गेला आहे. कापूस ओला झाल्याने सरकीला कोंब फुटण्याचा धोका आहे. तुरीला फुले व कळ्या लागलेल्या असून, त्यावर या वातावरणात बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत आहे. अशा संकटात शेतकरी सापडला आहे.

जिल्ह्यात १६ मिमी. पावसाची नोंद

n पहाटे ८ पर्यंत १६ मिमी. पावसाची नोंद करण्यात आली. त्यात सर्वाधिक ५७ मिमी. पाऊस पुसद तालुक्यात पडला. यामुळे या ठिकाणच्या नदीनाल्यांना पूर आला. वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. याशिवाय या भागातील पिकांना मोठा फटका बसला. यवतमाळ शहरात १२ मिमी. पाऊस नाेंदविण्यात आला. बाभूळगाव १८, कळंब ७, दारव्हा २८, दिग्रस २६, आर्णी १२, नेर ३६, उमरखेड २, महागाव ३२, वणी १२, महागाव ५, झरी ६, केळापूर ३, घाटंजी २, राळेगाव ४ मिमी. पावसाची नोंद करण्यात आली.

टॅग्स :environmentपर्यावरणRainपाऊसYavatmalयवतमाळ