शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

बारावीचा निकाल साडेचार टक्क्यांनी घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2022 05:00 IST

कोरोनाच्या प्रादुर्भाव काहीसा ओसरल्यानंतर यंदा बारावी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने पार पडली होती. या परीक्षेसाठी १७  हजार ९६४ विद्यार्थी आणि १५ हजार ८०० विद्यार्थिनी अशा एकूण ३३ हजार ७६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र त्यातील ३३ हजार ४४६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यामध्ये १७ हजार ८०४ विद्यार्थ्यांपैकी १६ हजार ८३६ विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले. तर १५ हजार ६४२ पैकी १४ हजार ९८४ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : इयत्ता बारावीचा निकाल बुधवारी दुपारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. यंदाच्या निकालात यवतमाळ जिल्हा पिछाडीवर पडल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील एकूण ३३ हजार ४४६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यातील ३१ हजार ८२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल ९५.१३ टक्के इतका लागला आहे. मागील वर्षी हाच निकाल ९९.७७ टक्के इतका होता. कोरोनाच्या प्रादुर्भाव काहीसा ओसरल्यानंतर यंदा बारावी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने पार पडली होती. या परीक्षेसाठी १७  हजार ९६४ विद्यार्थी आणि १५ हजार ८०० विद्यार्थिनी अशा एकूण ३३ हजार ७६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र त्यातील ३३ हजार ४४६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यामध्ये १७ हजार ८०४ विद्यार्थ्यांपैकी १६ हजार ८३६ विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले. तर १५ हजार ६४२ पैकी १४ हजार ९८४ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. यामध्ये मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.५६ टक्के तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.७९ टक्के इतके आहे. तालुकानिहाय बारावी निकालाची आकडेवारी पाहिली असता जिल्ह्यात सर्वाधिक ९८.०५ टक्के निकाल महागाव तालुक्याचा लागला आहे. तर सर्वात कमी म्हणजे ८६.७१ टक्के निकाल वणी तालुक्याचा लागला आहे. वणी तालुक्याची शैक्षणिक घसरण चिंता वाढविणारी आहे. मागील वर्षी वणी तालुक्याचा बारावीचा निकाल १०० टक्के इतका लागला होता. यवतमाळ तालुक्याचा निकाल ९६.१८ टक्के, नेर तालुका ९६.२४, दारव्हा ९०.८२, दिग्रस ९५.८८, आर्णी ९७.८५, पुसद ९७.०७, उमरखेड ९७.५७, महागाव ९८.०५, बाभूळगाव ९७.१३, कळंब ९४.२७, राळेगाव ९५.२५, मारेगाव ९२.४१, पांढरकवडा ९४.२६, झरी जामणी ९५.२७ तर घाटंजी तालुक्याचा निकाल ९१.९६ टक्के इतका लागला आहे. मुलांच्या तुलनेत यंदाही मुलींनीच बाजी मारल्याचे दिसले. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.५६ टक्के तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.७९ टक्के आहे. 

मागील वर्षी लागला होता ९९.७७ टक्के निकाल इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल यंदा ९५.१३ टक्के लागला आहे. मागील वर्षी हाच निकाल ९९.७७ टक्के इतका होता. मागील वर्षीच्या निकालाची तुलना केली असता यंदाच्या निकालात साधारण साडेचार टक्क्यांची घसरण दिसून येते. मागील वर्षी यवतमाळ तालुक्याचा ९९.८२ टक्के होता. बाभूळगाव १००, नेर ९९.६८, दारव्हा ९९.५८, दिग्रस ९९.६१, आर्णी ९९.१३, पुसद ९९.७५, उमरखेड ९९.६९, महागाव ९९.८१, कळंब ९९.८१, राळेगाव ९९.०३, मारेगाव १००, पांढरकवडा १००, झरी १००, वणी १०० तर घाटंजी तालुक्याचा ९६.६२ टक्के इतका निकाल लागला होता. 

रिपीटर विद्यार्थ्यांचा ६०.०८ टक्के निकाल- रिपीटर असलेल्या ७३९ विद्यार्थ्यांनी यंदा बारावीची परीक्षा दिली हाेती. त्यातील ३२७ मुले आणि ११७ मुली असे ४४४ जण उत्तीर्ण झाले असून रिपीटर विद्यार्थ्यांचा निकाल ६०.०८ टक्के इतका आहे. यामध्ये मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ६२.१६ टक्के तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ५४.९२ टक्के इतके आहे. 

निकाल समाधानकारक- यंदाच्या बारावी निकालात साडेचार टक्क्यांची घट दिसत असली तरी मागील वर्षी अंतर्गत मूल्यमापनाचे मार्क असल्याने निकाल फुगलेला होता. यावेळी मात्र ऑफलाईन परीक्षा झाली. 

 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालEducationशिक्षण