शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

विमा कंपनीच्या लेखी तालुक्यात दुष्काळच नाही

By admin | Updated: June 14, 2014 23:54 IST

तालुक्यात गेल्या वर्षी अतिवृष्टी आणि प्रचंड गारपिटीने दुष्काळ निर्माण झाला. शासनाने दुष्काळग्रस्तांना मदतही दिली. मात्र विमा कंपनीच्या लेखी तालुक्यात दुष्काळाच दित नाही. २६ हजार शेतकऱ्यांनी विमा

रितेश पुरोहित - महागाव तालुक्यात गेल्या वर्षी अतिवृष्टी आणि प्रचंड गारपिटीने दुष्काळ निर्माण झाला. शासनाने दुष्काळग्रस्तांना मदतही दिली. मात्र विमा कंपनीच्या लेखी तालुक्यात दुष्काळाच दित नाही. २६ हजार शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरल्यानंतरही एकाही शेतकऱ्याला विम्याचा लाभ मिळाला नाही. महागाव तालुक्यात गेल्या वर्षी जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला. ११६० मिमी पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीने शेतात १५ ते २० दिवस गुडघाभर पाणी साचले होते. नदी-नाल्यांना आलेल्या पुरात शेकडो हेक्टरवरील पीक वाहून गेले. तर मार्च-एप्रिल महिन्यात प्रचंड गारपीट होऊन रबी हंगाम उद्ध्वस्त झाला. तालुक्यातील शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त झाला. शासनाने या शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली. पीक आणेवारीही ५० टक्क्याच्या आत आली. त्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाला. परंतु हा दुष्काळ विमा कंपनीच्या लेखी दिसतच नाही. अद्याप एकाही शेतकऱ्याला पीक विम्याचा लाभ मिळाला नाही.महागाव तालुक्यात ६० हजार हेक्टरवर पेरणी करण्यात आली होती. त्यात कापूस २४ हजार हेक्टर, सोयाबीन २२ हजार हेक्टरचा समावेश होता. यापैकी २६ हजार शेतकऱ्यांनी ३५ हजार हेक्टर क्षेत्रफळाचा पीक विमा उतरविला होता. त्यात कापूस २० हजार हेक्टर, सोयाबीन दहा हजार हेक्टर आणि इतर पाच हजार हेक्टरचा समावेश होता. विमा हप्तापोटी शेतकऱ्यांनी ६० लाख रुपये तर शासनाने ६० लाख असे एक कोटी २० लाख रुपये इंडिया इन्शूरन्स कंपनी मुंबईकडे भरणा केला. दुष्काळी परिस्थितीत विमा कंपनीकडून पैसे मिळतील, अशी शेतकऱ्यांना आशा होती. परंतु आता खरीप हंगाम आला तरी एकाही शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही. प्रचंड नुकसान होऊनही विमा कंपनी शेतकऱ्यांना त्यांचा लाभ देण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. शासकीय दप्तरी दुष्काळ असला तरी विमा कंपनी मात्र त्यावर बोलायला तयार नाही. विमा कंपनीवर कुणाचाच अंकुश नसल्याने गेल्या पाच वर्षांपासून महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला नाही. जणू पीक विमा कंपनीच्याच फायद्याची ठरत आहे.