शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

विमा कंपनीच्या लेखी तालुक्यात दुष्काळच नाही

By admin | Updated: June 14, 2014 23:54 IST

तालुक्यात गेल्या वर्षी अतिवृष्टी आणि प्रचंड गारपिटीने दुष्काळ निर्माण झाला. शासनाने दुष्काळग्रस्तांना मदतही दिली. मात्र विमा कंपनीच्या लेखी तालुक्यात दुष्काळाच दित नाही. २६ हजार शेतकऱ्यांनी विमा

रितेश पुरोहित - महागाव तालुक्यात गेल्या वर्षी अतिवृष्टी आणि प्रचंड गारपिटीने दुष्काळ निर्माण झाला. शासनाने दुष्काळग्रस्तांना मदतही दिली. मात्र विमा कंपनीच्या लेखी तालुक्यात दुष्काळाच दित नाही. २६ हजार शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरल्यानंतरही एकाही शेतकऱ्याला विम्याचा लाभ मिळाला नाही. महागाव तालुक्यात गेल्या वर्षी जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला. ११६० मिमी पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीने शेतात १५ ते २० दिवस गुडघाभर पाणी साचले होते. नदी-नाल्यांना आलेल्या पुरात शेकडो हेक्टरवरील पीक वाहून गेले. तर मार्च-एप्रिल महिन्यात प्रचंड गारपीट होऊन रबी हंगाम उद्ध्वस्त झाला. तालुक्यातील शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त झाला. शासनाने या शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली. पीक आणेवारीही ५० टक्क्याच्या आत आली. त्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाला. परंतु हा दुष्काळ विमा कंपनीच्या लेखी दिसतच नाही. अद्याप एकाही शेतकऱ्याला पीक विम्याचा लाभ मिळाला नाही.महागाव तालुक्यात ६० हजार हेक्टरवर पेरणी करण्यात आली होती. त्यात कापूस २४ हजार हेक्टर, सोयाबीन २२ हजार हेक्टरचा समावेश होता. यापैकी २६ हजार शेतकऱ्यांनी ३५ हजार हेक्टर क्षेत्रफळाचा पीक विमा उतरविला होता. त्यात कापूस २० हजार हेक्टर, सोयाबीन दहा हजार हेक्टर आणि इतर पाच हजार हेक्टरचा समावेश होता. विमा हप्तापोटी शेतकऱ्यांनी ६० लाख रुपये तर शासनाने ६० लाख असे एक कोटी २० लाख रुपये इंडिया इन्शूरन्स कंपनी मुंबईकडे भरणा केला. दुष्काळी परिस्थितीत विमा कंपनीकडून पैसे मिळतील, अशी शेतकऱ्यांना आशा होती. परंतु आता खरीप हंगाम आला तरी एकाही शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही. प्रचंड नुकसान होऊनही विमा कंपनी शेतकऱ्यांना त्यांचा लाभ देण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. शासकीय दप्तरी दुष्काळ असला तरी विमा कंपनी मात्र त्यावर बोलायला तयार नाही. विमा कंपनीवर कुणाचाच अंकुश नसल्याने गेल्या पाच वर्षांपासून महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला नाही. जणू पीक विमा कंपनीच्याच फायद्याची ठरत आहे.