शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

अद्याप जिल्ह्यातील जलाशयात ठणठणाट

By admin | Updated: July 23, 2014 00:12 IST

गतवर्षी जुलै महिन्यात ओव्हर-फ्लो झालेल्या तलावात यंदा ठणठणाट आहे. उशिरा दाखल झालेल्या पावसाचा हा परिणाम आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे.

यवतमाळ : गतवर्षी जुलै महिन्यात ओव्हर-फ्लो झालेल्या तलावात यंदा ठणठणाट आहे. उशिरा दाखल झालेल्या पावसाचा हा परिणाम आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. मात्र जोरदार पाऊस झाला नसल्याने जलसाठ्यात अद्यापही वाढ झाली नाही. गेल्या २४ तासात जिल्ह्यात १०.२२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ९११.३४ मिमी आहे. जुलैपर्यंत ३८८ मिली मीटर पाऊस अपेक्षित आहे. प्रत्यक्षात केवळ १६८ मिमी पावसाची नोंद झाली. अनेक तालुक्यांनी शंभरीसुध्दा गाठली नाही. पुसद, उमरखेड, महागव येथे सर्वात कमी पाऊस झाला आहे. मारेगाव, वणी, राळेगाव, यवतमाळ, नेर बाभुळगाव येथे अपेक्षित सरासरीच्या केवळ ५० टक्के पाऊस पडला आहे. तर दिग्रस, दारव्हा, आर्णी, कळंब, केळापूर, घाटंजी, झरी येथे सरासरी १५० ते २०० मिली मिटर पाऊस झाला आहे. तीन दिवसापासून पाण्याची रिपरिप सुरू असली तरी विशेष जोर नाही. रात्रंदिवस पाऊस सुरू असूनही २४ तासात केवळ १० ते १५ मिमी इतकीच नोंद झाली आहे. त्यामुळेच २४६ पाझर तलाव, ६९ सिंचन तलाव, ३ साठवण तलाव आणि ४७ गावतलाव कोरडे आहेत. नदी, नाल्यांना अजुनही पूर गेलेला नाही. अशीच स्थितीत मध्यम आणि लघु प्रकल्पांची आहे. पुस प्रकल्पात केवळ १८.१२ टक्के साठा आहे. अरूणावती १३.६६, बेंबळा २३.२९, सायखेडा ४१.८०, गोकी २१.३५, वाघाडी २७.४२, बोरगाव २७.९९, लोअर पूस ४९.४२, अडाण ८.३१, नवरगाव २५.९९ टक्के इतका पाणीसाठा आहे. अडाण प्रकल्पात तर मृत साठाच शिल्लक राहीला आहे. जुलै मध्यापर्यंत मागील वर्षी याच प्रकल्पांमध्ये सरासरी ६० ते १०० टक्के पाणीसाठा होता. पाऊस पुढे लांबला नाहीतर बहुतांश प्रकल्पात ५० टक्केही पाणीसाठा राहणार नाही, अशी शक्यता वर्तविली जात आहे. मागच्या वर्षी अनेक प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने प्रकल्पामध्ये पातळी दिसत आहे. यंदाच्या पावसाने त्यात कोणतीच भर घातली नाही. (कार्यालय प्रतिनिधी)