शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

अधर पूस प्रकल्पाची वाताहत

By admin | Updated: December 24, 2015 03:06 IST

तालुक्यातील महत्त्वाकांक्षी अधर पूस प्रकल्पाची लोकप्रतिनिधींच्या अनास्थेने पूर्णत: वाताहत झाली आहे.

सिंचनाची बोंबाबोंब : २० कोटींचा प्रस्ताव आला पाच कोटींवर संजय भगत महागावतालुक्यातील महत्त्वाकांक्षी अधर पूस प्रकल्पाची लोकप्रतिनिधींच्या अनास्थेने पूर्णत: वाताहत झाली आहे. सिंचनाचे उद्दिष्ट अद्यापही पूर्ण झाले नाही. २० कोटी रुपयांचा दुरुस्तीचा प्रस्ताव वारंवार त्रुट्या काढून पाच कोटींवर आणला गेला. यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून प्रकल्पावरील वसुलीचे कारण पुढे करण्यात येते. अधर पूस प्रकल्प अर्थात वेणी धरणाची सिंचन क्षमता नऊ हजार १०८ हेक्टर आहे. या प्रकल्पाची निर्मिती १९८० मध्ये करण्यात आली. गत ३५ वर्षात शेवटपर्यंत पाणी पोहोचलेच नाही. पाणी वाटप आणि त्यावरील वसुली नियमित खतवल्या जाते. या कागदोपत्री खतवणीच्या वसुलीपोटी सात कोटी रुपये थकीत आहे. ही थकीत रक्कम वारंवार पुढे करून अधर पूस प्रकल्पाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव गुंडाळून ठेवला जातो. प्रकल्पाच्या गरजेनुसार टेलपर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी कालव्यांची दुरुस्ती, पाटसऱ्या आदी दुरुस्तीचे काम हाती घेणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी दोन वर्षांपासून २० कोटी रुपयांचा आराखडा सादर करण्यात आला आहे. परंतु या आराखड्यात वारंवार त्रुटी काढल्या जात आहे. त्यामुळे ३३ गावांचे ओलित रखडले आहे. या ३३ गावातून २३०० शेतकरी लाभार्थी असून नियोजनाअभावी शेतकऱ्यांना सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. प्रकल्पाची आर्थिक नाकेबंदी करून वाहाहत सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला कर्मचाऱ्यांचा प्रचंड अनुशेष वाढला आहे. पाच वर्षापूर्वी २५ कर्मचारी प्रकल्पावर राबत होते. त्यामुळे पाण्याची मागणी होत असे. वसुलीही होत होती. पाण्याचा अपव्यय कमी होत होता. सध्या येथे पाचच कर्मचारी कार्यरत आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना मिळण्यात अडचण येत आहे. नादुरुस्त कालवे, लघु वितरिका, उपवितरिका तुडूंब भरून वाहत असून लघु वितरिकांमध्ये वाढलेली झुडुपी वनस्पती पाणी वाहून नेण्यास अडथळा निर्माण करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे. ऊस तोडणीचा हंगाम सुरू असून प्रकल्पाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने वाहनाला अडथळा निर्माण होत आहे. प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव पुढे आला. त्याबाबत यवतमाळच्या पाटबंधारे विभागीय कार्यकारी अभियंता कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत निधी कपातीचा प्रस्ताव पुढे आला. २० कोटींचा हा प्रस्ताव केवळ पाच कोटींवर आला. त्यात दुरुस्ती होणार कशी, असा प्रश्न आहे. सिंचन होणार तरी कसे ?अधर पूस प्रकल्पाचे सिंचन क्षेत्र ९ हजार १०८ हेक्टर आहे. त्यापैकी पाच हजार हेक्टर खरीप, दोन हजार ७७२ हेक्टर रबी आणि ५२८ हेक्टर उन्हाळी ओलित क्षमता आहे. मात्र अद्यापपर्यंत या क्षमतेने सिंचन झाले नाही. पाण्याचा अपव्यय होत असून पाणी वापर संस्थाही उदासीन दिसत आहे. त्यामुळे हा प्रकल्प केवळ पांढरा हत्ती ठरला आहे.