शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

अधर पूस प्रकल्पाची वाताहत

By admin | Updated: December 24, 2015 03:06 IST

तालुक्यातील महत्त्वाकांक्षी अधर पूस प्रकल्पाची लोकप्रतिनिधींच्या अनास्थेने पूर्णत: वाताहत झाली आहे.

सिंचनाची बोंबाबोंब : २० कोटींचा प्रस्ताव आला पाच कोटींवर संजय भगत महागावतालुक्यातील महत्त्वाकांक्षी अधर पूस प्रकल्पाची लोकप्रतिनिधींच्या अनास्थेने पूर्णत: वाताहत झाली आहे. सिंचनाचे उद्दिष्ट अद्यापही पूर्ण झाले नाही. २० कोटी रुपयांचा दुरुस्तीचा प्रस्ताव वारंवार त्रुट्या काढून पाच कोटींवर आणला गेला. यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून प्रकल्पावरील वसुलीचे कारण पुढे करण्यात येते. अधर पूस प्रकल्प अर्थात वेणी धरणाची सिंचन क्षमता नऊ हजार १०८ हेक्टर आहे. या प्रकल्पाची निर्मिती १९८० मध्ये करण्यात आली. गत ३५ वर्षात शेवटपर्यंत पाणी पोहोचलेच नाही. पाणी वाटप आणि त्यावरील वसुली नियमित खतवल्या जाते. या कागदोपत्री खतवणीच्या वसुलीपोटी सात कोटी रुपये थकीत आहे. ही थकीत रक्कम वारंवार पुढे करून अधर पूस प्रकल्पाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव गुंडाळून ठेवला जातो. प्रकल्पाच्या गरजेनुसार टेलपर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी कालव्यांची दुरुस्ती, पाटसऱ्या आदी दुरुस्तीचे काम हाती घेणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी दोन वर्षांपासून २० कोटी रुपयांचा आराखडा सादर करण्यात आला आहे. परंतु या आराखड्यात वारंवार त्रुटी काढल्या जात आहे. त्यामुळे ३३ गावांचे ओलित रखडले आहे. या ३३ गावातून २३०० शेतकरी लाभार्थी असून नियोजनाअभावी शेतकऱ्यांना सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. प्रकल्पाची आर्थिक नाकेबंदी करून वाहाहत सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला कर्मचाऱ्यांचा प्रचंड अनुशेष वाढला आहे. पाच वर्षापूर्वी २५ कर्मचारी प्रकल्पावर राबत होते. त्यामुळे पाण्याची मागणी होत असे. वसुलीही होत होती. पाण्याचा अपव्यय कमी होत होता. सध्या येथे पाचच कर्मचारी कार्यरत आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना मिळण्यात अडचण येत आहे. नादुरुस्त कालवे, लघु वितरिका, उपवितरिका तुडूंब भरून वाहत असून लघु वितरिकांमध्ये वाढलेली झुडुपी वनस्पती पाणी वाहून नेण्यास अडथळा निर्माण करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे. ऊस तोडणीचा हंगाम सुरू असून प्रकल्पाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने वाहनाला अडथळा निर्माण होत आहे. प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव पुढे आला. त्याबाबत यवतमाळच्या पाटबंधारे विभागीय कार्यकारी अभियंता कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत निधी कपातीचा प्रस्ताव पुढे आला. २० कोटींचा हा प्रस्ताव केवळ पाच कोटींवर आला. त्यात दुरुस्ती होणार कशी, असा प्रश्न आहे. सिंचन होणार तरी कसे ?अधर पूस प्रकल्पाचे सिंचन क्षेत्र ९ हजार १०८ हेक्टर आहे. त्यापैकी पाच हजार हेक्टर खरीप, दोन हजार ७७२ हेक्टर रबी आणि ५२८ हेक्टर उन्हाळी ओलित क्षमता आहे. मात्र अद्यापपर्यंत या क्षमतेने सिंचन झाले नाही. पाण्याचा अपव्यय होत असून पाणी वापर संस्थाही उदासीन दिसत आहे. त्यामुळे हा प्रकल्प केवळ पांढरा हत्ती ठरला आहे.