शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अधर पूस प्रकल्पाची वाताहत

By admin | Updated: December 24, 2015 03:06 IST

तालुक्यातील महत्त्वाकांक्षी अधर पूस प्रकल्पाची लोकप्रतिनिधींच्या अनास्थेने पूर्णत: वाताहत झाली आहे.

सिंचनाची बोंबाबोंब : २० कोटींचा प्रस्ताव आला पाच कोटींवर संजय भगत महागावतालुक्यातील महत्त्वाकांक्षी अधर पूस प्रकल्पाची लोकप्रतिनिधींच्या अनास्थेने पूर्णत: वाताहत झाली आहे. सिंचनाचे उद्दिष्ट अद्यापही पूर्ण झाले नाही. २० कोटी रुपयांचा दुरुस्तीचा प्रस्ताव वारंवार त्रुट्या काढून पाच कोटींवर आणला गेला. यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून प्रकल्पावरील वसुलीचे कारण पुढे करण्यात येते. अधर पूस प्रकल्प अर्थात वेणी धरणाची सिंचन क्षमता नऊ हजार १०८ हेक्टर आहे. या प्रकल्पाची निर्मिती १९८० मध्ये करण्यात आली. गत ३५ वर्षात शेवटपर्यंत पाणी पोहोचलेच नाही. पाणी वाटप आणि त्यावरील वसुली नियमित खतवल्या जाते. या कागदोपत्री खतवणीच्या वसुलीपोटी सात कोटी रुपये थकीत आहे. ही थकीत रक्कम वारंवार पुढे करून अधर पूस प्रकल्पाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव गुंडाळून ठेवला जातो. प्रकल्पाच्या गरजेनुसार टेलपर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी कालव्यांची दुरुस्ती, पाटसऱ्या आदी दुरुस्तीचे काम हाती घेणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी दोन वर्षांपासून २० कोटी रुपयांचा आराखडा सादर करण्यात आला आहे. परंतु या आराखड्यात वारंवार त्रुटी काढल्या जात आहे. त्यामुळे ३३ गावांचे ओलित रखडले आहे. या ३३ गावातून २३०० शेतकरी लाभार्थी असून नियोजनाअभावी शेतकऱ्यांना सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. प्रकल्पाची आर्थिक नाकेबंदी करून वाहाहत सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला कर्मचाऱ्यांचा प्रचंड अनुशेष वाढला आहे. पाच वर्षापूर्वी २५ कर्मचारी प्रकल्पावर राबत होते. त्यामुळे पाण्याची मागणी होत असे. वसुलीही होत होती. पाण्याचा अपव्यय कमी होत होता. सध्या येथे पाचच कर्मचारी कार्यरत आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना मिळण्यात अडचण येत आहे. नादुरुस्त कालवे, लघु वितरिका, उपवितरिका तुडूंब भरून वाहत असून लघु वितरिकांमध्ये वाढलेली झुडुपी वनस्पती पाणी वाहून नेण्यास अडथळा निर्माण करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे. ऊस तोडणीचा हंगाम सुरू असून प्रकल्पाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने वाहनाला अडथळा निर्माण होत आहे. प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव पुढे आला. त्याबाबत यवतमाळच्या पाटबंधारे विभागीय कार्यकारी अभियंता कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत निधी कपातीचा प्रस्ताव पुढे आला. २० कोटींचा हा प्रस्ताव केवळ पाच कोटींवर आला. त्यात दुरुस्ती होणार कशी, असा प्रश्न आहे. सिंचन होणार तरी कसे ?अधर पूस प्रकल्पाचे सिंचन क्षेत्र ९ हजार १०८ हेक्टर आहे. त्यापैकी पाच हजार हेक्टर खरीप, दोन हजार ७७२ हेक्टर रबी आणि ५२८ हेक्टर उन्हाळी ओलित क्षमता आहे. मात्र अद्यापपर्यंत या क्षमतेने सिंचन झाले नाही. पाण्याचा अपव्यय होत असून पाणी वापर संस्थाही उदासीन दिसत आहे. त्यामुळे हा प्रकल्प केवळ पांढरा हत्ती ठरला आहे.