शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
2
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
3
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
4
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
5
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
6
फोनचा पासवर्ड विसरलात? सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही; 'अशा' प्रकारे ५ मिनिटांत घरबसल्या करू शकता अनलॉक!
7
गुरुनिष्ठेचा आदर्श, रामदास स्वामींचे दर्शन; संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे श्रीधर स्वामी!
8
चमत्कार! कडाक्याच्या थंडीत निर्दयी आईने रस्त्यावर फेकलं, भटक्या कुत्र्यांनी नवजात बाळाला वाचवलं
9
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहेत अब्दुल्लाहिल अमान आजमी?
10
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
11
मोठी उलथापालथ! ओला इलेक्ट्रीक रसातळाला पोहोचली; नोव्हेंबरच्या रेसमध्ये बाहेर फेकली गेली 
12
कोहली-ऋतुराजचा शतकी धमाका; KL राहुलचं अर्धशतक! टीम इंडियानं द. आफ्रिकेसमोर ठेवलं ३५९ धावांचे लक्ष्य
13
मोठी बातमी! 26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढलेले IPS अधिकारी सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक
14
मायेचं नातं! १२ वर्षांनंतर मुलीने पहिल्यांदाच ऐकला आईचा आवाज; डोळे पाणावणारा Video
15
तुमचे पैसे SBI, HDFC किंवा ICICI बँकेत असेल तर खुशखबर! RBI ने 'या' ३ बँकांसाठी केली मोठी घोषणा
16
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ‘असे’ करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, सोपा विधी अन् काही मान्यता!
17
ॲपलचा विरोध, विरोधकांचाही विरोध! केंद्राचा  'संचार साथी' ॲपवर यू-टर्न, प्री-इंस्टॉल करण्याची अनिवार्यता मागे घेतली...
18
५ मुलांची आई भंगारवाल्याच्या प्रेमात पडली! वयाचाही विचार केला नाही; पतीसमोर बांधली दुसरी लग्नगाठ
19
Ruturaj Gaikwad Maiden Century : पुणेकरानं संधीचं सोनं करुन दाखवलं! या कारणामुळं ऋतुराजची पहिली सेंच्युरी ठरते खास
20
काय सांगता? फक्त स्वत:ला पाहण्यासाठी नाही तर 'या' कारणांसाठी लिफ्टमध्ये असतो आरसा
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त अभियानावर आतापर्यंत खर्च झाले 363 कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 05:00 IST

    लाेकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून गावातील पाणी गावातच मुरवून सिंचन समृद्धी साधण्याचा प्रयोग हाती ...

ठळक मुद्देकामकाजातील गैरप्रकाराची चौकशी होणार : अनेक गावात टंचाई

    लाेकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून गावातील पाणी गावातच मुरवून सिंचन समृद्धी साधण्याचा प्रयोग हाती घेण्यात आला. हा प्रयोग काही गावांमध्ये यशस्वी झाला. तर काही ठिकाणी अयशस्वी झाला. काही भागात कामकाज पाहिजे तसे झालेच नाही. आता या संपूर्ण कामकाजाची चौकशी होणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १३३७ गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेचे काम हाती घेण्यात आले. १३३७ गावांमध्ये हाती घेतलेले संपूर्ण काम पूर्ण झाल्याचा अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे. या कामांवर आतापर्यंत ३६३ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. सिंचन समृद्धीमुळे काही गावांमध्ये सिंचन क्षेत्रात वाढ झाली आहे. तर काही गावांमध्ये अजूनही पाण्याचा प्रश्न तसाच आहे. सिंचन विहिरी तर सोडाच गावातील पेयजलाच्या विहिरीचाही पाणीसाठा वाढला नाही. गावकऱ्यांनी योजनेत सुधारणा करण्याची मागणी केली. 

मारेगावमारेगाव तालुक्यातील बोटाेणी गावामध्ये जलयुक्त शिवार योजनेतून नाला खोलीकरणाचे व बंधाऱ्याचे काम करण्यात आले. परंतु हे काम फारच तोकडे असून याचा उपयोग फक्त काही शेतकऱ्यांपुरताच मर्यादित राहिला आहे. नाला खोलीकरणाचे काम जास्त प्रमाणात केल्यास सिंचन क्षेत्रात आणखी वाढ होऊ शकते. - रामदास लालसरे, बोटोणी

आमच्या गावात कायमस्वरूपी पाणीटंचाई असते. यामुळे जलयुक्त शिवार योजनेतून हा प्रश्न मिटेल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात त्याच्या उलटे झाले. योजना राबविल्या गेली, पाणीटंचाई सुटली नाही.      - नीळकंठ बोरकर, सरपंच इचोरी

गावामध्ये दोन सिमेंट प्लग बंधारे बांधण्यात आले. त्या ठिकाणी पाणी थांबेल आणि भूजल पातळी वाढेल असा अंदाज होता. प्रत्यक्षात या बंधाऱ्यात पाणीच राहत नाही.  - पुरुषोत्तम राठोड, गावकरी

नांदेपेरा बावणमोडी नाल्याचे खोलीकरण झाल्यामुळे उन्हाळ्यात कोरडा पडणारा नाला नेहमी वाहता झाला आहे. गावातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यात मदत झाली आहे. यातून सिंचन वाढले आहे. तर गावातील पाणी पातळी वाढल्याने उन्हाळ्यातील पाणीटंचाई निवारण्यास मदत झाली आहे.        - विलास चिकटे, नांदेपेरा 

सन २०१७-१८ मध्ये आमच्या गावात नाला सरळीकरण करण्यात आले. शेतात बांध बंदिस्ती करण्यात आली. मात्र याचा कुठलाही फायदा शेतकऱ्यांना झाला नाही.  - संदेश राठोड, सरपंच, गहुली हेटी

योजनेमध्ये नाला साफ झाल्याने पुराचा धोका कमी झाला. मात्र पश्चीम महाराष्ट्राप्रमाणे शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपयोग होत नाही.  - दिलीप खडसे, सोनावाढोणा 

महागावमहागाव तालुक्यातील दगडथर हे गाव जलयुक्त शिवार योजनेमध्ये निवडण्यात आले होते. यंत्रणाही तयार होती. मात्र गावात कामाला सुरुवातच झाली नाही. यामुळे गावातील सिंचन वृद्धीचे स्वप्न सध्या अपूर्ण आहे. प्रशासनाने कामकाजाला प्रारंभ केला तर गावाचे चित्र पालटेल. -दिलीप इंगोले, दगडथर,माजी सरपंच 

जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून नाला ठिकठिकाणी अडविला गेला. यामुळे नाल्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण झाले. यातून सिंचन वाढले आहे.  -गजानन आत्राम, सरपंच किटाकापरा

जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नाल्याचे खोलीकरण करण्यात आले. यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला पाणी प्रश्न सुटण्यास मदत झाली.   - राकेश खामकर, ग्रा.पं. सदस्य

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार