शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

शाळेची घंटा 28 जूनला वाजणार पण विद्यार्थ्याविनाच शाळा भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 5:00 AM

महाराष्ट्रात १५ जूनपासून सत्र सुरू झाले. तर जिल्ह्यात २८ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार सुरुवातीला केवळ शिक्षकांना शाळेत बोलावले जाणार आहे. विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन संस्थेमार्फत दररोज ऑनलाईन अभ्यासमाला सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील शिक्षकांत संभ्रमसंचालकांच्या पत्रानंतर जिल्हा परिषदेच्या पत्राची प्रतीक्षा, जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेकडे नजरा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :  विदर्भात व यवतमाळ जिल्ह्यात शैक्षणिक सत्र २८ जूनपासून सुरू होणार आहे. उर्वरित महाराष्ट्राप्रमाणेच जिल्ह्यातही सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू केले जाणार आहे. त्यामुळे २८ जून रोजी शाळा सुरू झाल्या तरी शाळेत विद्यार्थ्यांचा किलबिलाट परतण्याची सध्याच शक्यता नाही. केवळ शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याचे आदेश आहेत.महाराष्ट्रात १५ जूनपासून सत्र सुरू झाले. तर जिल्ह्यात २८ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार सुरुवातीला केवळ शिक्षकांना शाळेत बोलावले जाणार आहे. विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन संस्थेमार्फत दररोज ऑनलाईन अभ्यासमाला सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील शाळा अद्याप सुरू झालेल्या नसल्या तरी ही अभ्यासमाला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविली जात आहे. मात्र मोबाईल आणि नेटवर्कअभावी ग्रामीण भागात यंदाही ऑनलाईन शिक्षणात खंडच पडण्याची शक्यता आहे. 

संचालकांचे पत्र म्हणते...पहिली ते नववी व अकरावीच्या शिक्षकांना शाळेत ५० टक्के उपस्थिती अनिवार्य राहणार आहे. दहावी व बारावीच्या शिक्षकांना मात्र शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. शिक्षकेत्तर कर्मचारी, प्राचार्य यांची शंभर टक्के उपस्थिती असेल. दहावी, बारावीच्या निकालासाठी शंभर टक्के उपस्थिती आवश्यक आहे. 

जि.प.च्या पत्राचे काय?जिल्ह्यातील शाळा २८ जूनपासून सुरू होणार आहे. मात्र शिक्षकांच्या उपस्थितीचे निकष काय असतील याबाबत जिल्हा परिषद सोमवारी पत्र जारी करणार आहे. तूर्त शिक्षण संचालकांच्या पत्रानुसारच उपस्थतीबाबत शिक्षकांना सूचना आहे. नववी व अकरावीपर्यंत ५० टक्के तर दहावी, बारावीसाठी १०० टक्के उपस्थिती राहील.

शिक्षक आणि विद्यार्थी शाळेसाठी उत्सूक

जेथे कोरोना रुग्ण नाही अशा गावात विद्यार्थ्यांना शाळेत बोलविण्यास हरकत नाही. शिक्षकांनाही १०० टक्के उपस्थिती आवश्यक करावी. मात्र त्यासोबतच शंभर टक्के लसीकरणासाठी प्रयत्न केले जावे.- संदीप कोल्हे, शिक्षक, सुकळी ता.कळंब

शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांनाही शाळेची उत्सुकता लागलेली आहे. पण पूर्ण लसीकरण होईपर्यंत पालकांची मानसिक तयारी दिसत नाही. शिक्षकांना शाळेत शंभर टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात यावी. शिक्षक स्वत: शाळेत जाण्यास तयार आहे. - किशोर बनारसे, शिक्षक, कवठाबाजार आर्णी

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या