शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी आरटीओ करणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2022 22:09 IST

प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांनी किती प्रवासी घ्यावेत याचे नियम आहेत. वाहन चालकांची नियमित तपासणी बंधनकारक आहे, याकडे कटाक्षाने लक्ष देण्याच्या सूचना आरटीओंना दिल्या आहेत.  याबरोबरच वाहन सुस्थितीत आहे का, याची पडताळणीही नियमित करायला सांगितली आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणे नियमबाह्य आहे. कंपनीच्या परस्पर चालकांनी ट्रॅव्हल्समध्ये अतिरिक्त प्रवासी घेतले, असे सांगून कंपनीला जबाबदारी टाळता येणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : चिंतामणी ट्रॅव्हल्सला नाशिकजवळ भीषण अपघात होऊन १२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या गाडीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते. हे पुढे आले आहे. चालक परस्पर प्रवासी घेतात, असे म्हणून ट्रॅव्हल्स कंपनीला आपली जबाबदारी टाळता येणार नाही, या प्रकरणात आरटीओतर्फे नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांनी किती प्रवासी घ्यावेत याचे नियम आहेत. वाहन चालकांची नियमित तपासणी बंधनकारक आहे, याकडे कटाक्षाने लक्ष देण्याच्या सूचना आरटीओंना दिल्या आहेत.  याबरोबरच वाहन सुस्थितीत आहे का, याची पडताळणीही नियमित करायला सांगितली आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणे नियमबाह्य आहे. कंपनीच्या परस्पर चालकांनी ट्रॅव्हल्समध्ये अतिरिक्त प्रवासी घेतले, असे सांगून कंपनीला जबाबदारी टाळता येणार नाही. या प्रकरणातही या अनुषंगाने योग्य ते कार्यवाई करण्याचे निर्देश दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातील खासगी प्रवासी वाहतुकीच्या ट्रॅव्हल्स पॉइंटसाठी शहराबाहेर पर्यायी जागा बघण्यासाठी सांगितले होते. ही जागा शहरापासून जवळ असावी, तसेच सुरक्षित ठिकाणी असावी, अशा सूचना उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, नगरपालिका आणि पोलीस विभागाला दिल्या होत्या. मात्र, अशी जागा उपलब्ध नसल्याचे आरटीओ कार्यालयाकडून कळविण्यात आले. त्यानंतर सध्याच्या ट्रॅव्हल्स पॉईंट ठिकाणची गाड्यांची गर्दी कमी झाली आहे. गाड्या आता मागील बाजूला लावल्या जात आहेत, असे आरटीओतर्फे सांगण्यात आले. मात्र, ट्रॅव्हल्सला नुकत्याच झालेल्या अपघाताच्या अनुषंगाने ट्रॅव्हल्स पॉइंटसाठी पुन्हा नव्याने जागा शोधण्यास सांगण्यात येईल. ट्रॅव्हल्समुळे सध्याच्या ठिकाणी दुर्घटना होणार नाहीत, याची खबरदारी घेण्याचे निर्देश आरटीओंना दिले असून, काही दुर्घटना झाल्यास या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्पष्ट केले. 

अतिवृष्टीग्रस्तांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई - अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई मिळावी, या दृष्टीने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याद्या बनविण्याच्या कामावर सुरुवातीला तलाठ्यांनी बहिष्कार टाकला होता. त्यानंतर ग्रामसेवक आणि कृषी सहायक यांनी विरोधाची भूमिका घेतली. संबंधित ग्रामसेवकांशी मुख्य कार्यकारी अधिकारी संवाद साधत आहे. तर कृषी सहायकांच्या प्रश्नात लक्ष घालण्याच्या सूचना कृषी अधीक्षकांना दिल्या असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसfireआग