शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी बांधवांचा आरक्षण बचाव मोर्चा

By admin | Updated: August 4, 2014 23:58 IST

आदिवासी समाजाला असलेले आरक्षण भारताच्या संविधानाने दिले आहे. इतर कुठल्याही जातीचा समावेश या आरक्षणात करू नये या मागणीसाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयावर आदिवासी बांधवांनी

आर्णी : आदिवासी समाजाला असलेले आरक्षण भारताच्या संविधानाने दिले आहे. इतर कुठल्याही जातीचा समावेश या आरक्षणात करू नये या मागणीसाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयावर आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने मोर्चा काढून निवेदन सादर केले. महाराष्ट्रातील आदिवासी जमातीसाठी जी विशेष सूची आहे त्यामध्ये इतर कुठल्याही जातीचा समावेश करू नये, घटनेनुसार कुणाला आदिवासी म्हणावे आणि कुणाला नाही याचा स्पष्ट उल्लेख राज्यघटनेच्या कलम ३६६ (२५) मध्ये केला आहे. त्यानंतर कलम २४१ (अ) अंतर्गत भारताच्या राष्ट्रपतींना विशेष अधिकार देऊन स्पष्ट केले आहे. सध्या महाराष्ट्रात राज्यघटनेच्या कुठल्याही संकेताचा आदर न करता आम्हाला आदिवासी सूचीत टाका या मागणीसाठी मोठ्याप्रमाणात आंदोलने सुरू आहेत. परंतु ही बाब आदिवासी समाजाच्या हक्काावर गदा आणणारी आहे. आदिवासींचा अनुशेष अद्याप पूर्ण करण्यात आलेला नाही, आदिवासींसाठी असलेल्या योजना योग्यरित्या राबविल्या जात नाही, त्यामुळे पुन्हा इतर कुण्या समाजाचा या सूचीत उल्लेख करणे म्हणजे आदिवासींवर अन्याय करणे होईल, असे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आर्णी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््यासमोरून दुपारी १.०० वाजता मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा मेन रोडने तहसील कार्यालयावर पोहोचला. तिथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी मोर्चाला जितेंद्र मोघे, विजय मोघे, संजय मोघे, डॉ. विष्णु उकंडे, बाबाराव मडावी, किरण कुमरे, प्रा. माधव सरकुंडे, गोपाल घोडाम, विनोद सोयाम, गुलाब कुडमथे, तुळशीदास मोरकर, सोनबा मंगाम, प्रमोद घोडाम, डॉ. शाम शिंदे, आदींनी मार्गदर्शन केले. या मोर्चात आदिवासी बांधवांनी परंपरात्मक वेशभूषा करून मोठ्यासंख्येने सहभाग नोंदविला. (तालुका प्रतिनिधी)