शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्स उठली ‘जीवना’वर

By admin | Updated: November 19, 2014 22:47 IST

शहरासह लगतच्या ग्रामपंचायत परिसरात सुरू असलेल्या रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीच्या खोदकामाने उच्छाद मांडला आहे. सर्व अटीशर्थी पायदळी तुडवत खोदकम सुरू आहे.

जलवाहिनी फोडली : ‘ओएफसी’साठी भररस्त्यांवर खोदकामयवतमाळ : शहरासह लगतच्या ग्रामपंचायत परिसरात सुरू असलेल्या रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीच्या खोदकामाने उच्छाद मांडला आहे. सर्व अटीशर्थी पायदळी तुडवत खोदकम सुरू आहे. दोन दिवसापूर्वी तर खोदकाम करताना पाणीपुरवठ्याची मुख्य जलवाहिनीच फोडली. अनेक रस्त्यांवर आॅप्टीकल फायबर केबलसाठी चर खोदले जात आहेत. यामुळे भीषण अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. जणू रिलायन्स कंपनी यवतमाळकरांच्या ‘जीवना’वर उठल्याचे दिसत आहे.या अतिरेकी खोदकामाचा सर्वाधिक फटका जीवन प्राधिकरण आणि दूरसंचार निगमला बसत आहे. प्रमुख बाजारपेठेसह वसाहतीमधील रस्त्यावरही खोदकाम केले जात आहे. काही ठिकाणी वीज वितरणच्या खांबांनाही धोका निर्माण झाला आहे. खोदकामाची परवानगी देताना रात्रीच खोदकाम करण्याची अट घालण्यात आली होती. मात्र रस्त्यावर वर्दळ असतानासुध्दा खोदकाम केले जाते. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. कळंब चौकासारख्या वर्दळीच्या परिसरात अगदी मुख्य चौकालगत केबलसाठी चेंबर खोदले आहे. या चौकातून जड वाहतूक होते. चेंबरमुळे वाहनास अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. नगरपरिषदेने ११ सप्टेंबर २०१३ रोजी रिलायन्स कंपनीला खोदकामाची परवानगी दिली. ७५ लाख ५५ हजार २९२ रुपये नुकसानभरपाई पोटी वसूल केले आहे. खोदकामासाठी विविध अटीशर्थी लादण्यात आल्या आहेत. मात्र या अटीचे राजरोस उल्लंघन केले जात आहे. विशेष म्हणजे रिलायन्सने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वीज वितरण कंपनी, दूरसंचार निगम यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात अशी कोणतीच परवानगी घेतली नसल्याचे पुढे आले आहे.खोदकाम करताना रस्त्याच्या बाजुने कमीत कमी दोन मीटर अथवा रस्त्याच्या हद्दीपासून सव्वामीटर जागा सोडावी, भविष्यात रस्ता रुंदीकरणात केबल फुटपाथखाली येणार नाही, केबलमुळे भविष्यात रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण होणार नाही. केबल टाकण्यासाठी रिलायन्सनेच अतिक्रमण काढावे, डांबरी रस्त्यावर केबल टाकताना एक ते दीड मीटर खोल टाकावी. खोदाईचे काम पुर्ण केल्यानंतर जागा अथवा रस्ता पुर्ववत करून देण्याची जबाबदारी रिलायन्स कंपनीवर आहे. प्रत्यक्षात मात्र कुठेच कंपनीकडून खोदकाम केल्यानंतर जागा पुर्ववत करण्यात आली नाही. अनेक ठिकाण खोदकामानंतर निघालेली माती तिथेच पसरविल्याने अपघात झाले आहेत. येथील तहसील चौकात मुख्य जलवाहीनी फुटल्याने अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा खंडीत झाला होता. अचानक मध्यरात्री प्रमुख मार्गावर पाणी साचल्याने अनेक दुचाकीस्वार स्लीप होऊन कोसळले. मात्र नगरपरिषदेकडून कोणतीच कार्यवाही केली जात नाही. अशीच स्थिती वडगाव ग्रामपंचायत, लोहारा ग्रामपंचायतीमध्ये येत असलेल्या वसाहतीतील रस्त्यांची आहे. केबल टाकण्यासाठी कंपनीने चक्क सिंमेट रोडवरही खोदकाम केले आहे. कशीबशी माती टाकून केबल झाकल्याने ठिकठिकाणी खचके पडले आहेत. याला ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवकाकडून कोणताच विरोध केला जात नाही. त्यामुळे नागरिकांनी कितीही संताप व्यक्त केला तरी शहरातील रस्त्यांची चाळणी करण्याचे काम अव्याहतपणे सुरू आहे. रिलायन्सचे स्थानिक इनचार्ज पांडा यांच्याशी संर्पक केला असता त्यांनी बोलण्याचे टाळले. (कार्यालय प्रतिनिधी)