शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

पुसद तालुक्यात भीषण पाणीटंचाईचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 22:09 IST

सूर्य आग ओकत असल्यामुळे तालुक्यात भूजल पातळी झपाट्याने खालावली. विहीर, बोअर कोरडे पडले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला. भीषण पाणीटंचाईमुळे तालुक्यातील उन्हाळी पिकांना फटका बसत आहे.

ठळक मुद्देकेळी बागा करपल्या : शेतकरी संकटात, आर्थिक नुकसानीत भर

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : सूर्य आग ओकत असल्यामुळे तालुक्यात भूजल पातळी झपाट्याने खालावली. विहीर, बोअर कोरडे पडले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला. भीषण पाणीटंचाईमुळे तालुक्यातील उन्हाळी पिकांना फटका बसत आहे.उन्हाचा तडाखा सतत वाढत आहे. परिणामी पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न उभा ठाकला आहे. शेतात उन्हाळी पीक उभे आहे. मात्र विहीर, बोअर आटल्याने सिंचन करणे अवघड झाले आहे. डोळ्यादेखत पिके वाळत आहे. यामुळे शेतकरी राजा पुरता हतबल झाला आहे. तालुक्यातील सेलू, भोजला, मुंगशी, जामबाजार, एरंडा, कोपरा आदी परिसरात केळीच्या बागा मोठ्या प्रमाणात आहे. मात्र दुष्काळ व अति उष्ण तापमानामुळे बागा करपत आहे. तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील केळी धोक्यात आल्याने अर्थकारण अडचणीत सापडले. अति उष्ण तापमानामुळे पिल बाग, दुबार बहर असलेली बाग, निसवणीवर आलेले केळीचे धड तुटून नुकसान होत. काही बागांमध्ये केळीचे खोड मधून तुटून पडत आहे. उष्णतेची लाट कायम राहिल्यास नुकसान होणार आहे.पीक जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडयावर्षी तालुक्यावर दुष्काळाचे संकट ओढवले. केळी उत्पादक ठिबक, तुषार सिंचन किंवा प्रसंगी टँकरने पाणी आणून मोठ्या मेहनतीने केळी बाग जगविण्याची धडपड करीत आहे. मात्र अति उष्णेमुळे बागा करपत आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. केळी बागांचे नुकसान, ही नैसर्गिक आपत्ती मानली जात नसल्याने शेतकºयांना पीक विम्याचा दावा करता येत नाही.

टॅग्स :Farmerशेतकरीwater shortageपाणीटंचाई